शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

Accident News kolhapur: पुणे-बंगळूरु महामार्गावर किणीनजीक तिहेरी अपघात, तिघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 14:43 IST

या तिहेरी अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला

किणी (कोल्हापूर): पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर किणी तालुका हातकंणगले गावाजवळील उड्डाणपुलावर थांबलेल्या ट्रकला कारने जोरदार धडक दिली. दरम्यान, कारला पाठीमागून ट्रकने जोराची धडक दिल्याने तिहेरी अपघातात झाला. या अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला.त्रिलेश कुमार सी (वय ४२),  जिथ्या त्रिलेश (११) व संजना माहेश्वरी (२७, सर्व रा. बसवेश्वरनगर, बेंगलोर, कर्नाटक) अशी मृत तिघांची नावे आहेत. तर अरिन एन (४१) या गंभीर जखमी झाल्या. हा अपघात शनिवारी (दि.२) मध्यरात्रीच्या सुमारास झाला. अपघातात कारचा चकाचुर झाला आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, किणी गावाजवळील महामार्गाच्या उड्डाणपूलावर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बाजुच्या उताराला नादुरुस्त झाल्याने ट्रक (एम.एच-११-सी.एच-२७७९) थांबला होता. दरम्यान बेंगलोरहून शिर्डीला जाणाऱ्या कारची (केए-०२-एम.एस-६६१२) पाठीमागुन जोराची धडक झाली. दरम्यान मुंबईकडे निघालेल्या ट्रकने (के.ए-२७ बी-४५४४) कारला पाठीमागुन जोराची धडक दिली. या तिहेरी अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली.जखमी अरिन एन यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात कारचा चकाचुर झाला होता तर दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त तिन्ही वाहने क्रेनने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. अपघाताची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू