शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

देवस्थान समितीला मिळणार सप्टेंबरनंतरच नवा अध्यक्ष, आघाडीत कोणत्या पक्षाची वर्णी लागणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 11:28 IST

महाविकास आघाडीतील सत्तेच्या वाटणीत ही समिती कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाते यालाही महत्त्व आहे.

इंदुमती गणेश

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीवरील अध्यक्ष, कोषाध्यक्षांसह सदस्यांची निवड सप्टेंबरनंतरच होण्याची शक्यता आहे. मुदत संपण्याआधीच समिती बरखास्त का केली, या कारणास्तव माजी अध्यक्ष महेश जाधव हे उच्च न्यायालयात गेले आहेत. त्या सुनावणीच्या प्रक्रियेत अडकण्यापेक्षा सप्टेंबरमध्ये मुदत संपल्यानंतर नव्या समितीची नियुक्ती करण्याचे शासनाचे नियोजन आहे. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून व्ही. बी. पाटील यांचे नाव चर्चेत आहे. महाविकास आघाडीतील सत्तेच्या वाटणीत ही समिती कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाते यालाही महत्त्व आहे.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती बरखास्त करण्यात आली होती. मुदत संपण्याआधीच दीड वर्षे समिती बरखास्त का केली, या कारणावरून माजी अध्यक्ष महेश जाधव यांनी शासनाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याच्या दोन-तीन सुनावण्या झाल्या.

ऑगस्ट २०२१ मधील सुनावणीनंतर एकही सुनावणी झालेली नाही, किंबहुना हे प्रकरण बोर्डावर घेण्यात आलेले नाही. याबाबत काही लोकप्रतिनिधींनी विधि व न्यायखात्यात चौकशी केली असता देवस्थान समिती शासनाची आहे आणि सध्या जिल्हाधिकारीच प्रशासक आहेत, त्यामुळे सुनावणी घेण्याची गरज नाही, अशी चर्चा झाल्याचे समजले. याबाबत विधि व न्यायखात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण तो होऊ शकला नाही.

भ्रष्टाचाराचा मुद्दा काढायचा कसा?

प्रशासक येण्यापूर्वीच्या साडेतीन वर्षांत देवस्थान समितीमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला; पण शासनाने कोणतेही कारण न देता समिती बरखास्त केली. नंतर त्यात बदल करून नवा अध्यादेश काढला. चौकशीची फाईल विधि व न्यायखात्याकडे प्रलंबित आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र अधिकाऱ्यांमार्फत या प्रकरणांची चौकशी व्हावी, असा प्रस्ताव पाठविला आहे; पण आता हा मुद्दा न्यायालयात काढायचा कसा? बरखास्तीवेळी भ्रष्टाचाराचे कारण का दिले नाही, हा मुद्दा उपस्थित होऊ शकतो.

मुदत संपल्यावर मार्ग मोकळा

माजी अध्यक्ष, कोषाध्यक्षांची नियुक्ती सप्टेंबर २०१७ मध्ये झाली. या निवडीला सप्टेंबर २०२२ मध्ये पाच वर्षे पूर्ण होतात. ऑगस्ट २०२१ मधील सुनावणीनंतर तारीख मिळालेली नाही. एकदा मुदत संपली की न्यायालयात दाखल असलेल्या प्रकरणाला फारसा अर्थ राहणार नाही. त्यामुळे सुनावणीच्या कचाट्यात न पडता थेट सप्टेंबरनंतर नव्या निवडी जाहीर कराव्यात, अशा हालचाली सुरू आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर