शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' तालुक्यातील तिघा शेतकऱ्यांना मिळाली परदेश वारीची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 17:06 IST

विदेशातील आधुनिक कृषी तंत्रज्ञान पाहणार

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांना विदेशातील आधुनिक तंत्रज्ञान पाहण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावयाचे होते. कोल्हापूर जिल्ह्यातील १७ शेतकऱ्यांनी त्यासाठी अर्ज केले होते; परंतु जिल्ह्यासाठी केवळ तीन शेतकऱ्यांचे उद्दिष्ट असल्याने पात्र प्रस्तावांपैकी ३ जणांना ही संधी मिळणार आहे. याबाबतची निवड प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून जगदीश साताप्पा गोंगाने, निगवे खालसा, ता. करवीर, उत्तम इरगोंडा पाटील, कबनूर, ता. हातकणंगले, सुधीर मोतीराम लांडे, माणगाव ता. चंदगड या तिघांची या प्रक्रियेतून निवड करण्यात आली आहे.

कृषि कार्यालयातर्फे अभ्यास दौरामहाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागातर्फे या दौऱ्याचे आयोजन करण्यात येते. राज्यातील शेतकऱ्यांनी परदेशात जावे. तेथील आधुनिक शेतीची माहिती घ्यावी आणि आपल्या शेतामध्ये त्याचा अवलंब करावा आणि इतर शेतकऱ्यांना आपल्यापासून प्रेरणा द्यावी असा यामागचा हेतू आहे.

२५ शेतकऱ्यांचे अर्जकोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार एकूण १७ शेतकऱ्यांचे प्रस्ताव कृषी कार्यालयाकडे प्राप्त झाले होते. त्यातील विविध निकषांमध्ये न बसणारे पाच प्रस्ताव अमान्य करण्यात आले. उर्वरित १२ प्रस्तावांपैकी तिघांची सोडतीद्वारे निवड करण्यात आली.

५० टक्के खर्च शेतकऱ्यांचाशेतकऱ्यांच्या या विदेश दौऱ्यासाठी जो एकूण खर्च येणार आहे त्यातील ५० टक्के खर्च शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. उर्वरित ५० टक्के खर्च शासन करणार आहे.

अनुदान किती ?यासाठी नेमके किती अनुदान उपलब्ध होणार आहे हे अजूनही निश्चित ठरलेले नाही.

कोणत्या देशात जाणार ?शेतकऱ्यांना नेमके कोणत्या परदेशांमध्ये नेण्यात येणार आहे हे देखील अजून निश्चित झालेले नाही.

कधी जाणार ?शेतकऱ्यांना कधी परदेशामध्ये न्यायचे हे राज्य पातळीवर नियोजन सुरू असल्याचे सांगण्यात आले.

शासनाच्या वतीने आयोजित या विदेश दौऱ्यासाठीची निवड प्रक्रिया १३ फेब्रुवारी २४ रोजी पार पडली आहे. याची पुढची प्रक्रिया शासनाच्या पुढील आदेशानुसार केली जाणार आहे. - अरुण भिंगारदेवे, जिल्हा अधीक्षक, कृषि अधिकारी, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरairplaneविमानFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र