शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

हेलिकॉप्टरमधून मतदार आणा म्हणणाऱ्यांची चौकशी व्हावी, जयंत पाटलांचा मुश्रीफांना अप्रत्यक्षरित्या टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 09:46 IST

Lok Sabha Election 2024 : चारवेळा पक्ष बदललेले संजय मंडलिक छत्रपतींच्या तोडीचे उमेदवार नाहीत, त्यामुळे त्यांच्याविषयी बोलण्याचे कारण नाही, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

गडहिंग्लज (जि.कोल्हापूर) :  हेलिकॉप्टरमधून मतदार आणा म्हणणाऱ्यांनी किती गोळा केले? त्याची चौकशी करण्यासाठी ही 'करेक्ट केस' आहे. परंतु,आमची परिस्थिती नाही. त्यामुळे आमचे मतदार पायी चालत, सायकलीने, बैलगाडीने येतील आणि राजर्षि शाहू महाराजांचा समतेचा विचार दिल्लीला पोहोचविण्यासाठी शाहू छत्रपतींनाच मतदान करतील,असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

दोन दिवसांपूर्वी कागलमध्ये संजय मंडलिक यांच्या प्रचाराची सभा पार पडली. यावेळी हेलिकॉप्टरने माणसं आणू, पण संजय मंडलिक यांना विजयी करू. आता देव आला तरी मंडलिक यांचा पराभव होणार नाही, असे विधान राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी केले होते. यावरून जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या हसन मुश्रीफ यांना टोला लगावला आहे. कानडेवाडी येथे काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ आयोजित महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जयंत पाटील बोलत होते. 

या मेळाव्यात आमदार सतेज पाटील, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, डॉ.नंदिनी बाभूळकर, व्ही.बी.पाटील, संजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. विरोधी उमेदवाराबद्दल बोलण्यासारखं काहीच नाही. ही तत्वांची, विचारांची लढाई आहे. चारवेळा पक्ष बदललेले संजय मंडलिक छत्रपतींच्या तोडीचे उमेदवार नाहीत, त्यामुळे त्यांच्याविषयी बोलण्याचे कारण नाही, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

भाजपने आजपर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांपैकी ११६ उमेदवार बाहेरचे आहेत. इंडिया आघाडी २५० जागेवर एकास एक लढत देणार आहे. त्यामुळे भाजप २०० जागादेखील स्वबळावर जिंकू शकणार नाही. त्यामुळे केंद्रात नक्कीच परिवर्तन होईल. खासदार बदला, परिस्थिती बदलेल, असे सतेज पाटील म्हणाले. तर महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी एकमताने दिलेली उमेदवारी म्हणजे रयतेची उमेदवारी आहे.एक जबाबदारी म्हणूनच ती स्विकारली आहे.सर्वांना विश्वासात घेऊन जिल्हयाच्या विकासाला चालना देणार आहे, असे शाहू छत्रपती म्हणाले.       नंदाताईंचे भावनिक आवाहन!आज बाबासाहेब कुपेकर असते तर शरद पवारसाहेबांसाठी त्यांनी छातीची कोट केली असती. त्यामुळे आपणही अडचणीच्या काळात पवारसाहेबांच्या पाठिशी उभे असून  लोकसभेच्या निमित्ताने पुन्हा सक्रिय झालो आहोत. ६ महिन्यात कसलाही विकास होणार नाही, त्यामुळे पवारसाहेबांना साथ देण्यासाठी कुपेकरांच्या सर्व कार्यकर्त्यांनी परत यावे, असे भावनिक आवाहन डॉ.नंदिनी बाभूळकर यांनी केले.

बंटींना दंड द्यावा लागेल!पुरोगामी कोल्हापूरकर जातीयवादी शक्तींना कधीच थारा देणार नाहीत, त्यामुळे शाहू छत्रपती किमान साडेतीन लाखांच्या फरकाने विजयी होतील. त्याची जबाबदारी 'बंटीं'वर आहे. दोन लाखांच्या खाली मताधिक्य आले तर त्यांना दंड द्यावा लागेल,असा चिमटा काढत  हातकणंगलेतून उद्ववसेनेच्या सत्यजित सरूडकरांना विजयी करण्याचे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४kolhapur-pcकोल्हापूर