किल्ल्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात पर्यटनवृद्धी शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:53 IST2017-09-02T00:52:59+5:302017-09-02T00:53:38+5:30

कोल्हापूर : राजस्थानमध्ये मोठमोठे किल्ले आहेत. या किल्ल्यांचा उपयोग करून पर्यटकांना आकर्षित करण्यात राजस्थान यशस्वी झाले आहे.

 Through the fort for tourism prosperity in Maharashtra | किल्ल्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात पर्यटनवृद्धी शक्य

किल्ल्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात पर्यटनवृद्धी शक्य

ठळक मुद्दे काळूलाल गुर्जर : राजस्थानात महाराष्ट्रविषयी जिव्हाळाप्रत्येकजण आरक्षण मागत आहे, जे देणे शक्य नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राजस्थानमध्ये मोठमोठे किल्ले आहेत. या किल्ल्यांचा उपयोग करून पर्यटकांना आकर्षित करण्यात राजस्थान यशस्वी झाले आहे. महाराष्ट्रातील किल्ल्यांची संख्या पाहता त्या आधारे येथेही पर्यटनवृद्धी करणे शक्य असल्याचे मत राजस्थानचे संसदीय कार्य प्रमुख (कॅबिनेट दर्जा) काळूलाल गुर्जर यांनी व्यक्त केले.
पुणे आणि कोल्हापूरच्या वैयक्तिक दौºयावर आलेल्या गुर्जर यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधत महाराष्ट्र आणि राजस्थानमधील संबंधांना उजाळा दिला. गुर्जर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे मूळ स्थान राजस्थानमध्ये आहे. त्यामुळे महाराष्ट्राबाबत आम्हांला जिव्हाळा आहे. आजही खुदाई करणारे, ब्लास्टिंग करणारे, आइस्क्रीम तयार करणारे अनेक राजस्थानी येथे वास्तव्याला आहेत.
पुण्यात राजस्थानी समाजाच्या ‘भजनसंध्या’ कार्यक्रमासाठी आपण आलो होतो. कोल्हापूरचे स्नेही दत्ता सावंत यांच्या आग्रहामुळे येथे आलो. त्यांच्या बानगे या गावी जाऊन कुस्तीच्या आखाड्याला भेट दिली. गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालो. महाराष्ट्राचे लोक प्रेमळ आहेत, याचा पुन्हा मला अनुभव आला.
पर्यटनाबाबत बोलताना ते म्हणाले, राजस्थानमधील किल्ले, वाळवंट, तलावाचे प्रदेश या सर्व बाबींचा उपयोग करून पर्यटन वाढीमध्ये आम्ही यशस्वी ठरलो. वाळवंटातील फेस्टिव्हलला परदेशी पर्यटकांचा प्रतिसाद मिळतो. किल्ल्यांमध्ये हेरिटेज हॉटेल्स सुरू केली आहेत. राजस्थानमध्ये शेतकºयांना एक वर्षासाठी विनाव्याज कर्ज दिले जाते. यावेळी पुणे गुर्जर समाजाचे अध्यक्ष प्रकाश गुर्जर, विक्रमसिंह रजपूत, करणसिंह चुंडावत, दत्ता सावंत, सुनील कदम उपस्थित होते.


आर्थिक निकषांवर आरक्षण हवे
आरक्षणाचा मूळ हेतू बाजूला पडला असून, त्यामध्ये केवळ आता राजकारण सुरू आहे. पहिल्या दहा वर्षांसाठी आरक्षण ठेवावे असे सूचित केले असताना ते ७० वर्षे सुरू राहिले. त्यामुळे प्रत्येकजण आरक्षण मागत आहे, जे देणे शक्य नाही. त्यामुळे आर्थिक निकषांवर आरक्षण मिळावे, असे माझे वैयक्तिक मत आहे.

Web Title:  Through the fort for tourism prosperity in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.