शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या लहरीवरच ठरणार यंदाचा ऊस गाळप हंगाम

By विश्वास पाटील | Updated: September 20, 2022 15:37 IST

परतीचा पाऊस दसऱ्यामध्ये पडला तर हंगाम सुरू होण्यास नोव्हेंबर उजाडू शकतो असे आजचे चित्र आहे.

विश्वास पाटीलकोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने यंदाचा हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी धुराडे कधी पेटणार, हे पावसाच्या स्थितीवरच ठरणार आहे. परतीचा पाऊस दसऱ्यामध्ये पडला तर हंगाम सुरू होण्यास नोव्हेंबर उजाडू शकतो असे आजचे चित्र आहे.यंदा दसरा ५ ऑक्टोबरला आहे. दिवाळी २४ ऑक्टोबरला आहे. पश्चिम महाराष्ट्रात आजपासून पाऊस पूर्णत: पंधरा दिवस थांबला तरच १५ तारखेपासून हंगाम सुरू होईल अशी शेतीची स्थिती आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात शेतात पाणी आहे. अलीकडील काही वर्षांत दसऱ्यातही पाऊस होत आहे तसे झाल्यास जाहीर केलेल्या तारखेला कारखाने सुरू होण्यास अडचणी येतील असे दिसते. मराठवाड्यात पावसाची फारशी अडचण नाही परंतु तिथे कारखाने लवकर सुरू होत नाहीत. कारण तिथे आडसालीचे क्षेत्रच नसते. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये गाळपासाठी त्यांना ऊसच उपलब्ध नसतो.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऊस परिषद यंदा १५ ऑक्टोबरलाच आहे. यंदा एकरकमी एफआरपी देण्याची बहुतांशी सर्वच कारखान्यांची तयारी आहे. कोल्हापुरात जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेत माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी तशी घोषणाच केली आहे; परंतु संघटनेने एकरकमी एफआरपीच्यावर टनाला किती देणार ते सांगा मगच उसाला हात लावा, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याचा परिणाम पश्चिम महाराष्ट्रातील हंगामावर होऊ शकतो.

यंदा पाऊस सरासरीएवढा झाला असला तरी कुठेच महापूर आलेला नाही. ऊसपिकाला लागेल तसाच पाऊस झाला आहे. त्यामुळे नदीकाठच्या पिकांचे अजिबात नुकसान झालेलेे नाही. परिणामी यंदाही गाळप जास्त होणार आहे. त्यामुळे हंगाम वेळेत सुरू करणे व त्यानुसार गाळपाचे नियोजन करण्याचे आव्हान राज्य सरकारसमोर आहे.

चढ-उतार असेही..साखर उद्योगातील जाणकारांच्या मते कोणत्याही कारखान्याचा १८० दिवसांचा हंगाम हा आर्थिकदृष्या योग्य मानला जातो. परंतु राज्यातील हंगामामध्ये त्यात बरेच चढ-उतार आहेत. गत हंगामात कोल्हापूर-१४४ दिवस, पुणे- १८०, सोलापूर-१७२, अहमदनगर-१८१,औरंगाबाद-१८८, नांदेड-१९१,अमरावती-१६६ आणि नागपूर विभागात १२४ दिवस हंगाम सुरू राहिला.

तीन जिल्ह्यांतच निम्मे गाळप

गतवर्षी सोलापूर, अहमदनगर व पुणे जिल्ह्यात ५६९ लाख टन गाळप झाले होते. राज्यात एकूण १३२० लाख टन गाळप झाले आहे. या तिन्ही जिल्ह्यातील हंगाम १५ पासून सुरू होऊ शकतो. कारण तिथे ऊसही भरपूर आहे आणि पावसाचीही अडचण फारशी येत नाही. पाऊस झाला तरी जमिनी निचऱ्याच्या असल्याने तोडी सुरू करता येतात.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने