शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

पुणे-बंगळूर महामार्गावर अपघातात पाच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 18:09 IST

ट्रक आणि कारमध्ये धडक होऊन पुणे-बंगळूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पाच ठार झाले आहेत.

कोल्हापूर : ट्रक आणि कारमध्ये धडक होऊन पुणे-बंगळूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पाच जण ठार झाले आहेत. आज दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली आहे. 

महामार्गावर भरधाव निघालेल्या कारचा टायर फुटला. त्यामुळे कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावरून दुसऱ्या बाजूला रस्‍त्‍यावर गेली. यावेळी समोरून येणाऱ्या ट्रकची व कारची धडक होऊन कारमधील पाच जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास बेळगाव जवळील महामार्गावर श्रीनगर गार्डनजवळ हा अपघात घडला.

नंदू पवार (28),अमोल नेवे (26), सुरेश कणेरी (29), अमोल चौरी (26),महेश चौरी (28) सर्वजण रा.औरंगाबाद अशी मृतांची नावे असून अन्य दोघे गंभीर जखमी आहेत त्यांची नाव कळू शकली नाहीत. त्यांच्यावर  बेळगावातील के एल  रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते गोव्याकडे जात होते त्यावेळी हा अपघात घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादहुन कारमधून सहा जण बंगळूरला निघाले होते. कार श्रीनगर गार्डनजवळ आली तेव्हा समोरील टायर फुटला. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून ती दुभाजककावरून पलीकडील रस्त्यावर गेली. यावेळी धारवाडहून कोल्हापूरकडे निघालेल्या ट्रकला कारची जोरदार धडक बसली. धडक जबरदस्त असल्याने कारमधील पाच जण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर येथील केएलई रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त बीएस लोकेश कुमार, वाहतूक व गुन्हे विभागाच्या डीसीपी यशोदा वंटगोडी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बेळगाव वाहतूक उत्तर विभाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाkolhapurकोल्हापूरAccidentअपघात