शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Crime News in Kolhapur: जगतापनगरमधील तरुणाच्या खून प्रकरणी तिघे संशयित ताब्यात; पूर्ववैमनस्यातून खुनाचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 11:59 IST

घटनास्थळी दारूचे ग्लास, गांजाच्या पुड्या

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या हद्दीतील जगतापनगर येथे जोतिर्लिंग शाळेजवळ एका तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना गुरुवारी (दि. १९) सकाळी उघडकीस आली. ऋषिकेश महादेव सूर्यवंशी (२४, रा. गणेशनगर, चंबुखडी, शिंगणापूर, ता. करवीर) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयिताना ताब्यात घेतले असून, आर्थिक वाद किंवा पूर्ववैमनस्यातून खून झाला असावा, असा पोलिसांचा संशय आहे.

मृत ऋषिकेश याच्यावर लक्ष्मीपुरी आणि जुना राजवाडा पोलिस ठाण्यात मारामारीचे दोन गुन्हे दाखल आहेत. स्टेशन रोड येथील एका व्हिडीओ गेम पार्लरमध्ये तो कामाला होता. बुधवारी सायंकाळी साडेसहानंतर तो घरातून बाहेर पडला होता. घरी त्याचे आई-वडील असतात.जगतापनगर येथील जोतिर्लिंग विद्यामंदिर शाळेजवळ गुरुवारी सकाळी काही शालेय मुले खेळत होती. खेळताना त्यांचा बॉल ओढ्याकडे गेला. बॉल आणण्यासाठी गेलेल्या मुलांना एक मृतदेह दिसला. मुले आरडाओरडा करीत शाळेकडे पळाली. त्याचवेळी शाळेजवळ राहणाऱ्या एका महिलेने मुलांकडे चौकशी केल्यानंतर खुनाच्या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी करवीर पोलिसांना फोन करून कळवले. त्यानंतर घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी पंचनामा केला.मृतदेहाच्या पँटच्या खिशात मिळालेल्या आधार कार्डवरून त्याची ओळख पटली. चाकूने पोटात, छातीवर वार केल्यानंतर हल्लेखोरांनी डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृण खून केला. याबाबत मृत ऋषिकेशची आई माधवी महादेव सूर्यवंशी (५०, रा. गणेशनगर, चंबुखडी, शिंगणापूर) यांनी करवीर पोलिसांत फिर्याद दिली असून, दोन तरुणांवर संशय व्यक्त केला आहे.

तातडीने शोधखुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने संशयितांचा शोध सुरू केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि करवीर पोलिसांनी स्वतंत्र पथकांद्वारे दिवसभरात तीन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली. आर्थिक वाद आणि पूर्ववैमनस्यातून खून झाला असावा, असा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.

घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटाखुनाच्या घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, करवीरचे पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी, पोलिस निरीक्षक अजय सिंदकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गोरले यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. जयश्री देसाई यांनी तपासाबद्दल अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

घटनास्थळी दारूचे ग्लास, गांजाच्या पुड्याजगतापनगरातील ओढ्याकडेला दाट झाडीत दारूचे तीन ग्लास, काही बाटल्या आणि गांजाच्या पुड्या पडल्या होत्या. काही अंतरावरच ऋषिकेश याचा मृतदेह पडला होता. त्याच्या बाजूला रक्ताने माखलेला मोठा दगड होता, तर बाजूच्या झाडांवर रक्ताने माखलेले हात पुसल्याच्या खुना दिसत होत्या.

दुचाकी, मोबाइल लंपासघटनास्थळावर पोलिसांना ऋषिकेशची दुचाकी आणि मोबाइल मिळाला नाही. हल्लेखोरांनीच त्याची दुचाकी आणि मोबाइल पळवला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. चौकशीला ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून खुनाचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस