शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

तीन आसनी रिक्षा व्यावसायिकांनी कोल्हापूरामध्ये मोर्चा काढून दिली धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 6:28 PM

ग्रामीण परवानाधारक रिक्षा चालकांना शहर वगळून जिल्हा परवाना द्यावा, यासह अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर सात दिवसांत कारवाई करावी. अन्यथा आम्ही ‘सविनय कायदेभंग’ अर्थात मध्यवर्ती बसस्थानकापासून पाच प्रवाशांना घेऊन प्रवासी वाहतूक सुरू करू, असा इशारा कोल्हापूर शहर समस्त तीन आसनी रिक्षा व्यावसायिकांनी गुरुवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांना मोर्चाद्वारे दिला.

ठळक मुद्देतीन आसनी रिक्षा व्यावसायिकांनी कोल्हापूरामध्ये मोर्चा काढून दिली धडकअवैध प्रवासी वाहतूक रोखा, प्रादेशिक परिवहनला इशारा

 

कोल्हापूर : ग्रामीण परवानाधारक रिक्षा चालकांना शहर वगळून जिल्हा परवाना द्यावा, यासह अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर सात दिवसांत कारवाई करावी. अन्यथा आम्ही ‘सविनय कायदेभंग’ अर्थात मध्यवर्ती बसस्थानकापासून पाच प्रवाशांना घेऊन प्रवासी वाहतूक सुरू करू, असा इशारा कोल्हापूर शहर समस्त तीन आसनी रिक्षा व्यावसायिकांनी गुरुवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांना मोर्चाद्वारे दिला.गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ कोल्हापूर शहरामध्ये तीन आसनी रिक्षा व्यावसायिक हे सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा एक प्रमुख घटक म्हणून प्रवासी वर्गाला सेवा देत आहेत. त्यात शासनाचे सर्व नियम व कर भरून आणि वेळोवेळी भरमसाट वाढविलेला विमा ही ते भरत आहेत. तरीही प्रामाणिक रिक्षाचालकांचा व्यवसाय कोलमडला आहे; त्यामुळे अनेक रिक्षाचालक, मालक कर्जबाजारी झाले आहेत.

त्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या सहा आसनी व टाटा मॅजिक सारख्या गाड्यांमध्ये परवान्यापेक्षा जास्त प्रवासी बसवले जातात. त्याचा फटका प्रामाणिक रिक्षाचालकांना बसत आहे. याशिवाय प्रवाशांच्या जीवितालाही धोका पोहोचत आहे. यावर कारवाई करा म्हणून वारंवार निवेदन देऊनही ना प्रादेशिक परिवहन व पोलीस खाते दखल घेत नाही; त्यामुळे येत्या सात दिवसांत अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करावी.

तीन आसनी रिक्षामध्ये ४ प्रवासी वाहतुकीची रितसर परवानगी द्यावी. विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने बैठक घेऊन विमा हफ्ता कमी करावा, असे न झाल्यास प्रामाणिक तीन आसनी रिक्षाचालकही ‘सविनय कायदेभंग’ अर्थात मध्यवर्ती बसस्थानकापासून पाच प्रवाशांना घेऊन आपला व्यवसाय करतील, असा इशारा आंदोलकांतर्फे देण्यात आला.या मोर्चात कॉमन मॅन तीन आसनी रिक्षा संघटना, भारतीय जनता पार्टी तीन आसनी रिक्षा संघटना, करवीर आॅटो रिक्षा संघटना, महाराष्ट्र रिक्षाचालक सेना, आदर्श रिक्षा युनियन, शेअर-ए-रिक्षा संघटना, हिंदुस्थान आॅटो रिक्षा संघटना, स्वाभिमान रिक्षा संघटना, विद्यार्थी वाहतूक संघटना, आदी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व अ‍ॅड. बाबा इंदुलकर यांनी केले. यावेळी सुभाष शेटे, ईश्वर चणी, विजय गायकवाड, जाफर शेख, सरफरुद्दीन शेख, रमेश पोवार, अविनाश दिंडे, श्रीकांत पाटील, संजय भोरे, आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसkolhapurकोल्हापूर