शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

‘त्रिस्तरीय सबलीकरण समिती’ ने घेतला कोल्हापुरात  जिल्हा बॅँकांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 12:42 IST

राज्य सरकारने कृषी पतपुरवठा करणाऱ्या संस्थांच्या सबलीकरणासाठी स्थापन केलेल्या त्रिस्तरीय समितीची चौथी बैठक कोल्हापुरात झाली. ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांच्या अध्यक्षतेखालील समितीने वर्धा, नागपूर, बुलढाणा जिल्हा बॅँकांचा आढावा घेतला.

ठळक मुद्दे‘त्रिस्तरीय सबलीकरण समिती’ ने घेतला कोल्हापुरात  जिल्हा बॅँकांचा आढावा ‘वर्धा’, ‘नागपूर’, ‘बुलढाणा’ बॅँकांची झाली चर्चा

कोल्हापूर : राज्य सरकारने कृषी पतपुरवठा करणाऱ्या संस्थांच्या सबलीकरणासाठी स्थापन केलेल्या त्रिस्तरीय समितीची चौथी बैठक कोल्हापुरात झाली. ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांच्या अध्यक्षतेखालील समितीने वर्धा, नागपूर, बुलढाणा जिल्हा बॅँकांचा आढावा घेतला.राज्यात शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप नाबार्ड, जिल्हा बॅँक व विकास संस्थांच्या माध्यमातून केले जात आहे; पण राज्यात अनेक जिल्हा बॅँका, विकास संस्था आतबट्ट्यात आल्याने शेतकºयांना पीक कर्जपुरवठा होत नाही. परिणामी शेतकऱ्यांना खासगी सावकारांच्या आश्रयाला जावे लागते. शेतकरी खासगी सावकारांच्या पेचात अडकला तर तो बाहेरच येऊ शकत नाही. त्यामुळे ही त्रिस्तरीय यंत्रणा सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.या समितीने, राज्यातील १४ जिल्हा बॅँका अडचणीत आहेत. त्या बॅँकांचे ‘अ’, ‘ब’ व ‘क’ असे वर्गीकरण केले आहे. प्राधान्याने ‘क’ वर्गातील बॅँकांच्या सबलीकरणासाठीही समितीचा तातडीने उपाययोजना सुचविण्याचा प्रयत्न आहे. ‘क’ वर्गात ‘वर्धा’, ‘बुलढाणा’ आणि ‘नागपूर’ जिल्हा बॅँकांचा समावेश आहे.

या तिन्हींत ‘वर्धा’ बॅँकेची अवस्था फारच नाजूक आहे. या बॅँकेचा एनपीए ९९ टक्के, तर ‘नागपूर’ व ‘बुलढाणा’ बॅँकांचा ४८ टक्के असल्याने या बॅँकांना बाहेर काढण्याचे आव्हान सरकारसमोर आहे. येथील शेतकरी थेट सावकाराकडून कर्ज उचलत असल्याने तो कर्जाच्या खाईत अडकला आहे.त्रिस्तरीय समितीने या तिन्ही जिल्हा बॅँकांना भेट देऊन अभ्यास केला. त्यानंतर शनिवारी कोल्हापूर जिल्हा बॅँकेत या समितीची बैठक झाली. या बैठकीत प्रामुख्याने या तिन्ही जिल्हा बॅँका व तेथील अडचणीतील पतपुरवठा संस्थांना ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याबाबत चर्चा झाली.

या बैठकीत झालेल्या चर्चा आणि उपाययोजनांबाबत समितीचे सदस्य लवकरच मुख्यमंत्री, राज्याचे सचिव व राज्य सहकारी बॅँकेच्या अध्यक्षांची भेट घेणार आहेत. बैठकीला डॉ. थोरात यांच्यासह समितीचे सदस्य, राज्याचे सेवानिवृत्त अप्पर निबंधक दिनेश ओऊळकर, सेवानिवृत्त विभागीय सहनिबंधक (लेखापरीक्षण) ए. डी. चौगले, पुणे जिल्हा बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, जिल्हा बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, जिल्हा बॅँकेचे संचालक अनिल पाटील, असिफ फरास, उदयानी साळुंखे, आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :bankबँकkolhapurकोल्हापूर