शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

देशात नसलेला नियम कोल्हापुरात लावून अडवणूक का करता?, ऊस दरावरुन मंत्री हसन मुश्रीफांचा राजू शेट्टींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 13:28 IST

कोल्हापूर : राज्य व केंद्र सरकारच्या कायद्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाचा दर दिला आहे. कायद्याचे तंतोतंत पालन येथील ...

कोल्हापूर : राज्य व केंद्र सरकारच्या कायद्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाचा दर दिला आहे. कायद्याचे तंतोतंत पालन येथील कारखाने करीत असताना देशात नाही तो नियम कोल्हापुरात लावून शिक्षा का देता? असा सवाल करीत कर्नाटकातील एका कारखान्याने दीड-दोन लाख टनाचे गाळप केले आहे. त्या कारखान्यांना जिल्ह्यातील ऊस जाऊ देता, मग आमचीच आडवणूक का करता? असा आरोप पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांना केला.ऊस दराच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत हाेते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, यंदा पाऊस कमी झाल्याने उसाचे उत्पादन कमी आहे. जेमतेम तीन महिने कारखाने चालतील कामगारांना नऊ महिन्यांचा बसून पगार द्यावा लागणार आहे. ऊसतोड मजूर बसून आहेत. त्यांच्या हाताला काम नसल्याने ते परत जाऊ लागले आहेत. ही परिस्थती कारखानदारांनी कळकळून सांगितली; पण संघटना ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. कर्नाटकातील हलसिद्धनाथ, बेडकीहाळ, उगार, अथणी या कारखान्यांनी दीड-दोन लाख टनाचे गाळप केले आहे.मागील हंगामाबाबत दराबाबत काही तफावत असेल तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नेमणूक केली असून २१ नोव्हेंबरपर्यंत ते अहवाल सादर करतील. यामध्ये ज्या कारखान्यांना पैसे देय लागले तर जिल्हा बँक त्यांना कर्ज देईल, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

बेकायदेशीर केले नसताना कोण थांबणार?साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होणार का? यावर मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोल्हापुरातील हजारो टन ऊस कर्नाटकात जात आहे. त्यात कायद्यानुसार शेतकऱ्यांना दर दिला आहे. बेकायदेशीर काहीच केले नसताना मग त्यांनी करायचे काय?

अशी आहे समिती..अध्यक्ष : जिल्हाधिकारी राहुल रेखावारसदस्य सचिव : प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडेसदस्य : पाच शेतकरी संघटना व पाच साखर कारखानदार

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेHasan Mushrifहसन मुश्रीफRaju Shettyराजू शेट्टी