शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

खुल्या जागांची ९ तालुक्यांतून माहितीच नाही : कोल्हापूर जिल्हा परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:45 IST

समीर देशपांडे ।कोल्हापूर : खुद्द जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सातत्याने समन्वय सभांमधून सांगून आणि लेखी माहिती मागवूनही जिल्ह्यातील १२ पैकी केवळ ३ गटविकास अधिकाºयांनी आपापल्या तालुक्यांतील खुल्या जागांची माहिती पाठविण्याची तसदी घेतली आहे. ‘करवीर’ने चांगल्या पद्धतीने माहितीचे संकलन केले आहे तर ‘शिरोळ’नेही बºयापैकी माहिती दिली ...

ठळक मुद्देकरवीर, शिरोळचा तक्ता तयार, बाकींच्याकडून दुर्लक्षच, कागदपत्रेच गायबखुल्या जागाही मोक्याच्या ठिकाणी आहेत

समीर देशपांडे ।कोल्हापूर : खुद्द जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सातत्याने समन्वय सभांमधून सांगून आणि लेखी माहिती मागवूनही जिल्ह्यातील १२ पैकी केवळ ३ गटविकास अधिकाºयांनी आपापल्या तालुक्यांतील खुल्या जागांची माहिती पाठविण्याची तसदी घेतली आहे. ‘करवीर’ने चांगल्या पद्धतीने माहितीचे संकलन केले आहे तर ‘शिरोळ’नेही बºयापैकी माहिती दिली आहे. पन्हाळ्यातून चार झेरॉक्स पाठविण्यात आल्या आहेत.

ग्रामपंचायतींच्या खुल्या जागांचा ताबा देण्यासाठी मूळ मालक कधीच तयार होत नाही आणि ग्रामपंचायतीची यंत्रणाही त्यासाठी प्रयत्न करत नाही. गावपातळीवर लागेबांधे असल्याने अनेकदा यासाठी पाठपुरावाही केला जात नाही. परिणामी अनेक वर्षे ही जागा मूळ मालकाच्या नावेच राहते आणि मग महसूल खात्यातील ‘नेमक्यांना’ गाठून गुंठेवारी करून ही सार्वजनिक जागाही विकून खाण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. आठ महिन्यांपूर्वी ‘लोकमत’ने हा विषय ऐरणीवर आणला. अशातच पाचगांव, शिंगणापूर येथे सार्वजनिक जागाही घशात घालण्याचे प्रकार उघडकीस आले.

‘लोकमत’ने याबाबत वस्तुस्थिती मांडल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. खेमनार यांनी तातडीने याची दखल घेतली. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांना याबाबत सविस्तर परिपत्रक तयार करण्याच्या सूचना दिल्या. भालेराव यांनी महसूल खाते, शासनाचे विविध आदेशांचा अभ्यास करून तक्ता तयार करून याद्वारे माहिती पाठविण्याचे परिपत्रक गेल्यावर्षी आॅक्टोबर महिन्यामध्ये काढले. त्यानंतर झालेल्या प्रत्येक समन्वय समितीच्या बैठकीमध्ये डॉ. खेमनार यांनी ही माहिती पाठविण्याबाबत गटविकास अधिकाºयांना सूचना केल्या.गेल्या आठवड्यापर्यंत करवीर, शिरोळ आणि पन्हाळा पंचायत समितीकडूनच अहवाल प्राप्त झाले आहेत. उर्वरित ९ तालुक्यांकडूनही ही माहिती मिळालेली नाही. करवीर तालुक्याची माहिती अतिशय नेमकेपणाने अहवालात मांडण्यात आली आहे. कोल्हापूर शहराशेजारी असणाºया या गावांमध्येच वसाहती विकसित झाल्याने या रिकाम्या जागांना मोठे महत्त्व आले आहे. त्यामुळेच गटविकास अधिकारी सचिन घाटगे यांनी या प्रकरणामध्ये वैयक्तिक लक्ष घालून हा अहवाल केल्याचे दिसून येते.

शिरोळचे गटविकास अधिकारी सुशील संसारे यांनीही चांगल्या पद्धतीने माहितीचे संकलन केले आहे. काही कॉलम रिकामे सोडले असले तरी किमान तालुक्यातील खुल्या जागांची स्थिती त्यामुळे लक्षात येते. पन्हाळा पंचायत समितीकडून आलेला अहवाल आणखी सविस्तर हवा होता. हा जुजबी आहे. वास्तविक पन्हाळा परिसरात अनेक ठिकाणी प्लॉट पडले आहेत. तेथील खुल्या जागाही मोक्याच्या ठिकाणी आहेत. या तालुक्याचा सविस्तर अहवाल अपेक्षित आहे.अधिकाºयांना अडचण काय?एकीकडे जिल्हा परिषदेचे प्रमुख अधिकारी असलेले डॉ. खेमनार यांनी हा विषय प्राधान्यक्रमाने हाताळण्याचे ठरविले आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार आणि विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याशीही प्राथमिक चर्चा केली आहे तरीही १२ पैकी ९ गटविकास अधिकाºयांनी हे अहवाल पाठविलेले नाहीत. त्यामुळे अधिकाºयांना नेमकी अडचण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये या खुल्या जागांबाबतची कागदपत्रेच सापडत नसल्याचे समजते. अशा ग्रामपंचायतींवर कारवाई करण्याचे धाडस आता दाखवावे लागेल.शिक्षक, जि. प. कर्मचारी वसाहतींच्या  खुल्या जागाही विनाताबाकोल्हापूर हे जिल्ह्याचे ठिकाणी असल्याने शहराशेजारील गावांमध्ये काही एकरांमध्ये जागा घेऊन त्या ठिकाणी शिक्षक आणि जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांनी गृहनिर्माण संस्था स्थापन केल्या आहेत. अशा ठिकाणी बंगलेही अनेक वर्षांपूर्वी उभारण्यात आले असले तरीही अशाही संस्थांच्या खुल्या जागा अजूनही ग्रामपंचायतींच्या नावावर नसल्याचे ‘करवीर’च्या अहवालावरून दिसते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकार