शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

Kolhapur News: ..म्हणून धरणातील पाणीसाठा कमी केला, कार्यकारी अभियंता विनया बदामी यांचा खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 13:41 IST

आमदार हसन मुश्रीफ यांनी जलसंपदा विभागामुळे कोल्हापूरवर पाणीबाणी ओढवल्याचा आरोप केला होता

कोल्हापूर : दूधगंगा धरणाच्या तांत्रिक अभ्यासानुसार स्थैर्यता व सुरक्षिततेसाठी धरणातील ६ टीएमसी पाणीसाठा कमी करण्यात आल्याचा खुलासा दूधगंगा कालवे विभाग क्र. १ च्या कार्यकारी अभियंता विनया बदामी यांनी सोमवारी केला. मागील आठवड्यात आमदार हसन मुश्रीफ यांनी जलसंपदा विभागामुळे कोल्हापूरवरपाणीबाणी ओढवल्याचा आरोप केला होता.राधानगरी तालुक्यातील दूधगंगा प्रकल्प अंतर्गत २५.४० टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्यात आले असून, २००६ पासून त्यात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा केला जातो. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टर क्षेत्र सिंचित असून, प्रकल्पाच्या आंतरराज्यीय करारानुसार कर्नाटकला ४ टीएमसी पाणी दिले जाते. धरणाचा सांडवा व काही भाग असा ४९० मीटर लांबीचे दगडी बांधकाम असून, २००७ पासून गळती आहे. सुरुवातीला सेकंदाला ३६० लि. से. इतकी दुरुस्तीनंतर १६६ लि से. गळती निदर्शनास आली. मात्र, २०२१-२२ मध्ये पुन्हा ३५० लिटर गळती दिसून आली.त्यामुळे जलसंपदा विभागांतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व केंद्र शासनाच्या पुण्यातील सीडब्ल्यु, पीआरएस संस्थेकडून पाहणी करून घेतली. त्यानुसार ही गळती धरणाच्या बांधकामाला छेद देऊन खालील बाजूस पाणी उसळत असल्याने व धरणाच्या बांधकामाची घनता कमी झाल्याने वाढली आहे. गळती काढण्यासाठी प्रशासकीय मान्यता, सोपस्कार पूर्ण करून काम हाती घेईपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून पाणीसाठा १९.६८ टीएमसी इतकाच करावा असे निर्देश देण्यात आले.गळती काढण्यासाठी ग्राऊटिंग व इतर बांधकाम पद्धतीचे ८०.३६ कोटीचे अंदाजपत्रक जलसंपदा विभागाकडे अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहे. पावसाळा लांबल्याने धरणातील पाणी १५ जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आल्याचे जलसंपदा विभागाने म्हटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणWaterपाणी