शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात यंदा ४१ फूट पाणीपातळीलाच पन्हाळा रस्ता पाण्यात, आपत्ती व्यवस्थापनाकडूनही अभ्यास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 13:58 IST

कारणे काय..?.. जाणून घ्या

कोल्हापूर : याआधी २०१९ आणि २०२१ मधील पुराच्या वेळी जेव्हा पंचगंगा नदीची राजाराम पातळीवरील पातळी ४३ फूट अशी धोक्याची होती त्याचवेळी पन्हाळा रस्त्यावर पाणी आले होते. परंतु, यंदा यात मोठा फरक पडला असून, ही पातळी ४१ फुटांवर असतानाच पन्हाळा रस्त्यावर पाणी आले आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागही याचा अभ्यास करीत आहे.सन २००० नंतर आलेल्या तीनही पुरांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात मोठे नुकसान झाले होते. जीवितहानी आणि मोठ्या प्रमाणावर पशुधनाची हानी झाली होती. पंचगंगेची राजाराम बंधाऱ्याची पातळी जेव्हा ३९ फुटांवर असते तेव्हा ती ‘इशारा पातळी’ मानली जाते. त्यामुळे या पातळीवर पाणी गेले की प्रशासन अलर्ट मोडवर येते. नागरिकांनाही या पाणीपातळीची माहिती असल्याने सुतार मळा, शाहूपुरीतील कुंभार गल्ली, बापट कॅम्प, कसबा बावड्याकडील नदीकाठचा परिसर या सगळ्यांनी कधी घराबाहेर पडायचे हे ठरवलेले असते. चिखली, आंबेवाडीचे ग्रामस्थही पूर्वानुभवावरून याबाबत निर्णय घेतात.परंतु, यावेळी ४३ फुटांवर पाणी येण्याआधीच ते राजाराम बंधाऱ्यावर ४१ फुटांवर असतानाच कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर पाणी आले आहे. हाच हिशोब लावला तर जो राष्ट्रीय महामार्ग याआधीच्या महापुरावेळी ५० फुटांची पातळी असताना बुडाला होता तो ४८ फुटांच्या पातळीवरच बुडू शकतो. ही शक्यता गृहीत धरून आपत्ती व्यवस्थापन विभागदेखील वेगळ्या पद्धतीने याचा हिशोब लावू पाहत आहे.

कारणे काय..?महापूर आला, नुकसान झाले की कोल्हापूरला ब्लू लाइन, रेडझोनची आठवण येते. त्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी होते. त्यावर चर्चाही झडतात. परंतु, पूर ओसरला, पाणी कमी झाले की मागील पानांवरून पुढे असा अनुभव नेहमीच येतो. त्यामुळे नदीपात्रालगतच टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. जिथे नवीन पुलांचे बांधकाम होत आहे, तिथे मुरुमांचे ढीग ओतून रस्ते उंच केले जात आहेत. त्यामुळे पाण्याचा नैसर्गिक निचरा होण्यास अडचणी येत असल्याने पुराचे पाणी तुंबून राहत आहे. परंतु, त्यापासून आपण आजपर्यंत काही धडा घेतलेला नाही, यापुढेही काही घेऊ असे वाटत नाही.रात्रीच्या वेळी सजग राहण्याची गरजजिल्ह्याच्या विविध धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दिवसरात्र पाऊस सुरू आहे. राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर १४ तासांनी हे पाणी कोल्हापुरात पोहोचते. त्यामुळे या सोडलेल्या पाण्याचा नेमका परिणाम हा शुक्रवारी पहाटे जाणवणार आहे. परंतु, कोल्हापूर शहरासह सर्वत्र पाऊस असल्याने याआधी मध्यरात्री नागरिकांना हलवताना प्रचंड तणाव प्रशासनावरही आला होता आणि नागरिकही त्यावेळी अडचणीत आले होते. हा अनुभव लक्षात घेऊन नागरिक आणि प्रशासनाने रात्रीच्या वेळी सजग राहण्याची गरज आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही याच मुद्द्यावर भर दिला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरroad transportरस्ते वाहतूक