शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

कोकणातून आंबा घाटापर्यंत सुसाट.. कोल्हापूर जिल्ह्यात दोन ठिकाणी टोल नाके

By भीमगोंड देसाई | Updated: July 4, 2025 12:14 IST

रत्नागिरी-नागपूर महामार्गाची स्थिती : सन २०२६पर्यंत मुदतवाढ, चोकाक ते अंकलीपर्यंचे काम रखडले

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : नागपूर-रत्नागिरी महामार्गाचे काम कोकणातून आंबा घाटापर्यंत ९० टक्के पूर्ण झाले आहे. यामुळे कोकणातून आंब्यापर्यंत वाहने सुसाट ये-जा करीत आहेत. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात महामार्गाचे काम संथ गतीने होत आहे. या महामार्गावर पन्हाळा तालुक्यातील आवळी आणि शिरोली - बसवनखिंड येथे टोल नाका होणार आहे. रस्त्याचे काम पूर्ण करण्यास ठेकेदार कंपनीस सन २०२६अखेरची मुदतवाढ देण्यात आली आहे. काम पूर्ण झाल्यानंतर टोल आकारणी सुरू होणार आहे.महामार्ग क्रमांक १६६ या १३४ किलोमीटरचे काम सन २०२३मध्ये सुरू झाले. महामार्ग नागपूरपासून सांगलीपर्यंत पूर्ण झाला आहे. सांगली - अंकली ते चोकाकपर्यंत महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीचा मोबदला किती मिळणार हे अजून शासनाने जाहीर केलेले नाही. संबंधीत शेतकरी महामार्गास जमीन देण्यास तयार नाहीत. काम बंद आहे.चोकाक ते आंब्यापर्यंतचे काम सुरू आहे. पण, सध्या पाऊस अधिक असल्याने आणि डोंगर पोखरून अजस्त्र पूल बांधले जात असल्याने कामाला अपेक्षित गती देता आलेली नाही, असे महामार्ग प्रशासनाचे म्हणणे आहे. पहिल्या टप्प्यातील रत्नागिरीत मिऱ्या बंदर ते आंबापर्यंतचा रस्ता पूर्ण होत आला आहे. यामुळे कोकणातून वाहनधारक आंबापर्यंत गतीने ये-जा करीत आहेत.

सांगली-कोल्हापूर रस्ताही महामार्गातसांगली - कोल्हापूर रस्ताही नागपूर - रत्नागिरी महामार्गात विलीन झाला आहे. हा ५२.६१ किलोमीटरचा रस्ता पूर्वी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून 'बांधा, वापरा, हस्तातंरीत करा' (बीओटी) या तत्त्वावर तयार करण्यासाठी खासगी कंपनीस सरकारने ठेका दिला होता. ठेकेदाराने २०१४ पर्यंत ६० टक्के काम केले. दरम्यान, कोल्हापूर शहरात टोल बंदीसाठी व्यापक आंदोलन झाले. त्यातून सरकारने शहरातून टोल हद्दपार केल्याची घोषणा केली. त्यानंतर या रस्त्यावरील प्रस्तावित टोलनाक्यास विरोध झाल्याने ठेकेदार कंपनीने गाशा गुंडाळला. काम रद्द झाल्याने हा रस्ता महामार्ग प्राधीकरणकडे वर्ग झाला. यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद होऊन ठेकेदार निश्चित झाला आहे. पावसाळ्यानंतर काम सुरू होईल, असे महामार्ग प्रशासनाचे म्हणणे आहे.

..येथे होणार टोलनाके

  • आवळी (ता. पन्हाळा)
  • शिरोली - बसवनखिंड (ता. हातकणंगले)

दृष्टीक्षेपातील जिल्ह्यातील महामार्ग

  • आंबा ते पैजारवाडी - ४५.२०० किलोमीटर
  • पैजारवाडी ते चोकाक - ३२.९६० किमी.
  • रूंदी - ४५ मीटर
  • मंजूर निधी - ५,६९८ कोटी
  • जिल्ह्यातील बाधित गावे : ४९
  • जमीन संपादीत झालेल्या शेतकऱ्यांची संख्या - १२,६०८