शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

Kolhapur: वन्यप्राण्यांना पाणी पाण्यासाठी दहा लाख खर्चून बंधारे बांधले, वर्षापूर्वीच कामाचे पितळ उघडे पडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 18:51 IST

जानेवारीतच थेंबसुद्धा नाही, चौकशी करण्याची निसर्गप्रेमींची मागणी

सरदार चौगुलेपोर्ले तर्फ ठाणे : वनहद्दीत वन्यप्राण्यांनी पाण्याची सहज उपलब्धतास व्हावी, या उद्देशाने पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील ब्राह्मणाच्या खोरीतील ओढ्याला घातलेल्या बंधाऱ्यातील पाणी उन्हाळ्यापूर्वीच आटल्याने बंधाऱ्याच्या कामाबाबत निसर्गमित्रांनी साशंकता व्यक्त केली आहे. हिवाळ्यातच बंधाऱ्यात पाण्याचा ठणठणाट असल्याने वनविभागाने प्रायोगिक तत्त्वावर उभारलेला बंधाऱ्याचा प्रयोग फसला असल्याची चर्चा आहे. दहा लाख खर्चून बांधलेल्या बंधाऱ्याचे काम निकृष्ट झाले आहे की पाणी साठविण्याची जागा चुकीची निवडली, याची सखोल चोकशी करावी, अशी मागणी निसर्गमित्रांनी केली आहे.एप्रिल २०२४ मध्ये पन्हाळा वनविभागाने पोर्ले तर्फ ठाणे, पडसाळीसह पोंबरे येथे ३० लाख रुपये खर्चून तीन बंधारे बांधले होते. पोंबरे आणि पडसाळी येथील ओढ्यांना पाण्याचा स्रोत असल्याने ते बंधारे आजही तुडुंब भरलेले आहेत; परंतु पोर्ले तर्फ ठाणे येथील बंधाऱ्यात पाण्याचा थेंबही साचून राहिलेला नाही. त्यामुळे वर्षापूर्वीच कामाचे पितळ उघडे पडले आहे.पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधताना ओढ्याला पाण्याचा स्राेत आहे की नाही, असेल तर तो किती दिवस राहील? याची शहानिशा न करता वनविभागाने निवडलेली जागा चुकीची आहे की जिल्हा वार्षिक योजनेतून मिळालेला निधी मुरवण्यासाठी बंधारा बांधण्याची उचापत पन्हाळा वनविभागाने केली, असा सवाल निसर्गमित्राने केला आहे. या बंधाऱ्यात पाणी का साचले नाही, बंधाऱ्याच्या कामाचा दर्जा खराब आहे यांसारख्या अनेक प्रश्नांची उकल होण्यासाठी संबंधित विभागाने सखोल चोकशी करावी, अशी मागणी निसर्गमित्रांनी केली आहे.

तालुक्यातील पडसाळी आणि पोंबरे येथे बांधलेले बंधारे पाण्याने भरलेले आहे. पोर्लेच्या बंधाऱ्यातील पाणी डिसेंबरपर्यत होते. बंधाऱ्याला गळती नाही तरीसुद्धा बंधाऱ्यात पाणी साचलेले नाही. पाणी कशामुळे साचलेले नाही, याबाबत विचारविनिमय सुरू आहे. - अनिल मोहिते, पन्हाळा वनपरिक्षेत्र अधिकारी 

वनविभागाने बंधारे बांधताना स्थानिक लोकांना विचारात घेणे गरजेचे होते. त्यांनी निवडलेली जागा चुकीची आहे. दीर्घकाळ पाण्याचा स्राेत असणार ओढा डावलून मुरूम खुदाईमुळे विस्तीर्ण झालेल्या ओढ्यावर बंधारा बांधला आहे. मुरमाच्या जमिनीवर बंधारा बाधून १० लाखांचा निधी पाण्याबरोबर मुरविण्याचे काम वनविभागाने केले आहे. त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. - दिनकर चौगुले, निसर्गमित्र, पोर्ले/ ठाणे, ता. पन्हाळा

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforestजंगलWaterपाणीforest departmentवनविभाग