शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

प्रशिक्षित कॉँग्रेस कार्यकर्ते होणार लोकसभा-विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 4:34 PM

कोल्हापूर : ‘अच्छे दिन’ म्हणजे चुनावी जुमला असल्याचे खुद्द भाजपाचेच ज्येष्ठ नेते सांगत आहेत. त्यामुळे भाजप सरकारच्या कार्यकाळात एकही ...

ठळक मुद्देप्रशिक्षित कॉँग्रेस कार्यकर्ते होणार लोकसभा-विधानसभा निवडणुकांसाठी सज्जकॉँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर :  भाजप सरकारमुळे एकही घटक समाधानी नाही : सोनल पटेल

कोल्हापूर : ‘अच्छे दिन’ म्हणजे चुनावी जुमला असल्याचे खुद्द भाजपाचेच ज्येष्ठ नेते सांगत आहेत. त्यामुळे भाजप सरकारच्या कार्यकाळात एकही घटक समाधानी नसून महागाईसह विविध प्रश्नांमुळे जनता निराश व नाराज असल्याची टीका कॉँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र सहप्रभारी सोनल पटेल यांनी मंगळवारी येथे केली. येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची प्रशिक्षित फौज शिबिराच्या माध्यमातून तयार करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.फुलेवाडी येथील अमृत हॉल येथे कॉँग्रेसतर्फे आयोजित दोन दिवसीय संवाद कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रमुख उपस्थिती महापौर शोभा बोंद्रे, प्रदेश सरचिटणीस आमदार रामहरी रुपणवार, प्रवक्ते हरिष रोगे, यशवंत हाप्पे, जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील, माजी खा.कल्लाप्पाण्णा आवाडे, जयवंतराव आवळे, माजी मंत्री भरमू पाटील, प्रकाश आवाडे, माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, मुख्य प्रशिक्षक राजीव साहू, प्रशिक्षक चैतन्य रेड्डील राजेंद्र वानखेडे, विनोद नायर, अल नासिर झकेरीया आदींची होती.पटेल म्हणाल्या, भाजप सरकारच्या कारभारामुळे जनता नाराज आहे. देशाच्या इतिहासातील राफेल हा आतापर्यंतचा मोठा घोटाळा असून लोकांमध्ये यामुळे सरकारविरोधात चीड निर्माण झाली आहे. राहुल गांधी हे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचा आग्रह धरला होता. त्यांनी यापूर्वी ‘एनएसयुआर’, युथ कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे असेच प्रशिक्षण घेतले होते. त्यानुसार हे प्रशिक्षण शिबिर घेतले जात असून यानंतर प्रत्येक ब्लॉकमध्ये ते घेतले जाणार आहे. यामाध्यमातून प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फौज आगामी निवडणुकांसाठी सज्ज ठेवली जाणार आहे.रुपणवार म्हणाले, आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षणाची गरज होती. कॉँग्रेसवर होणारे आरोप खोडून काढून या सरकारचे घोटाळे बाहेर काढण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांना करावी लागणार आहे.सतेज पाटील म्हणाले, राहुल गांधींना अभिप्रेत बूथ टू बूथ व घर टू घर या मोहिमेद्वारे लोकांशी साधण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी या प्रशिक्षणाचा चांगला उपयोग कार्यकर्त्यांना होणार आहे.पी. एन. पाटील म्हणाले, राज्यातील भाजप सरकारच्या बारा मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत परंतु त्यांचे राजीनामे घेतलेले नाहीत. पाकिस्तानला धडा शिकवू म्हणणारे या सरकारमधील लोक त्या ठिकाणी केक कापायला जातात, तर माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्रींनी पाकिस्तानचे रणगाडे कापायला लावले होते. हा या दोन्ही सरकार व नेत्यांमधील फरक आहे.

सरकारने दुष्काळ जाहीर करावाराज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सतेज पाटील यांनी केली. कॉँग्रेसने

पुरोगामी विचार एकत्र आल्यानेच शिरोळचा विजयसर्व पुरोगामी विचारांचे पक्ष, संघटना एकत्र आल्यानेच शिरोळ नगरपालिकेत जातीयवादी पक्षांचा पराभव झाला आहे. ही सुरुवात असून अशाच पध्दतीने आघाडी इथून पुढेही राहण्यासाठी प्रदेश पातळीवर चर्चा सुरु असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर