शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

कोल्हापूरकरांसाठी आनंदवार्ता!; स्वप्न सत्यात उतरले, थेट पाइपलाइन पूर्णत्वास

By भारत चव्हाण | Updated: October 19, 2023 12:17 IST

पुईखडी केंद्राला जलवाहिनी जोडली : कसबा बावड्याकडे जाणाऱ्या वाहिनीचे काम आज पूर्णत्वास

कोल्हापूर : अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर ती वेळ आली. ‘काम लई अवघड हाय’ या प्रारंभीच्या प्रतिक्रियेनंतर काम होणार की नाही अशा शंका कुशंकांनी काहूर माजविला असताना खरंच तो सोनियाचा दिन अखेर उगवला. कोल्हापूर शहराला काळम्मावाडी धरणातून थेट पाइपलाइनने पाणी देण्याचे स्वप्न अखेर सत्यात उतरले. पुईखडी जलशुद्धीकरण केंद्राला जलवाहिनी जोडण्याचे काम मंगळवारी पूर्ण झाले आणि कसबा बावड्याकडे जाणाऱ्या जलवाहिनीचे काम जोडण्याचे कामही आज, गुरुवारपर्यंत पूर्ण होईल.एकीकडे काळम्मावाडी योजनेचे काम पूर्ण होत असताना दुसरीकडे कोल्हापूर शहरवासीयांच्या ३२ वर्षांपासूनची मागणीही पूर्ण होत असल्याचा आनंद नक्कीच कोल्हापूरकरांना आहे. शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावे, त्यासाठी काळम्मावाडी धरणातून थेट पाइपलाइन टाकावी, अशी मागणी सन १९९० च्या सुमारास झाली. पुढे पंधरा- वीस वर्षे नुसती आंदोलने झाली. अनेक वेळा मुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळे भेटली. नुसतीच आश्वासने आणि तोंडाला पाने पुसण्यातच राज्य सरकारने धन्यता मानली.सन २०१२ नंतर या योजनेच्या कामाला गती मिळाली. ‘योजना मंजूर झाली नाही तर मी आमदारकीची निवडणूक लढणार नाही’ अशी घोषणा आमदार सतेज पाटील यांनी केली. तेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने तसेच पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या सरकारने २०१४ मध्ये ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला. बत्तीस वर्षांचा संघर्ष आणि नऊ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर योजनेचे शंभर टक्के काम पूर्ण झाले. आता केवळ स्विच ऑन करून कोल्हापूरकरांना योजनेचे पाणी सोडायचे आहे. दसरा ते दिवाळी दरम्यान योजनेचे लोकार्पण करण्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे दिवाळीचे अभ्यंगस्नान नव्या पाण्याने होणार आहे यात आता किंतु राहिलेला नाही.

जलवाहिनीचे शेवटचे दोन क्रॉस जोडण्याचे काम दोन दिवसांपूर्वी हाती घेण्यात आले. पुईखडी येथील क्रॉस जोडण्यात आला, त्याचे काम मंगळवारी पूर्ण झाले. आता फुलेवाडी येथील माजी नगरसेवक राहुल माने यांच्या शेतात एक क्रॉस जोडण्याचे काम सुरू आहे. ते आज, गुरुवारी पूर्ण होत आहे.

महावितरणचे आवाहनदरम्यान, थेट पाइपलाइन पाणीपुरवठा योजनेकरिता ३३ केव्ही केएमसी काळम्मावाडी एक्स्प्रेस वीज वाहिनी, २२० केव्ही ब्रिदी उपकेंद्र ते काळाम्मावाडी धरणापर्यंत उभारण्यात आली आहे. ही विद्युतवाहिनी ब्रिदी, मुदाळतिट्टा, सरवडे, उंदरवाडी, पंडेवाडी व काळम्मावाडी इत्यादी गावांमधून जाते. ही विद्युतवाहिनी १७ ऑक्टोबर २०२३ नंतर केव्हाही विद्युत भारीत करण्यात येईल किंवा त्याची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्युतवाहिनी जवळून उंच लोखंडी वस्तू, लांब शिडी इत्यादी नेऊ नये. तसेच, नवीन विद्युत वाहिनीच्या खाबांना व तारांना जनावरे बांधणे यासारखे प्रकार करू नयेत, असे आवाहन महावितरण कंपनी ग्रामीण विभाग २ यांनी केले आहे.

थेट पाइपलाइन 

  • योजनेला मंजुरी : २०१४
  • योजनेचा एकूण खर्च : ४८५ कोटी
  • एकूण जलवाहिनी : ५२ किलोमीटर
  • विद्युतवाहिनी लाइन : ३५ किलोमीटर
  • जॅकवेलची उभारणी : ०२
  • ९४० एचपी क्षमतेचे पंप : ०४
  • ब्रेकप्रेशर टँकची उभारणी : ०१
  • ८० एमएलडी क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र : ०१
  • पुईखडी येथून कसबा बावड्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी
  • २०४० सालापर्यंत पाण्याची गरज भागणार
टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी