शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

दिवस मावळतीला त्यांचे मन होते सैरभैर : पोराटोरांंच्या ओढीने डोळे डबडबतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:38 IST

दिवस मावळतीला लागला की त्यांचे मन सैरभैर होते, शरीर जरी इथे असले तरी मन मात्र कधीच गावाकडे पोहोचते. पोरं, सुना नातवंडं काय करीत असतील, बाजारहाट झाला असेल का, चूल पेटली असेल का, गुराढोरांना वैरण पाणी मिळाले असेल का, अशा एक ना अनेक प्रश्नांचे काहूर मनात

ठळक मुद्दे- धरणग्रस्त महिलांचे ठिय्या आंदोलन

कोल्हापूर : दिवस मावळतीला लागला की त्यांचे मन सैरभैर होते, शरीर जरी इथे असले तरी मन मात्र कधीच गावाकडे पोहोचते. पोरं, सुना नातवंडं काय करीत असतील, बाजारहाट झाला असेल का, चूल पेटली असेल का, गुराढोरांना वैरण पाणी मिळाले असेल का, अशा एक ना अनेक प्रश्नांचे काहूर मनात दाटते, डोळ््यांच्या कडा कधी ओलावतात हेदेखील कळत नाही. पोरांच्या गुरांच्या ओढीने डोळे डबडबतात, पण आपण सोसलेलं पोराबाळांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यांनी उरावर दगड ठेवला आहे.

या व्यथा आहेत कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या अकरा दिवसांपासून ठिय्या आंदोलनात सहभागी झालेल्या प्रकल्प व अभयारण्यग्रस्त महिलांच्या. चांदोली, वारणा, धामणी, सर्फनाला, उचंगी या प्रकल्पाच्या विस्थापितांच्या या आंदोलनात कर्त्या पुरुषांच्या बरोबरीने म्हाताऱ्या बायकांसह आठवी, नववीत शिकणाºया मुलीही गाठोड्यासह आंदोलनस्थळी बसून आहेत. कर्ता पुरुष, बाई एक दिवस घराबाहेर गेले तर कुटुंबाचा जगण्याचा क्रमच बदलतो. या बायाबापड्या तर अकरा दिवसांपासून गाव, घर, कुटुंबापासून लांब आहेत. रात्री उघड्यावरच झोपतोय, गावाकडून भाकरी आली तर जेवायचे नाही, तर पाणी पिऊन झोपायचे. प्रातर्विधीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोय असली तरी अंघोळीसाठी पंचगंगा नदी गाठावी लागते. स्वत:च्या मालकीची शेतं, घरंदारं सोडून परक्या गावाचा आसरा घ्यावा लागला.

याला २0 वर्षे लोटली. तरी अजून घरं नाहीत, जमिनी नाहीत, पाणी नाही, हाताला रोजगार नाही तरी पण आम्ही जगण्याची लढाई लढतोय, शासन दखल घ्यायला तयार नाही, आता लई झालं, घेतल्या बिगर इथनं उठणारच नाय, मग गावाकडं आमच्या लेकराबाळाची आबाळ झाली तरी चालंल, पण हक्काचं घेऊनच उठणार, अशा पोटतिडकीने बनाबाई, हौसाबाई, सोनाबाई, जनाबाई बोलू लागतात. सर्वजणी डोळे पुसत त्याच त्वेषाने लढ्याचा निर्धार करतात.घरदार वाºयावर सोडूनहौसाबाई पाटील सांगतात, माझं,पोरगं स्वत:च्या हाताने भात करून खातं, जैनावरांची वैरण पाणी सांभाळून शाळेला जाताना त्यातील भातावर थोडी चटणी टाकून आंदोलनस्थळी डबा पाठवतो. बनाबाई राऊत यांची सून नातवंडांना, गुराढोरांना सांभाळत जेवणाचा डबा पाठवून देते. जनाबाई कापसे यांची कथा तर यापेक्षा जरा वेगळी. सुना वेगळ्या राहतात. नवºयाचे निधन झाले आहे. एकटीच असल्याने आंदोलनस्थळी डबा आणून द्यायला कोणी नाही. आजूबाजूच्या बायाबापड्यांनी दिलेल्या जेवणावर पोटाची भूक भागवितात. गावाकडं मुलगी, मुलगा आहे, घरदार वाºयावर सोडून येथे येऊन बसले आहे. गावाकडची अशी आठवण सांगताना सोनाबाई उंडे कासावीस होतात.

राहिले दूर घर माझे...प्रकल्प, अभयारण्यग्रस्त गेल्या अकरा दिवसांपासून कोेल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करीत आहेत. महिलांची संख्या यात लक्षणीय आहे, शरीराने जरी त्या आंदोलनस्थळी असल्या तरी त्यांचे मन मात्र गावाकडच्या आठवणीने गलबलून जाते.रात्री उघड्यावरच झोपतोय, गावाकडून भाकरी आली तर जेवायचे नाही, तर पाणी पिऊन झोपायचे. अंघोळीसाठी पंचगंगा नदी गाठावी लागते. स्वत:च्या मालकीची शेतं, घरंदारं सोडून परक्या गावाचा आसरा घ्यावा लागला, तरीही आम्ही जगण्याची लढाई लढतोय.

टॅग्स :DamधरणMONEYपैसा