शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: वन्यप्राण्यांना पाणी पाण्यासाठी दहा लाख खर्चून बंधारे बांधले, वर्षापूर्वीच कामाचे पितळ उघडे पडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 18:51 IST

जानेवारीतच थेंबसुद्धा नाही, चौकशी करण्याची निसर्गप्रेमींची मागणी

सरदार चौगुलेपोर्ले तर्फ ठाणे : वनहद्दीत वन्यप्राण्यांनी पाण्याची सहज उपलब्धतास व्हावी, या उद्देशाने पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील ब्राह्मणाच्या खोरीतील ओढ्याला घातलेल्या बंधाऱ्यातील पाणी उन्हाळ्यापूर्वीच आटल्याने बंधाऱ्याच्या कामाबाबत निसर्गमित्रांनी साशंकता व्यक्त केली आहे. हिवाळ्यातच बंधाऱ्यात पाण्याचा ठणठणाट असल्याने वनविभागाने प्रायोगिक तत्त्वावर उभारलेला बंधाऱ्याचा प्रयोग फसला असल्याची चर्चा आहे. दहा लाख खर्चून बांधलेल्या बंधाऱ्याचे काम निकृष्ट झाले आहे की पाणी साठविण्याची जागा चुकीची निवडली, याची सखोल चोकशी करावी, अशी मागणी निसर्गमित्रांनी केली आहे.एप्रिल २०२४ मध्ये पन्हाळा वनविभागाने पोर्ले तर्फ ठाणे, पडसाळीसह पोंबरे येथे ३० लाख रुपये खर्चून तीन बंधारे बांधले होते. पोंबरे आणि पडसाळी येथील ओढ्यांना पाण्याचा स्रोत असल्याने ते बंधारे आजही तुडुंब भरलेले आहेत; परंतु पोर्ले तर्फ ठाणे येथील बंधाऱ्यात पाण्याचा थेंबही साचून राहिलेला नाही. त्यामुळे वर्षापूर्वीच कामाचे पितळ उघडे पडले आहे.पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधताना ओढ्याला पाण्याचा स्राेत आहे की नाही, असेल तर तो किती दिवस राहील? याची शहानिशा न करता वनविभागाने निवडलेली जागा चुकीची आहे की जिल्हा वार्षिक योजनेतून मिळालेला निधी मुरवण्यासाठी बंधारा बांधण्याची उचापत पन्हाळा वनविभागाने केली, असा सवाल निसर्गमित्राने केला आहे. या बंधाऱ्यात पाणी का साचले नाही, बंधाऱ्याच्या कामाचा दर्जा खराब आहे यांसारख्या अनेक प्रश्नांची उकल होण्यासाठी संबंधित विभागाने सखोल चोकशी करावी, अशी मागणी निसर्गमित्रांनी केली आहे.

तालुक्यातील पडसाळी आणि पोंबरे येथे बांधलेले बंधारे पाण्याने भरलेले आहे. पोर्लेच्या बंधाऱ्यातील पाणी डिसेंबरपर्यत होते. बंधाऱ्याला गळती नाही तरीसुद्धा बंधाऱ्यात पाणी साचलेले नाही. पाणी कशामुळे साचलेले नाही, याबाबत विचारविनिमय सुरू आहे. - अनिल मोहिते, पन्हाळा वनपरिक्षेत्र अधिकारी 

वनविभागाने बंधारे बांधताना स्थानिक लोकांना विचारात घेणे गरजेचे होते. त्यांनी निवडलेली जागा चुकीची आहे. दीर्घकाळ पाण्याचा स्राेत असणार ओढा डावलून मुरूम खुदाईमुळे विस्तीर्ण झालेल्या ओढ्यावर बंधारा बांधला आहे. मुरमाच्या जमिनीवर बंधारा बाधून १० लाखांचा निधी पाण्याबरोबर मुरविण्याचे काम वनविभागाने केले आहे. त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. - दिनकर चौगुले, निसर्गमित्र, पोर्ले/ ठाणे, ता. पन्हाळा

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforestजंगलWaterपाणीforest departmentवनविभाग