शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या लहरीवरच ठरणार यंदाचा ऊस गाळप हंगाम

By विश्वास पाटील | Updated: September 20, 2022 15:37 IST

परतीचा पाऊस दसऱ्यामध्ये पडला तर हंगाम सुरू होण्यास नोव्हेंबर उजाडू शकतो असे आजचे चित्र आहे.

विश्वास पाटीलकोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने यंदाचा हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी धुराडे कधी पेटणार, हे पावसाच्या स्थितीवरच ठरणार आहे. परतीचा पाऊस दसऱ्यामध्ये पडला तर हंगाम सुरू होण्यास नोव्हेंबर उजाडू शकतो असे आजचे चित्र आहे.यंदा दसरा ५ ऑक्टोबरला आहे. दिवाळी २४ ऑक्टोबरला आहे. पश्चिम महाराष्ट्रात आजपासून पाऊस पूर्णत: पंधरा दिवस थांबला तरच १५ तारखेपासून हंगाम सुरू होईल अशी शेतीची स्थिती आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात शेतात पाणी आहे. अलीकडील काही वर्षांत दसऱ्यातही पाऊस होत आहे तसे झाल्यास जाहीर केलेल्या तारखेला कारखाने सुरू होण्यास अडचणी येतील असे दिसते. मराठवाड्यात पावसाची फारशी अडचण नाही परंतु तिथे कारखाने लवकर सुरू होत नाहीत. कारण तिथे आडसालीचे क्षेत्रच नसते. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये गाळपासाठी त्यांना ऊसच उपलब्ध नसतो.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऊस परिषद यंदा १५ ऑक्टोबरलाच आहे. यंदा एकरकमी एफआरपी देण्याची बहुतांशी सर्वच कारखान्यांची तयारी आहे. कोल्हापुरात जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेत माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी तशी घोषणाच केली आहे; परंतु संघटनेने एकरकमी एफआरपीच्यावर टनाला किती देणार ते सांगा मगच उसाला हात लावा, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याचा परिणाम पश्चिम महाराष्ट्रातील हंगामावर होऊ शकतो.

यंदा पाऊस सरासरीएवढा झाला असला तरी कुठेच महापूर आलेला नाही. ऊसपिकाला लागेल तसाच पाऊस झाला आहे. त्यामुळे नदीकाठच्या पिकांचे अजिबात नुकसान झालेलेे नाही. परिणामी यंदाही गाळप जास्त होणार आहे. त्यामुळे हंगाम वेळेत सुरू करणे व त्यानुसार गाळपाचे नियोजन करण्याचे आव्हान राज्य सरकारसमोर आहे.

चढ-उतार असेही..साखर उद्योगातील जाणकारांच्या मते कोणत्याही कारखान्याचा १८० दिवसांचा हंगाम हा आर्थिकदृष्या योग्य मानला जातो. परंतु राज्यातील हंगामामध्ये त्यात बरेच चढ-उतार आहेत. गत हंगामात कोल्हापूर-१४४ दिवस, पुणे- १८०, सोलापूर-१७२, अहमदनगर-१८१,औरंगाबाद-१८८, नांदेड-१९१,अमरावती-१६६ आणि नागपूर विभागात १२४ दिवस हंगाम सुरू राहिला.

तीन जिल्ह्यांतच निम्मे गाळप

गतवर्षी सोलापूर, अहमदनगर व पुणे जिल्ह्यात ५६९ लाख टन गाळप झाले होते. राज्यात एकूण १३२० लाख टन गाळप झाले आहे. या तिन्ही जिल्ह्यातील हंगाम १५ पासून सुरू होऊ शकतो. कारण तिथे ऊसही भरपूर आहे आणि पावसाचीही अडचण फारशी येत नाही. पाऊस झाला तरी जमिनी निचऱ्याच्या असल्याने तोडी सुरू करता येतात.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने