शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
20
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या चालेनात, नव्यांची भर; कोल्हापूर जिल्ह्यात नव्याने होणार आठ बाजार समित्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 17:17 IST

कोल्हापूर : प्रत्येक तालुक्याला बाजार समिती या धोरणानुसार ‘मुख्यमंत्री बाजार समिती योजना’मधून जिल्ह्यातील आठ तालुक्यांना नवीन बाजार समित्या मंजूर ...

कोल्हापूर : प्रत्येक तालुक्याला बाजार समिती या धोरणानुसार ‘मुख्यमंत्री बाजार समिती योजना’मधून जिल्ह्यातील आठ तालुक्यांना नवीन बाजार समित्या मंजूर झाल्या आहेत. यामध्ये पन्हाळा, शाहूवाडी, कागल, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, चंदगड आणि आजरा तालुक्याचा समावेश आहे. सहकार, पणन विभागाने शुक्रवारी याबाबतचा शासन आदेश काढला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्चमध्ये झालेल्या अधिवेशनामध्ये याबाबत घोषणा केली होती. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व कृषि मालाच्या वितरणाकरिता एकाच ठिकाणी सुविधा, सोय व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्याला कृषि उत्पन्न बाजार समिती आवश्यक असल्याचे शासनाचे मत होते. परंतु, राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी ६८ तालुक्यांमध्ये बाजार समित्या अस्तित्वात नव्हत्या. त्यामुळे प्रत्येक तालुक्याला बाजार समिती, असे धोरण शासनाने ठरवले आणि त्यानुसार हा शासन आदेश काढण्यात आला आहे.

सध्या कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड आणि अर्धा कागल तालुका समाविष्ट आहे. गडहिंग्लज बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात गडहिंग्लज, आजरा, चंदगड आणि अर्धा कागल तालुका समाविष्ट आहे. हातकणंगले तालुक्यासाठी वडगाव बाजार समिती तर शिरोळ तालुक्यासाठी जयसिंगपूर बाजार समिती आहेत. त्यामुळे आता या नव्या शासन निर्णयानुसार कोल्हापूर आणि गडहिंग्लज बाजार समितीमधून हे सर्व तालुके वगळून प्रत्येक तालुक्याला नवीन बाजार समिती स्थापन होणार आहे.

किमान १० ते १५ एकर जागा आवश्यकजिल्ह्यातील या नव्याने स्थापन होणाऱ्या बाजार समितीसाठी किमान १० आणि कमाल १५ एकर जागा आवश्यक असल्याचे शासन आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रत्येक तालुकास्तरावर आता या जागेचा शोध सहकार विभागाला घ्यावा लागणार आहे.

कशासाठी अट्टाहाससध्याच्या बाजार समित्या तोट्यात चालल्या असताना, तिथल्या कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नसताना, तेथील मुलभूत सोयी सुविधांसाठी बाजार समित्यांकडे निधी उपलब्ध नसताना या प्रत्येक तालुक्याला नव्या बाजार समित्यांचा अट्टाहास कशासाठी असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarket Yardमार्केट यार्ड