शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: 'एक्झिट पोल'नुसार आंध्र प्रदेशात भाजपा सुस्साट, तेलंगणातही 'कमाल'
2
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
3
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 
4
केजरीवालांना उद्या सरेंडर व्हावे लागणार; कोर्ट अंतरिम जामिनावर ५ जूनला निकाल देणार 
5
शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत तटकरेंचा खळबळजनक दावा; मात्र अजित पवार म्हणाले...
6
मतदानानंतरची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, हे बडे नेते अनुपस्थित   
7
४ तारखेला निकाल, ५ जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींकडून डिनरचे निमंत्रण
8
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर EC ची मोठी घोषणा; "संध्याकाळी ६.३० वाजण्यापूर्वी..."
9
पंतप्रधान मोदींच्या १५५ सभा, २ हजारहून अधिक वेळा उच्चारले हे २ शब्द; विरोधकांना या ५ मुद्द्यांवर घेरलं!
10
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ पक्षातील महत्त्वपूर्ण नियुक्त्यांची घोषणा, सुप्रिया सुळेंकडे सोपवली मोठी जबाबदारी
11
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
12
"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार
13
रणवीर शिवाय डिनरला गेली दीपिका पादुकोण, अभिनेत्रीच्या बेबी बंपपेक्षा केअर टेकरने वेधलं सर्वांचं लक्ष
14
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
15
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
16
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; लोकसभा निकालावर भाकीत
17
Punjab National Bank : 'या' सरकारी बँकेतून लोन घेणं महागणार, वाढणार EMI; पाहा किती झाला Interest Rate?
18
“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत
19
"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा
20
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत

केएमटी-मोटारसायकल अपघातात दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 1:08 AM

कागल : पुणे-बंगलोर महामार्गालगत जोड पुलाजवळील सर्व्हिस रस्त्यावर नगारजींच्या घरासमोर के. एम. टी. बस आणि मोटारसायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोघे तरुण जागीच ठार झाले. लक्ष्मण ऊर्फ लखन प्रकाश खोत

कागल : पुणे-बंगलोर महामार्गालगत जोड पुलाजवळील सर्व्हिस रस्त्यावर नगारजींच्या घरासमोर के. एम. टी. बस आणि मोटारसायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोघे तरुण जागीच ठार झाले. लक्ष्मण ऊर्फ लखन प्रकाश खोत (वय २७, रा. माणगाववाडी, ता. हातकणंगले) आणि राकेश संजय बिरंजे (२३, रा. टाकवडे, ता. शिरोळ) अशी त्यांची नावे आहेत. हा अपघात मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला.

केएमटी बस (एमएच-०९-बीसी- २१६७) ही कागलहून कोल्हापूरला जात होती. सर्व्हिस रस्त्यावरून महामार्गाला जात असताना याच रस्त्याने मुरगूड नाक्याकडून मोटारसायकलवरून (एमएच०९-ईव्ही- २६३७) हे दोघे तरुण येत होते. नगारजींच्या घरासमोर आल्यानंतर मोटारसायकलची धडक बसचालकाच्या बाजूला बसली. मोटारसायकलीवरून खाली पडून हे दोघेही बसखाली घुसले गेले आणि पाठीमागील चाक दोघांच्याही डोक्यावरून गेल्याने ते जागीच ठार झाले.

मोटारसायकल रस्त्यावर तशीच पडली होती. लखन खोतचे नातेवाईक येथील हणबर गल्लीत आहेत. त्यांच्याकडे तो आला होता, तर राकेश बिरंजे हा त्याचा मित्र होता. अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी आणि ग्रामीण रुग्णालयात हणबर समाजातील लोकांनी गर्दी केली होती. अपघातानंतर के. एम. टी. चालक कृष्णात गणपती वरुटे (रा. द. वडगाव) हे कागल पोलीस ठाण्यात हजर झाले. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. मृत लखन खोत विवाहित असून दोन आणि चार वर्षे वयाची दोन मुले आहेत, तर राकेश हा अविवाहित होता. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यू