शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: विनाशिक्षिका शाळांमध्येही मुलींशी होणार संवाद, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतली दखल

By समीर देशपांडे | Updated: September 13, 2025 12:47 IST

जिल्ह्यातील ७०० प्राथमिक शाळा या विनाशिक्षिका असून या शाळांमधील मुलींनी समस्या मांडायच्या कोणाकडे असा प्रश्न ‘लोकमत’ने शुक्रवारच्या अंकात उपस्थित केला होता

समीर देशपांडे कोल्हापूर : जिल्ह्यातील ७०० प्राथमिक शाळा या विनाशिक्षिका असून या शाळांमधील मुलींनी समस्या मांडायच्या कोणाकडे असा प्रश्न ‘लोकमत’ने शुक्रवारच्या अंकात उपस्थित केला होता. याची दखल घेत सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी शुक्रवारच्या बैठकीत याबाबत पर्याय काढण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांना सूचना केल्या. त्यानुसार आठवड्यातून किमान एखादा दिवस या मुलींशी संवाद साधण्यात येणार असल्याचा उपक्रम कोल्हापूरजिल्हा परिषद राबवेल, असे कार्तिकेयन यांनी स्पष्ट केले आहे.कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या एकूण १९५८ शाळांपैकी तब्बल ७०० शाळांमध्ये शिक्षिका नाहीत. त्यामुळे अनेकवेळा शाळेतील मुलींना त्यांच्या आरोग्यापासून ते वैयक्तिक अनुभवाविषयी बोलायचे असेल तर शिक्षकांशी बोलताना मर्यादा येतात. आपल्या बाईंशी एखादी विद्यार्थिनी जितक्या मोकळेपणाने बोलू शकेल तसे शिक्षकांबाबत होऊ शकत नाही. शिक्षिकांच्या व्यक्तिमत्त्वाचाही मोठा प्रभाव मुलींवर होत असतो. त्यामुळेच हा विषय शुक्रवारच्या अंकामध्ये ‘लोकमत’मधून मांडला होता. याबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी लक्ष घालावे, अशीही अपेक्षा व्यक्त केली होती.

वाचा- शिकायचं, मागच्या बाकावर नाही बसायचं; कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ‘नो मोर बॅक बेंच’ संकल्पनासहपालकमंत्री माधुरी मिसाळ या शुक्रवारीच कोल्हापूरच्या दौऱ्यावर होत्या. त्यांनी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीतच त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांना याबाबत विचारणा केली. तेव्हा शासनाच्या धोरणानुसार प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या होत असल्याने त्यावर थेट नियंत्रण नसल्याची वस्तुस्थिती सांगण्यात आली. तेव्हा मिसाळ यांनी पर्याय काढण्याची सूचना कार्तिकेयन यांना केली. त्यानुसार आठवड्यातून एकदा शनिवारी त्या ठिकाणी एक तास या शाळांमधील मुलींशी संवाद साधण्याचा उपक्रम राबविण्यात येईल, असे कार्तिकेयन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

तर राज्यात असा निर्णय घेणारा पहिला जिल्हा कोल्हापूरराज्यातील सर्वच जिल्ह्यात अशा पद्धतीने विनाशिक्षिका हजारो शाळा आहेत. जर कोल्हापूर जिल्हा परिषदेने या विनाशिक्षिका शाळा असलेल्या शाळांमध्ये मुलींशी साप्ताहिक संवाद उपक्रमाला सुरुवात केली तर असा उपक्रम राबविणारा कोल्हापूर हा राज्यातील पहिला जिल्हा ठरणार आहे.