शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

गावांचा विरोध शमविण्यासाठी प्राधिकरणची ‘टूम’ : सहा शहरांतील अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 00:39 IST

विश्वास पाटील ।कोल्हापूर : गावांना विकासाचे स्वप्न दाखवून राज्य सरकार प्राधिकरणाची घोषणा करीत असले तरी त्यानंतर पुढे ते या प्राधिकरणांकडे लक्ष देत नसल्याने राज्यभरातील सहाही शहरांत त्याबद्दल ओरड असल्याचे चित्र पुढे आले आहे. हद्दवाढ नको म्हणून लोकांचा विरोध झाला की प्राधिकरण पुढे केले जाते; पण तिथेही लोकांच्या वाट्याला भ्रमनिरासच येत ...

ठळक मुद्देनिधी नाही, रोडमॅप नाही; लोकांच्या मनांतही संभ्रमच

विश्वास पाटील ।कोल्हापूर : गावांना विकासाचे स्वप्न दाखवून राज्य सरकार प्राधिकरणाची घोषणा करीत असले तरी त्यानंतर पुढे ते या प्राधिकरणांकडे लक्ष देत नसल्याने राज्यभरातील सहाही शहरांत त्याबद्दल ओरड असल्याचे चित्र पुढे आले आहे. हद्दवाढ नको म्हणून लोकांचा विरोध झाला की प्राधिकरण पुढे केले जाते; पण तिथेही लोकांच्या वाट्याला भ्रमनिरासच येत आहे. त्यामुळे सगळीकडेच ‘नको ते प्राधिकरण’ अशी भावना आहे.

कोल्हापूर शहराची हद्दवाढ प्रस्तावित होती. त्यासाठी शहरातून सातत्याने दबाव होता. सध्या कोल्हापूरच्या महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे. त्यांनी हद्दवाढीचा आग्रह धरला होता. किमान १७ गावांचा प्रस्ताव होता; परंतु या गावांना शहरामध्ये जायचे नाही. शहरवासीयच नागरी सुविधा मिळत नाहीत म्हणून ओरड करतात आणि आमच्या वाट्याला काय सोईसुविधा येणार, या भीतीतून लोकांनी हद्दवाढीस विरोध केला; म्हणून राज्य सरकारने म्हणजे मुख्यत: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरसाठीही प्राधिकरणाची घोषणा केली. त्यामध्ये ४२ गावांचा समावेश केला; परंतु स्थापना होऊन एक वर्ष होऊन गेले तरी प्राधिकरणासाठी पुरेसे कार्यालय नाही. कर्मचारी नाहीत. निधीचा तर पत्ताच नाही. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने यापूर्वी जिथे प्राधिकरण स्थापन झाले त्या नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पिंपरी-चिंचवड व पुणे प्राधिकरणांची स्थिती काय आहे याचा शोध घेतला; तर त्यामध्ये प्राधिकरणाबाबत सगळीकडेच ओरड असल्याचे दिसूून आले.

शासनाने प्राधिकरण स्थापन झाल्याची घोषणा केल्यावर पुन्हा त्याच्याकडे ढुंकूनही पाहिलेले नाही. कोल्हापूरप्रमाणेच किमान चार ठिकाणी लोकांच्या मनात प्रचंड संभ्रम आहे; परंतु त्याचा विचार सरकार करायला तयार नाही. निधी म्हणाल तर अजून एकही रुपयाही कुठल्याच प्राधिकरणाला दिलेला नाही. खुल्या जागा विकून त्यातून पैसा उभारला जाणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे लोकांच्या मनात जी मूळ भीती आहे की, आपल्या जमिनी काढून घेतल्या जातील, तिला दुजोरा मिळत आहे. कोल्हापुरात हद्दवाढ नको म्हणून प्राधिकरण झाले; परंतु इतर ठिकाणी लोकांची मागणी नसतानाच त्याची घोषणा केली आहे. नागपूरला तर कार्यक्षेत्र १२५ किलोमीटरपर्यंतचे आहे.

या गावांचा विकासाचा रोडमॅप प्राधिकरणाकडे नाही. त्यामुळे या प्राधिकरणाला लोकांकडून विरोध होत आहे. सध्या शहरांशेजारील असोत की इतरही गावांचा विकास होताना त्याचे नीट नियोजन होत नाही. शहराला लागून असलेल्या गावांमध्ये तर जमिनी एन.ए. करून त्या प्लॉट पाडून विकणारी यंत्रणा सक्रिय आहे. त्यामुळे या गावांची अनियंत्रित वाढ होत आहे. त्यावर उपाय म्हणून तज्ज्ञांकडून नियोजन करून या गावांचा विकास करू, असे सरकार म्हणते; परंतु करीत मात्र काहीच नाही, असा अनुभव या गावांना येत आहे.प्राधिकरणासंबंधी उद्या बैठकप्राधिकरणाबाबत पुढे काय निर्णय घ्यायचा यासंबंधीची दिशा ठरविण्यासाठी सोमवारी (दि. ३) दुपारी तीन वाजता करवीर पंचायत समितीच्या शाहू सभागृहात बैठक आयोजित केली आहे. बैठकीस प्राधिकरणातील ४२ गावांतील सरपंच, उपसरपंच, सदस्य व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करवीर पंचायत समितीचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी, वडणगेचे सरपंच सचिन चौगले, शिंगणापूरचे अमर पाटील, प्रकाश रोटे, नागदेववाडीचे उत्तम निगडे, वाशीचे संदीप पाटील व कृष्णा मोरे, आदींनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgovernment schemeसरकारी योजना