शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

 तंबाखूविरोधी दिन :  कर्करोगाचे ६० टक्के रुग्ण तंबाखू खाणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 11:48 IST

तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे देशात दरवर्षी नऊ लाखांहून अधिक रुग्ण दगावत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातही कर्करोग झालेल्या एकूण रु ग्णांपैकी ६० टक्के रुग्ण केवळ तंबाखूजन्य पदार्थ खाणारे आहेत. त्यामुळे तंबाखू, गुटखा हे विष असूनही लोक केवळ व्यसन म्हणून जवळ करीत आहेत. ज्यांनी गुटखा, तंबाखू सोडून तीन ते चार वर्षे झाली, अशांना कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्दे तंबाखूविरोधी दिन :  कर्करोगाचे ६० टक्के रुग्ण तंबाखू खाणारेतंबाखू खाणे सोडलेल्या रुग्णांनीही करून घ्यावी मौखिक चाचणी

कोल्हापूर : तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे देशात दरवर्षी नऊ लाखांहून अधिक रुग्ण दगावत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातही कर्करोग झालेल्या एकूण रु ग्णांपैकी ६० टक्के रुग्ण केवळ तंबाखूजन्य पदार्थ खाणारे आहेत. त्यामुळे तंबाखू, गुटखा हे विष असूनही लोक केवळ व्यसन म्हणून जवळ करीत आहेत. ज्यांनी गुटखा, तंबाखू सोडून तीन ते चार वर्षे झाली, अशांना कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढले आहे.तंबाखूजन्य विशेषत: गुटखा खाऊन कर्करोग झालेल्या रुग्णांची संख्या राज्यासह देशभरात झपाट्याने वाढू लागली आहे. यात गुटखा खाणाऱ्यांचे प्रथम गालाचे स्नायू आखडणे, त्यानंतर आतील त्वचेला चट्टे पडणे, तोंड उघडण्यात अडचणी येणे, संवेदना समजण्याची क्षमता कमी होणे, त्वचा लालसर होणे, त्वचा पांढरी पडणे, त्यानंतर तोंडातील त्वचेला जखम होणे ही कर्करोगाची प्राथमिक लक्षणे आहेत. असे रुग्ण कर्करोग तज्ज्ञांकडे वाढू लागले आहेत.

अनेक जणांचा कर्करोग अंतिम टप्प्याकडेही पोहोचत आहे. अशा रुग्णांचा तो अवयव काढून टाकण्याशिवाय पर्याय राहत नाही. तरीही लोक गुटखा, मावा, तंबाखू खाण्यात धन्यता मानत आहेत. विशेष म्हणजे विविध कर्करोगाच्या रुग्णांपैकी तंबाखू खाऊन कर्करोग झालेल्या रुग्णांची संख्या ६० टक्क्यांवर पोहोचली आहे. त्यामुळे ‘तंबाखूविरोधी अभियान’ ही एक चळवळ म्हणून सर्वसामान्यांनी राबविणे काळाची गरज बनली आहे.

कर्करोगाबरोबर हेही रोग फ्रीतंबाखूजन्य पदार्थ खाण्यामुळे कर्करोग तर हमखास होतोच. त्यासोबत भूक मंदावणे, हृदयरोगाचा झटका, मेंदूला सातत्याने उत्तेजना दिल्यामुळे विसरभोळेपणा, मानसिक थकवा, आकलनशक्ती कमी होणे, एकाग्रता नष्ट होणे, चिडचिडेपणा येणे, अकाली वृद्धत्व येणे, त्वचेला कोरडेपणा येणे, आदी रोगही होऊ शकतात.

तोंडाचे स्कॅनिंग करून घेणे आवश्यकमी तीन वर्षांपूर्वी, तर मी चार वर्षांपूर्वी तंबाखू, गुटखा सोडला असे म्हणणारी अनेक मंडळी दिसतात. अशा रुग्णांनाही कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले आहे. कारण तोंडातील त्वचेच्या पेशी गुटखा, तंबाखू सातत्याने खाल्ल्यामुळे वर्षभरातच खराब होण्यास सुरुवात होते. त्यामुळे अशा रुग्णांनीही ‘वेलेस्कोप’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त यंत्राद्वारे तोंडाचे स्कॅनिंग करून घेणे आवश्यक बाब बनली आहे. याद्वारे अशा तंबाखू खाणाऱ्या रुग्णांना पुढे कर्करोग होणार की नाही हेही समजते.

कर्करोग पुढच्या पायरीवर गेल्यानंतर होणारा मनस्ताप रोखण्यासाठी तंबाखू खाणाऱ्या लोकांनी तज्ज्ञांकडून मौखिक तपासणी करून घेणे गरजेचे आहे. सरकारने जनजागृतीसाठी पानमसाल्याच्याही जाहिराती बंद केल्या पाहिजेत.- डॉ. अशितोष देशपांडे,सचिव, इंडियन डेंटल असोसिएशन, शाखा कोल्हापूर 

 

टॅग्स :Healthआरोग्यkolhapurकोल्हापूर