शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

 तंबाखूविरोधी दिन :  कर्करोगाचे ६० टक्के रुग्ण तंबाखू खाणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 11:48 IST

तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे देशात दरवर्षी नऊ लाखांहून अधिक रुग्ण दगावत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातही कर्करोग झालेल्या एकूण रु ग्णांपैकी ६० टक्के रुग्ण केवळ तंबाखूजन्य पदार्थ खाणारे आहेत. त्यामुळे तंबाखू, गुटखा हे विष असूनही लोक केवळ व्यसन म्हणून जवळ करीत आहेत. ज्यांनी गुटखा, तंबाखू सोडून तीन ते चार वर्षे झाली, अशांना कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्दे तंबाखूविरोधी दिन :  कर्करोगाचे ६० टक्के रुग्ण तंबाखू खाणारेतंबाखू खाणे सोडलेल्या रुग्णांनीही करून घ्यावी मौखिक चाचणी

कोल्हापूर : तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे देशात दरवर्षी नऊ लाखांहून अधिक रुग्ण दगावत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातही कर्करोग झालेल्या एकूण रु ग्णांपैकी ६० टक्के रुग्ण केवळ तंबाखूजन्य पदार्थ खाणारे आहेत. त्यामुळे तंबाखू, गुटखा हे विष असूनही लोक केवळ व्यसन म्हणून जवळ करीत आहेत. ज्यांनी गुटखा, तंबाखू सोडून तीन ते चार वर्षे झाली, अशांना कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढले आहे.तंबाखूजन्य विशेषत: गुटखा खाऊन कर्करोग झालेल्या रुग्णांची संख्या राज्यासह देशभरात झपाट्याने वाढू लागली आहे. यात गुटखा खाणाऱ्यांचे प्रथम गालाचे स्नायू आखडणे, त्यानंतर आतील त्वचेला चट्टे पडणे, तोंड उघडण्यात अडचणी येणे, संवेदना समजण्याची क्षमता कमी होणे, त्वचा लालसर होणे, त्वचा पांढरी पडणे, त्यानंतर तोंडातील त्वचेला जखम होणे ही कर्करोगाची प्राथमिक लक्षणे आहेत. असे रुग्ण कर्करोग तज्ज्ञांकडे वाढू लागले आहेत.

अनेक जणांचा कर्करोग अंतिम टप्प्याकडेही पोहोचत आहे. अशा रुग्णांचा तो अवयव काढून टाकण्याशिवाय पर्याय राहत नाही. तरीही लोक गुटखा, मावा, तंबाखू खाण्यात धन्यता मानत आहेत. विशेष म्हणजे विविध कर्करोगाच्या रुग्णांपैकी तंबाखू खाऊन कर्करोग झालेल्या रुग्णांची संख्या ६० टक्क्यांवर पोहोचली आहे. त्यामुळे ‘तंबाखूविरोधी अभियान’ ही एक चळवळ म्हणून सर्वसामान्यांनी राबविणे काळाची गरज बनली आहे.

कर्करोगाबरोबर हेही रोग फ्रीतंबाखूजन्य पदार्थ खाण्यामुळे कर्करोग तर हमखास होतोच. त्यासोबत भूक मंदावणे, हृदयरोगाचा झटका, मेंदूला सातत्याने उत्तेजना दिल्यामुळे विसरभोळेपणा, मानसिक थकवा, आकलनशक्ती कमी होणे, एकाग्रता नष्ट होणे, चिडचिडेपणा येणे, अकाली वृद्धत्व येणे, त्वचेला कोरडेपणा येणे, आदी रोगही होऊ शकतात.

तोंडाचे स्कॅनिंग करून घेणे आवश्यकमी तीन वर्षांपूर्वी, तर मी चार वर्षांपूर्वी तंबाखू, गुटखा सोडला असे म्हणणारी अनेक मंडळी दिसतात. अशा रुग्णांनाही कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले आहे. कारण तोंडातील त्वचेच्या पेशी गुटखा, तंबाखू सातत्याने खाल्ल्यामुळे वर्षभरातच खराब होण्यास सुरुवात होते. त्यामुळे अशा रुग्णांनीही ‘वेलेस्कोप’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त यंत्राद्वारे तोंडाचे स्कॅनिंग करून घेणे आवश्यक बाब बनली आहे. याद्वारे अशा तंबाखू खाणाऱ्या रुग्णांना पुढे कर्करोग होणार की नाही हेही समजते.

कर्करोग पुढच्या पायरीवर गेल्यानंतर होणारा मनस्ताप रोखण्यासाठी तंबाखू खाणाऱ्या लोकांनी तज्ज्ञांकडून मौखिक तपासणी करून घेणे गरजेचे आहे. सरकारने जनजागृतीसाठी पानमसाल्याच्याही जाहिराती बंद केल्या पाहिजेत.- डॉ. अशितोष देशपांडे,सचिव, इंडियन डेंटल असोसिएशन, शाखा कोल्हापूर 

 

टॅग्स :Healthआरोग्यkolhapurकोल्हापूर