शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

Kolhapur News: ..म्हणून धरणातील पाणीसाठा कमी केला, कार्यकारी अभियंता विनया बदामी यांचा खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 13:41 IST

आमदार हसन मुश्रीफ यांनी जलसंपदा विभागामुळे कोल्हापूरवर पाणीबाणी ओढवल्याचा आरोप केला होता

कोल्हापूर : दूधगंगा धरणाच्या तांत्रिक अभ्यासानुसार स्थैर्यता व सुरक्षिततेसाठी धरणातील ६ टीएमसी पाणीसाठा कमी करण्यात आल्याचा खुलासा दूधगंगा कालवे विभाग क्र. १ च्या कार्यकारी अभियंता विनया बदामी यांनी सोमवारी केला. मागील आठवड्यात आमदार हसन मुश्रीफ यांनी जलसंपदा विभागामुळे कोल्हापूरवरपाणीबाणी ओढवल्याचा आरोप केला होता.राधानगरी तालुक्यातील दूधगंगा प्रकल्प अंतर्गत २५.४० टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्यात आले असून, २००६ पासून त्यात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा केला जातो. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टर क्षेत्र सिंचित असून, प्रकल्पाच्या आंतरराज्यीय करारानुसार कर्नाटकला ४ टीएमसी पाणी दिले जाते. धरणाचा सांडवा व काही भाग असा ४९० मीटर लांबीचे दगडी बांधकाम असून, २००७ पासून गळती आहे. सुरुवातीला सेकंदाला ३६० लि. से. इतकी दुरुस्तीनंतर १६६ लि से. गळती निदर्शनास आली. मात्र, २०२१-२२ मध्ये पुन्हा ३५० लिटर गळती दिसून आली.त्यामुळे जलसंपदा विभागांतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व केंद्र शासनाच्या पुण्यातील सीडब्ल्यु, पीआरएस संस्थेकडून पाहणी करून घेतली. त्यानुसार ही गळती धरणाच्या बांधकामाला छेद देऊन खालील बाजूस पाणी उसळत असल्याने व धरणाच्या बांधकामाची घनता कमी झाल्याने वाढली आहे. गळती काढण्यासाठी प्रशासकीय मान्यता, सोपस्कार पूर्ण करून काम हाती घेईपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून पाणीसाठा १९.६८ टीएमसी इतकाच करावा असे निर्देश देण्यात आले.गळती काढण्यासाठी ग्राऊटिंग व इतर बांधकाम पद्धतीचे ८०.३६ कोटीचे अंदाजपत्रक जलसंपदा विभागाकडे अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहे. पावसाळा लांबल्याने धरणातील पाणी १५ जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आल्याचे जलसंपदा विभागाने म्हटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणWaterपाणी