शहरं
Join us  
Trending Stories
1
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
2
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
3
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
4
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
5
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
6
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
7
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
8
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
9
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
10
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
11
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
12
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
13
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
14
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
15
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
16
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
17
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
18
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
19
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
20
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार

कोकणातून आंबा घाटापर्यंत सुसाट.. कोल्हापूर जिल्ह्यात दोन ठिकाणी टोल नाके

By भीमगोंड देसाई | Updated: July 4, 2025 12:14 IST

रत्नागिरी-नागपूर महामार्गाची स्थिती : सन २०२६पर्यंत मुदतवाढ, चोकाक ते अंकलीपर्यंचे काम रखडले

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : नागपूर-रत्नागिरी महामार्गाचे काम कोकणातून आंबा घाटापर्यंत ९० टक्के पूर्ण झाले आहे. यामुळे कोकणातून आंब्यापर्यंत वाहने सुसाट ये-जा करीत आहेत. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात महामार्गाचे काम संथ गतीने होत आहे. या महामार्गावर पन्हाळा तालुक्यातील आवळी आणि शिरोली - बसवनखिंड येथे टोल नाका होणार आहे. रस्त्याचे काम पूर्ण करण्यास ठेकेदार कंपनीस सन २०२६अखेरची मुदतवाढ देण्यात आली आहे. काम पूर्ण झाल्यानंतर टोल आकारणी सुरू होणार आहे.महामार्ग क्रमांक १६६ या १३४ किलोमीटरचे काम सन २०२३मध्ये सुरू झाले. महामार्ग नागपूरपासून सांगलीपर्यंत पूर्ण झाला आहे. सांगली - अंकली ते चोकाकपर्यंत महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीचा मोबदला किती मिळणार हे अजून शासनाने जाहीर केलेले नाही. संबंधीत शेतकरी महामार्गास जमीन देण्यास तयार नाहीत. काम बंद आहे.चोकाक ते आंब्यापर्यंतचे काम सुरू आहे. पण, सध्या पाऊस अधिक असल्याने आणि डोंगर पोखरून अजस्त्र पूल बांधले जात असल्याने कामाला अपेक्षित गती देता आलेली नाही, असे महामार्ग प्रशासनाचे म्हणणे आहे. पहिल्या टप्प्यातील रत्नागिरीत मिऱ्या बंदर ते आंबापर्यंतचा रस्ता पूर्ण होत आला आहे. यामुळे कोकणातून वाहनधारक आंबापर्यंत गतीने ये-जा करीत आहेत.

सांगली-कोल्हापूर रस्ताही महामार्गातसांगली - कोल्हापूर रस्ताही नागपूर - रत्नागिरी महामार्गात विलीन झाला आहे. हा ५२.६१ किलोमीटरचा रस्ता पूर्वी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून 'बांधा, वापरा, हस्तातंरीत करा' (बीओटी) या तत्त्वावर तयार करण्यासाठी खासगी कंपनीस सरकारने ठेका दिला होता. ठेकेदाराने २०१४ पर्यंत ६० टक्के काम केले. दरम्यान, कोल्हापूर शहरात टोल बंदीसाठी व्यापक आंदोलन झाले. त्यातून सरकारने शहरातून टोल हद्दपार केल्याची घोषणा केली. त्यानंतर या रस्त्यावरील प्रस्तावित टोलनाक्यास विरोध झाल्याने ठेकेदार कंपनीने गाशा गुंडाळला. काम रद्द झाल्याने हा रस्ता महामार्ग प्राधीकरणकडे वर्ग झाला. यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद होऊन ठेकेदार निश्चित झाला आहे. पावसाळ्यानंतर काम सुरू होईल, असे महामार्ग प्रशासनाचे म्हणणे आहे.

..येथे होणार टोलनाके

  • आवळी (ता. पन्हाळा)
  • शिरोली - बसवनखिंड (ता. हातकणंगले)

दृष्टीक्षेपातील जिल्ह्यातील महामार्ग

  • आंबा ते पैजारवाडी - ४५.२०० किलोमीटर
  • पैजारवाडी ते चोकाक - ३२.९६० किमी.
  • रूंदी - ४५ मीटर
  • मंजूर निधी - ५,६९८ कोटी
  • जिल्ह्यातील बाधित गावे : ४९
  • जमीन संपादीत झालेल्या शेतकऱ्यांची संख्या - १२,६०८