शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

लेखापरीक्षकांनीच आक्षेप घेतल्याने माफी मागण्याचा प्रश्नच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:44 IST

उत्तूर : कोरोनाकाळातील झालेल्या खरेदीमध्ये ३५ कोटींचा गैरव्यवहार झाल्याबाबत लेखापरीक्षकांनी आक्षेप घेतले असून, याच विषयावरील बातम्यांच्या अनुषंगाने ...

उत्तूर :

कोरोनाकाळातील झालेल्या खरेदीमध्ये ३५ कोटींचा गैरव्यवहार झाल्याबाबत लेखापरीक्षकांनी आक्षेप घेतले असून, याच विषयावरील बातम्यांच्या अनुषंगाने विधानसभेतही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आवाज उठवून याची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई केली आहे. त्याचा या भूमिकेशी भाजपाचा पाठिंबा असून, आम्हीसुद्धा मागणी करीत आहोत. त्यांच्या कार्यकाळात हे घडल्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे जाहीर माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे प्रसिद्धीपत्रक उत्तूर भाजपने प्रसिद्धीस दिले आहे.

आंबेओहोळ प्रकल्पासाठी २२७ कोटी रुपयांचा निधी मागील सरकारच्या काळात मंजूर झाला होता. या निधीतून प्रकल्पाचे व रखडलेली कामे व पुनर्वसन अपेक्षित असतानाही सत्ताधाऱ्यांनी पुनर्वसनाचे काम योग्य पद्धतीने केले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी 'आधी पुनर्वसन...मग धरण..' या भूमिकेशी ठाम आहेत. आम्ही आवाज उठविला तर सामान्य कार्यकर्त्यांवर एक कोटी रुपयांचे दावा टाकण्याची धमकी देऊन प्रकल्पग्रस्तांना धमकावण्याचा हा प्रयत्न निंदनीय आहे. त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो. प्रकल्पग्रस्तांच्या परिस्थितीला सध्याचे सत्ताधारी जबाबदार असून, येथील शेतकरी व प्रकल्पग्रस्त यांची माफी मागावी, असा पलटवार भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे. हा प्रकल्प पूर्ण व्हावा, यासाठी समरजित घाटगे व आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत. जे चुकीचे आहे, त्याविरोधात आवाज उठवित आहोत. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याविषयी बोला. त्यावर न बोलता दावा ठोकण्याची भीती दाखवू नका.

पत्रकावर प्रदीप लोकरे, आतिष देसाई, श्रीपती यादव आदींसह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरी आहेत.

दहपशाहीची संस्कृती सर्वांना माहीत आहे

राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते व त्यांची नेत्यांकडून विकासकामे मार्गी लावण्याची अपेक्षा सर्वसामान्य जनता बाळगून आहे. यात चुकीचे काय? मात्र त्यांना प्रतिप्रश्न विचारल्यावर दावा ठोकण्याची धमकी देतात, हा त्यांचा पहिला प्रकार नसून, यापूर्वीही त्यांनी जिल्ह्यातील, राज्यातील नेते व कार्यकर्त्यांना असा दावा ठोकण्याची धमकी देऊन घाबरविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांची ही दडपशाही संस्कृती सर्वांनाच माहिती आहे.