शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

Kolhapur: वन्यप्राण्यांना पाणी पाण्यासाठी दहा लाख खर्चून बंधारे बांधले, वर्षापूर्वीच कामाचे पितळ उघडे पडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 18:51 IST

जानेवारीतच थेंबसुद्धा नाही, चौकशी करण्याची निसर्गप्रेमींची मागणी

सरदार चौगुलेपोर्ले तर्फ ठाणे : वनहद्दीत वन्यप्राण्यांनी पाण्याची सहज उपलब्धतास व्हावी, या उद्देशाने पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील ब्राह्मणाच्या खोरीतील ओढ्याला घातलेल्या बंधाऱ्यातील पाणी उन्हाळ्यापूर्वीच आटल्याने बंधाऱ्याच्या कामाबाबत निसर्गमित्रांनी साशंकता व्यक्त केली आहे. हिवाळ्यातच बंधाऱ्यात पाण्याचा ठणठणाट असल्याने वनविभागाने प्रायोगिक तत्त्वावर उभारलेला बंधाऱ्याचा प्रयोग फसला असल्याची चर्चा आहे. दहा लाख खर्चून बांधलेल्या बंधाऱ्याचे काम निकृष्ट झाले आहे की पाणी साठविण्याची जागा चुकीची निवडली, याची सखोल चोकशी करावी, अशी मागणी निसर्गमित्रांनी केली आहे.एप्रिल २०२४ मध्ये पन्हाळा वनविभागाने पोर्ले तर्फ ठाणे, पडसाळीसह पोंबरे येथे ३० लाख रुपये खर्चून तीन बंधारे बांधले होते. पोंबरे आणि पडसाळी येथील ओढ्यांना पाण्याचा स्रोत असल्याने ते बंधारे आजही तुडुंब भरलेले आहेत; परंतु पोर्ले तर्फ ठाणे येथील बंधाऱ्यात पाण्याचा थेंबही साचून राहिलेला नाही. त्यामुळे वर्षापूर्वीच कामाचे पितळ उघडे पडले आहे.पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधताना ओढ्याला पाण्याचा स्राेत आहे की नाही, असेल तर तो किती दिवस राहील? याची शहानिशा न करता वनविभागाने निवडलेली जागा चुकीची आहे की जिल्हा वार्षिक योजनेतून मिळालेला निधी मुरवण्यासाठी बंधारा बांधण्याची उचापत पन्हाळा वनविभागाने केली, असा सवाल निसर्गमित्राने केला आहे. या बंधाऱ्यात पाणी का साचले नाही, बंधाऱ्याच्या कामाचा दर्जा खराब आहे यांसारख्या अनेक प्रश्नांची उकल होण्यासाठी संबंधित विभागाने सखोल चोकशी करावी, अशी मागणी निसर्गमित्रांनी केली आहे.

तालुक्यातील पडसाळी आणि पोंबरे येथे बांधलेले बंधारे पाण्याने भरलेले आहे. पोर्लेच्या बंधाऱ्यातील पाणी डिसेंबरपर्यत होते. बंधाऱ्याला गळती नाही तरीसुद्धा बंधाऱ्यात पाणी साचलेले नाही. पाणी कशामुळे साचलेले नाही, याबाबत विचारविनिमय सुरू आहे. - अनिल मोहिते, पन्हाळा वनपरिक्षेत्र अधिकारी 

वनविभागाने बंधारे बांधताना स्थानिक लोकांना विचारात घेणे गरजेचे होते. त्यांनी निवडलेली जागा चुकीची आहे. दीर्घकाळ पाण्याचा स्राेत असणार ओढा डावलून मुरूम खुदाईमुळे विस्तीर्ण झालेल्या ओढ्यावर बंधारा बांधला आहे. मुरमाच्या जमिनीवर बंधारा बाधून १० लाखांचा निधी पाण्याबरोबर मुरविण्याचे काम वनविभागाने केले आहे. त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. - दिनकर चौगुले, निसर्गमित्र, पोर्ले/ ठाणे, ता. पन्हाळा

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforestजंगलWaterपाणीforest departmentवनविभाग