शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

कोल्हापुरात यंदा ४१ फूट पाणीपातळीलाच पन्हाळा रस्ता पाण्यात, आपत्ती व्यवस्थापनाकडूनही अभ्यास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 13:58 IST

कारणे काय..?.. जाणून घ्या

कोल्हापूर : याआधी २०१९ आणि २०२१ मधील पुराच्या वेळी जेव्हा पंचगंगा नदीची राजाराम पातळीवरील पातळी ४३ फूट अशी धोक्याची होती त्याचवेळी पन्हाळा रस्त्यावर पाणी आले होते. परंतु, यंदा यात मोठा फरक पडला असून, ही पातळी ४१ फुटांवर असतानाच पन्हाळा रस्त्यावर पाणी आले आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागही याचा अभ्यास करीत आहे.सन २००० नंतर आलेल्या तीनही पुरांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात मोठे नुकसान झाले होते. जीवितहानी आणि मोठ्या प्रमाणावर पशुधनाची हानी झाली होती. पंचगंगेची राजाराम बंधाऱ्याची पातळी जेव्हा ३९ फुटांवर असते तेव्हा ती ‘इशारा पातळी’ मानली जाते. त्यामुळे या पातळीवर पाणी गेले की प्रशासन अलर्ट मोडवर येते. नागरिकांनाही या पाणीपातळीची माहिती असल्याने सुतार मळा, शाहूपुरीतील कुंभार गल्ली, बापट कॅम्प, कसबा बावड्याकडील नदीकाठचा परिसर या सगळ्यांनी कधी घराबाहेर पडायचे हे ठरवलेले असते. चिखली, आंबेवाडीचे ग्रामस्थही पूर्वानुभवावरून याबाबत निर्णय घेतात.परंतु, यावेळी ४३ फुटांवर पाणी येण्याआधीच ते राजाराम बंधाऱ्यावर ४१ फुटांवर असतानाच कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर पाणी आले आहे. हाच हिशोब लावला तर जो राष्ट्रीय महामार्ग याआधीच्या महापुरावेळी ५० फुटांची पातळी असताना बुडाला होता तो ४८ फुटांच्या पातळीवरच बुडू शकतो. ही शक्यता गृहीत धरून आपत्ती व्यवस्थापन विभागदेखील वेगळ्या पद्धतीने याचा हिशोब लावू पाहत आहे.

कारणे काय..?महापूर आला, नुकसान झाले की कोल्हापूरला ब्लू लाइन, रेडझोनची आठवण येते. त्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी होते. त्यावर चर्चाही झडतात. परंतु, पूर ओसरला, पाणी कमी झाले की मागील पानांवरून पुढे असा अनुभव नेहमीच येतो. त्यामुळे नदीपात्रालगतच टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. जिथे नवीन पुलांचे बांधकाम होत आहे, तिथे मुरुमांचे ढीग ओतून रस्ते उंच केले जात आहेत. त्यामुळे पाण्याचा नैसर्गिक निचरा होण्यास अडचणी येत असल्याने पुराचे पाणी तुंबून राहत आहे. परंतु, त्यापासून आपण आजपर्यंत काही धडा घेतलेला नाही, यापुढेही काही घेऊ असे वाटत नाही.रात्रीच्या वेळी सजग राहण्याची गरजजिल्ह्याच्या विविध धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दिवसरात्र पाऊस सुरू आहे. राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर १४ तासांनी हे पाणी कोल्हापुरात पोहोचते. त्यामुळे या सोडलेल्या पाण्याचा नेमका परिणाम हा शुक्रवारी पहाटे जाणवणार आहे. परंतु, कोल्हापूर शहरासह सर्वत्र पाऊस असल्याने याआधी मध्यरात्री नागरिकांना हलवताना प्रचंड तणाव प्रशासनावरही आला होता आणि नागरिकही त्यावेळी अडचणीत आले होते. हा अनुभव लक्षात घेऊन नागरिक आणि प्रशासनाने रात्रीच्या वेळी सजग राहण्याची गरज आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही याच मुद्द्यावर भर दिला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरroad transportरस्ते वाहतूक