शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

आपत्तीच्यावेळी मुलीही वाचवणार लोकांचा जीव-कोल्हापुरात प्रशिक्षण सुरू: प्रात्यक्षिकांसह माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 12:54 AM

भूकंप, पूर, त्सुनामी, आग यासारख्या नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीत आता मुलीही लोकांचा जीव वाचवणार आहेत. देशातील पहिली महिला आपत्ती व्यवस्थापन समिती (आपदा मित्र) कोल्हापुरात तयार होत

कोल्हापूर : भूकंप, पूर, त्सुनामी, आग यासारख्या नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीत आता मुलीही लोकांचा जीव वाचवणार आहेत. देशातील पहिली महिला आपत्ती व्यवस्थापन समिती (आपदा मित्र) कोल्हापुरात तयार होत असून, त्यांचे १५ दिवसाचे प्रशिक्षण शुक्रवारपासून सुरू झाले.केंद्र सरकारच्या आपदा प्रशिक्षण उपक्रमासाठी देशातील विविध राज्यांमधील शहरांची निवड केली आहे. त्यात कोल्हापूरचा समावेश आहे. याअंतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्यावतीने आपत्कालीन परिस्थितीशी सामना करणे व नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी कोल्हापूरमधून २०० जणांची रेस्क्यू टीम तयार करण्यात येत आहे. यापूर्वी नागपूरमधून ३५ व कोल्हापुरातून ३० अशी ६५ मुलांची टीम तयार केली आहे.आपत्ती म्हटली की मुलांची टीम लोकांना वाचविण्यासाठी जात असते. महिला हे काम करू शकणार नाहीत, असा एक समज असतो; पण आता मुलीही या संकटांशी सामना करण्यासाठी तयार होत आहेत. त्यासाठी कोल्हापुरातील विविध भागांतून ५० मुलींची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. मुलींची टीम तयार करणारा कोल्हापूर हा देशातील पहिला जिल्हा आहे. या मुलींना गृहरक्षक दल कार्यालयाच्या परिसरात प्रशिक्षण देण्यात येत आहे.हे प्रशिक्षण १५ दिवस चालणार असून, यात पूर, भूकंप, आग, त्सुनामी, इमारतींची पडझड, दरडी कोसळणे, वायू गळती, अशा नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांवेळी लोकांचा जीव कसा वाचविला पाहिजे, काय उपाययोजना केल्या पाहिजेत, याची प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात येत आहे. संरक्षण विभागाच्या उपनियंत्रक सोनल मेहरोळे, सहायक उपनियंत्रक बाबासाहेब मंगसुळे, सुधाकर सूर्यवंशी, अतुल जगताप हे अधिकारी मुलींना प्रशिक्षण देत आहेत.परीक्षाही होणारहे प्रशिक्षण घेण्यासाठी कोल्हापूर, आजरा, चंदगड, इचलकरंजी, गारगोटी, भुदरगड, टाकवडे येथून मुली आल्या आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या दिवशी मुलींची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षाही घेतली जाणार आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर