शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Kolhapur: चोरट्यांनी काजू फँक्टरी फोडली, साडेपाच लाखांचा काजूगर लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 13:33 IST

सुनिल चौगले आमजाई व्हरवडे : राधानगरी तालुक्यातील आमजाई व्हरवडे येथील काजू प्रक्रिया फँक्टरीचे पत्रे फोडून चोरट्यांनी साडेपाच लाख रुपये ...

सुनिल चौगलेआमजाई व्हरवडे : राधानगरी तालुक्यातील आमजाई व्हरवडे येथील काजू प्रक्रिया फँक्टरीचे पत्रे फोडून चोरट्यांनी साडेपाच लाख रुपये किंमतीचा काजूगर लंपास केला. गेल्या काही दिवसापासून काजू कारखान्यावर चोरीचे प्रकार वाढले असून अशी काजूगर चोरणारी टोळीच असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.याबाबत पोलिस व घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, भोगावती राधानगरी राज्यमार्गावर आमजाई व्हरवडे येथे अनिकेत यशवंत चौगले यांचा महालक्ष्मी काजू प्रक्रिया कारखाना आहे. गुरुवारी (दि.२५) रात्री कारखाना बंद करुन ते घरी आले. शुक्रवारी पहाटे परत कारखान्यात गेले असता कारखान्याचे पत्रे उचकटलेले व दरवाजा उघडा असल्याचे लक्षात आले. आत जाऊन बघितले असता पाच लाख रुपये किंमतीचा सातशे किलो काजूगर व बारा हजार रोख रक्कम चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. शिवाय चोरट्यानी सीसीटीव्हीचे माँनिटर व स्किनही लंपास केली. घटनास्थळाचा पंचनामा करुन राधानगरी पोलिस पुढील तपास करीत आहेत.गेल्या पंधरा दिवसात चौथी घटनाबेरोजगार तरुण लाखो रुपयांचे कर्ज काढून काजू प्रक्रिया उद्योग करत आहेत. पण गेल्या पंधरा दिवसात चार कारखान्यावर चोरीची ही चौथी घटना आहे. यामुळे काजूगर चोरणारी टोळीच असण्याची शक्यता असल्यामुळे त्यादृष्टीने पोलिसांनी तपास करावा अशी मागणी काजूगर कारखानदांरानी केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी