शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
4
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
5
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
6
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
7
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
8
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
9
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
10
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
11
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
12
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
13
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
14
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
15
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
16
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
17
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
18
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
19
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
20
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय

दिवस मावळतीला त्यांचे मन होते सैरभैर : पोराटोरांंच्या ओढीने डोळे डबडबतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:38 IST

दिवस मावळतीला लागला की त्यांचे मन सैरभैर होते, शरीर जरी इथे असले तरी मन मात्र कधीच गावाकडे पोहोचते. पोरं, सुना नातवंडं काय करीत असतील, बाजारहाट झाला असेल का, चूल पेटली असेल का, गुराढोरांना वैरण पाणी मिळाले असेल का, अशा एक ना अनेक प्रश्नांचे काहूर मनात

ठळक मुद्दे- धरणग्रस्त महिलांचे ठिय्या आंदोलन

कोल्हापूर : दिवस मावळतीला लागला की त्यांचे मन सैरभैर होते, शरीर जरी इथे असले तरी मन मात्र कधीच गावाकडे पोहोचते. पोरं, सुना नातवंडं काय करीत असतील, बाजारहाट झाला असेल का, चूल पेटली असेल का, गुराढोरांना वैरण पाणी मिळाले असेल का, अशा एक ना अनेक प्रश्नांचे काहूर मनात दाटते, डोळ््यांच्या कडा कधी ओलावतात हेदेखील कळत नाही. पोरांच्या गुरांच्या ओढीने डोळे डबडबतात, पण आपण सोसलेलं पोराबाळांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यांनी उरावर दगड ठेवला आहे.

या व्यथा आहेत कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या अकरा दिवसांपासून ठिय्या आंदोलनात सहभागी झालेल्या प्रकल्प व अभयारण्यग्रस्त महिलांच्या. चांदोली, वारणा, धामणी, सर्फनाला, उचंगी या प्रकल्पाच्या विस्थापितांच्या या आंदोलनात कर्त्या पुरुषांच्या बरोबरीने म्हाताऱ्या बायकांसह आठवी, नववीत शिकणाºया मुलीही गाठोड्यासह आंदोलनस्थळी बसून आहेत. कर्ता पुरुष, बाई एक दिवस घराबाहेर गेले तर कुटुंबाचा जगण्याचा क्रमच बदलतो. या बायाबापड्या तर अकरा दिवसांपासून गाव, घर, कुटुंबापासून लांब आहेत. रात्री उघड्यावरच झोपतोय, गावाकडून भाकरी आली तर जेवायचे नाही, तर पाणी पिऊन झोपायचे. प्रातर्विधीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोय असली तरी अंघोळीसाठी पंचगंगा नदी गाठावी लागते. स्वत:च्या मालकीची शेतं, घरंदारं सोडून परक्या गावाचा आसरा घ्यावा लागला.

याला २0 वर्षे लोटली. तरी अजून घरं नाहीत, जमिनी नाहीत, पाणी नाही, हाताला रोजगार नाही तरी पण आम्ही जगण्याची लढाई लढतोय, शासन दखल घ्यायला तयार नाही, आता लई झालं, घेतल्या बिगर इथनं उठणारच नाय, मग गावाकडं आमच्या लेकराबाळाची आबाळ झाली तरी चालंल, पण हक्काचं घेऊनच उठणार, अशा पोटतिडकीने बनाबाई, हौसाबाई, सोनाबाई, जनाबाई बोलू लागतात. सर्वजणी डोळे पुसत त्याच त्वेषाने लढ्याचा निर्धार करतात.घरदार वाºयावर सोडूनहौसाबाई पाटील सांगतात, माझं,पोरगं स्वत:च्या हाताने भात करून खातं, जैनावरांची वैरण पाणी सांभाळून शाळेला जाताना त्यातील भातावर थोडी चटणी टाकून आंदोलनस्थळी डबा पाठवतो. बनाबाई राऊत यांची सून नातवंडांना, गुराढोरांना सांभाळत जेवणाचा डबा पाठवून देते. जनाबाई कापसे यांची कथा तर यापेक्षा जरा वेगळी. सुना वेगळ्या राहतात. नवºयाचे निधन झाले आहे. एकटीच असल्याने आंदोलनस्थळी डबा आणून द्यायला कोणी नाही. आजूबाजूच्या बायाबापड्यांनी दिलेल्या जेवणावर पोटाची भूक भागवितात. गावाकडं मुलगी, मुलगा आहे, घरदार वाºयावर सोडून येथे येऊन बसले आहे. गावाकडची अशी आठवण सांगताना सोनाबाई उंडे कासावीस होतात.

राहिले दूर घर माझे...प्रकल्प, अभयारण्यग्रस्त गेल्या अकरा दिवसांपासून कोेल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करीत आहेत. महिलांची संख्या यात लक्षणीय आहे, शरीराने जरी त्या आंदोलनस्थळी असल्या तरी त्यांचे मन मात्र गावाकडच्या आठवणीने गलबलून जाते.रात्री उघड्यावरच झोपतोय, गावाकडून भाकरी आली तर जेवायचे नाही, तर पाणी पिऊन झोपायचे. अंघोळीसाठी पंचगंगा नदी गाठावी लागते. स्वत:च्या मालकीची शेतं, घरंदारं सोडून परक्या गावाचा आसरा घ्यावा लागला, तरीही आम्ही जगण्याची लढाई लढतोय.

टॅग्स :DamधरणMONEYपैसा