शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

हेलिकॉप्टरमधून मतदार आणा म्हणणाऱ्यांची चौकशी व्हावी, जयंत पाटलांचा मुश्रीफांना अप्रत्यक्षरित्या टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 09:46 IST

Lok Sabha Election 2024 : चारवेळा पक्ष बदललेले संजय मंडलिक छत्रपतींच्या तोडीचे उमेदवार नाहीत, त्यामुळे त्यांच्याविषयी बोलण्याचे कारण नाही, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

गडहिंग्लज (जि.कोल्हापूर) :  हेलिकॉप्टरमधून मतदार आणा म्हणणाऱ्यांनी किती गोळा केले? त्याची चौकशी करण्यासाठी ही 'करेक्ट केस' आहे. परंतु,आमची परिस्थिती नाही. त्यामुळे आमचे मतदार पायी चालत, सायकलीने, बैलगाडीने येतील आणि राजर्षि शाहू महाराजांचा समतेचा विचार दिल्लीला पोहोचविण्यासाठी शाहू छत्रपतींनाच मतदान करतील,असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

दोन दिवसांपूर्वी कागलमध्ये संजय मंडलिक यांच्या प्रचाराची सभा पार पडली. यावेळी हेलिकॉप्टरने माणसं आणू, पण संजय मंडलिक यांना विजयी करू. आता देव आला तरी मंडलिक यांचा पराभव होणार नाही, असे विधान राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी केले होते. यावरून जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या हसन मुश्रीफ यांना टोला लगावला आहे. कानडेवाडी येथे काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ आयोजित महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जयंत पाटील बोलत होते. 

या मेळाव्यात आमदार सतेज पाटील, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, डॉ.नंदिनी बाभूळकर, व्ही.बी.पाटील, संजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. विरोधी उमेदवाराबद्दल बोलण्यासारखं काहीच नाही. ही तत्वांची, विचारांची लढाई आहे. चारवेळा पक्ष बदललेले संजय मंडलिक छत्रपतींच्या तोडीचे उमेदवार नाहीत, त्यामुळे त्यांच्याविषयी बोलण्याचे कारण नाही, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

भाजपने आजपर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांपैकी ११६ उमेदवार बाहेरचे आहेत. इंडिया आघाडी २५० जागेवर एकास एक लढत देणार आहे. त्यामुळे भाजप २०० जागादेखील स्वबळावर जिंकू शकणार नाही. त्यामुळे केंद्रात नक्कीच परिवर्तन होईल. खासदार बदला, परिस्थिती बदलेल, असे सतेज पाटील म्हणाले. तर महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी एकमताने दिलेली उमेदवारी म्हणजे रयतेची उमेदवारी आहे.एक जबाबदारी म्हणूनच ती स्विकारली आहे.सर्वांना विश्वासात घेऊन जिल्हयाच्या विकासाला चालना देणार आहे, असे शाहू छत्रपती म्हणाले.       नंदाताईंचे भावनिक आवाहन!आज बाबासाहेब कुपेकर असते तर शरद पवारसाहेबांसाठी त्यांनी छातीची कोट केली असती. त्यामुळे आपणही अडचणीच्या काळात पवारसाहेबांच्या पाठिशी उभे असून  लोकसभेच्या निमित्ताने पुन्हा सक्रिय झालो आहोत. ६ महिन्यात कसलाही विकास होणार नाही, त्यामुळे पवारसाहेबांना साथ देण्यासाठी कुपेकरांच्या सर्व कार्यकर्त्यांनी परत यावे, असे भावनिक आवाहन डॉ.नंदिनी बाभूळकर यांनी केले.

बंटींना दंड द्यावा लागेल!पुरोगामी कोल्हापूरकर जातीयवादी शक्तींना कधीच थारा देणार नाहीत, त्यामुळे शाहू छत्रपती किमान साडेतीन लाखांच्या फरकाने विजयी होतील. त्याची जबाबदारी 'बंटीं'वर आहे. दोन लाखांच्या खाली मताधिक्य आले तर त्यांना दंड द्यावा लागेल,असा चिमटा काढत  हातकणंगलेतून उद्ववसेनेच्या सत्यजित सरूडकरांना विजयी करण्याचे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४kolhapur-pcकोल्हापूर