शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

Kolhapur: इचलकरंजीकर तहानलेलेच; १८ किलोमीटर जलवाहिनी बदलण्याचे काम १५ वर्षे झाली तरी पूर्ण होईना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 18:04 IST

प्रशासनाला कोणतेच सोयरसूतक नाही

अरुण काशीदइचलकरंजी : शहराला पाणीपुरवठा करणारी १८ किलोमीटर लांबीची कृष्णा जलवाहिनी बदलण्यासाठी तब्बल १५ वर्षांचा कालावधी लागला तरीही अद्याप काम अपूर्णच आहे. ठेकेदारांवर अंकुश नाही, प्रशासनातील दिरंगाई आणि लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा नसल्यामुळे इतका मोठा कालावधी लागला. पाणी-पाणी म्हणून जनता टाहो फोडत असताना लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला कोणतेच सोयरसूतक नसल्याचे दिसून येते.शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी कृष्णा पाणी योजना मंजूर झाली. त्यासाठी मजरेवाडी (ता.शिरोळ) येथून इचलकरंजी जलशुद्धिकरण केंद्रापर्यंत १८.३०० किलोमीटरची जलवाहिनी टाकण्यात आली. या जलवाहिनीस वारंवार गळती लागत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर राज्य शासनाने महाराष्ट्र सुजल व निर्मल अभियान, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान या योजनेतून तीन टप्प्यांमध्ये ५७ कोटी ६२ लाख रुपये दिले. मात्र, या योजना पूर्ण करण्यासाठी तब्बल १५ वर्षांचा कालावधी लागला.पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होण्यास तीन वर्षांचा, दुसऱ्या टप्प्यातील कामास सात वर्षांचा आणि तिसऱ्या टप्प्यातील काम सुरू करून दोन वर्षांचा कालावधी लोटला आहे तरी अद्याप काम पूर्णत्वास गेले नाही. अजूनही पहिल्या टप्प्यातील २५१ मीटर व दुसऱ्या टप्प्यातील १६०० मीटरची जलवाहिनी टाकणे बाकी आहे. सर्वाधिक कालावधी हा दुसऱ्या टप्प्यातील कामास लागला आहे.या पंधरा वर्षांमध्ये तीन लोकसभेच्या आणि तीन विधानसभेच्या निवडणुका झाल्या तरी जलवाहिनीचे भिजत घोंगडं आहे तसंच भिजत आहे. काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला वेळोवेळी मुदत देण्यात आली तरीही लवकर काम पूर्ण करता आले नाही. काही वेळेला प्रशासकीय दप्तर दिरंगाईचा सामना करावा लागला, तर काहीवेळा अन्य विभागाची परवानगी आणण्यासाठी ठेकेदाराला कसरत करावी लागली.प्रशासनाचा ठेकेदारावर अंकुश नसल्याचे चित्र या योजनेदरम्यान दिसले तसेच योजना मंजूर करून आणण्यापलीकडे गांभीर्याने लक्ष घालण्याचे काम लोकप्रतिनिधींनी केले नाही. रक्कम मंजूर करून आणली, माझे काम संपले, अशीच भूमिका लोकप्रतिनिधींची दिसते.

जलवाहिनी कामाचा लेखाजोखाटप्पा क्रं. १योजनेचे नाव - महाराष्ट सुजल व निर्मल अभियान.मंजूर रक्कम - १९ कोटी ५३ लाख.कामाचा आदेश - २५ ऑक्टोबर २०११.बदलण्यात आलेली जलवाहिनी - ६.६०० किलोमीटर.काम पूर्ण - १ जुलै २०१४.लागलेला कालावधी - तीन वर्षे

टप्पा क्रं. २योजनेचे नाव - महाराष्ट सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान.मंजूर रक्कम - १६ कोटी ९८ लाख.कामाचा आदेश - १७ जुलै २०१९.बदलण्यात आलेली जलवाहिनी - ५.८९६ किलोमीटर. (६.२०० किलोमीटर जलवाहिनी टाकणे.)काम पूर्ण - अद्याप २५१ मीटर बदलण्याचे काम बाकी.लागलेला कालावधी - सात वर्षे.

टप्पा क्रं.३योजनेचे नाव - महाराष्ट सुवर्णजयंती नगरोत्थान अभियान.मंजूर रक्कम - २१ कोटी ११ लाख.कामाचा आदेश - २० जून २०२३.बदलण्यात आलेली जलवाहिनी - ३.९०० किलोमीटर. (५.५०० किलोमीटर जलवाहिनी टाकली)काम पूर्ण - १० मार्च २०२५ अखेर मुदतवाढ जुलै २०१४.लागलेला कालावधी - अद्याप काम अपूर्ण

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीWaterपाणी