शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

कोल्हापूर : थकलेले हात एकत्र येऊन दूर करणार ‘स्मृतिभ्रंश’: ‘जागतिक स्मृतिभ्रंश दिन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 01:15 IST

सततचा एकलकोंडेपणा आणि नैराश्य या स्मृतिभ्रंशाला निमंत्रण देणाऱ्या परिस्थिती आहेत. उत्साही व सकारात्मक माणसांचा गोतावळा भोवताली असेल तर या आजाराला वेळीच वेसण घालून दूर ठेवता येते. मात्र,

ठळक मुद्देज्येष्ठ नागरिकांच्या वतीने निरामयसुखी जीवनासाठी जिल्ह्यातील पहिला उपक्रम

प्रदीप शिंदे ।कोल्हापूर : सततचा एकलकोंडेपणा आणि नैराश्य या स्मृतिभ्रंशाला निमंत्रण देणाऱ्या परिस्थिती आहेत. उत्साही व सकारात्मक माणसांचा गोतावळा भोवताली असेल तर या आजाराला वेळीच वेसण घालून दूर ठेवता येते. मात्र, आजच्या धावपळीच्या युगात ज्येष्ठांशी चार गोष्टी बोलण्यासाठी कोणाला वेळ नाही. त्यामुळे अनेकजण ‘स्मृतिभ्रंश’ (अल्झायमर) आजाराने त्रस्त होत आहेत असेच थकलेले हात एकत्र येऊन आणि संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अशा लोकांसाठी पुन्हा जगण्यासाठी ताकद एकवटली आहे.

ज्येष्ठ नागरिकांनी निरामय, सुखी, आनंदी जीवन जगावे, हा उद्देश घेऊन महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघातर्फे काम केले जाते. संघटनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्याही सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात. हे काम करीत असतानच आपल्याच ‘साठी’ ओलांडलेल्या सवंगड्यांना ‘स्मृतिभ्रंश’ (अल्झायमर) आजार जडत असल्याचे लक्षात आले.

वाचणे, लिहिणे, बोलणे, चालणे यांची क्षमता कमी होत जाते. घरचा पत्ता विसरणे, नैसर्गिक विधीही न समजणे, या गोष्टी वयोपरत्वे होणारा विसराळूपणा समजून त्याकडे दुर्लक्ष होते. मात्र हेच दुर्लक्ष पुढे जाऊन गंभीर स्वरूप धारण करते. शेवटी स्नायूंच्या ºहासामुळे सर्व हालचाली मंदावतात व रुग्ण बिछान्यात पडून राहतो; तसेच मनुष्य पूर्वीच्या सर्वच गोष्टी विसरतो. सध्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये ‘अल्झायमर’ या आजाराची लक्षणे जास्त दिसत आहेत. या आजाराबाबत जनजागृती व योग्य उपचारपद्धतीची माहिती देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक महासंघातर्फे पुढाकार घेतला आहे.आज पहिले पाऊलजिल्ह्यात सहा लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. या आजाराबाबत अनेकांना माहिती नसल्याने, योग्यवेळी उपचार होत नसल्याने हा आजार वाढत जाण्याचे प्रमाण जास्त आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी आज, २१ सप्टेंबरला ‘जागतिक स्मृतिभ्रंश दिना’निमित्त ज्येष्ठ नागरिक संघातर्फे पुढाकार घेतला आहे. सागरमाळ ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने जिल्ह्यातील हा असा पहिलाच उपक्रम राबवत प्रतिभानगर येथील हुतात्मा स्मारक येथे ‘स्मृतिभ्रंश’ या विषयावर विशेष व्याख्यान ठेवले आहे. दुपारी ४ वाजता होणाºया कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत, असे अध्यक्ष दिलीप पेटकर यांनी सांगितले तसेच याबाबत पत्रके वाटून जनजागृती केली जाणार आहे.

सेवानिवृत्तीनंतर बहुतांश ज्येष्ठांसमोर वेळेची पोकळी कशी भरावी, हे सर्वांत मोठे आव्हान असते. त्यातून अनेक वेळा स्मृतिभ्रंशासारखा आजार ज्येष्ठांना जडत आहे. अशा व्यक्तींना समजून घेऊन त्यांच्यातील एकलकोंडेपणा दूर करण्यासाठी कुटुंबातील प्रत्येकाचे योगदान मोलाचे आहे.- प्राचार्य डॉ. मानसिंग जगताप, विभागीय अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक महासंघ

स्मृतिभ्रंश (अल्झायमर) हा टप्प्याटप्प्याने वाढत जाणारा मेंदूशी संबंधित आजार आहे. वयानुसार शरीराची झीज झाल्याने ठरावीक लोकांमध्ये हा आजार बळावल्याचे दिसून येते. त्यामुळे साठी ओलांडलेल्या ज्येष्ठांनी शक्य तितका वेळ कुटुंबातील व्यक्तींशी संवादी किंवा आपल्या आवडत्या छंदात सतत मन गुंतवून ठेवणे गरजेचे आहे.- डॉ. पवन खोत, विभागप्रमुख, मानसोपचार विभाग, सीपीआर रुग्णालय