शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

धैर्यशील मानेंनी आता 'मीच गद्दार' अशी टॅगलाईन ठेवावी, खासदार संजय राऊतांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 13:02 IST

शिवसेना संपविण्यासाठी यापूर्वी अनेक प्रयत्न झाले; पण कोणालाही ते जमले नाही. तर या रंगा-बिल्लाला काय जमेल ?

इचलकरंजी : मूळ शिवसेना ही जनमाणसांची आहे यातून बाहेर गेलेले ४० गद्दार महाराष्ट्राचे दुश्मन आहेत. त्यांच्या पुढील पिढ्यांना ही गद्दार म्हणून कायम कपाळावर कलंक राहणार आहे. जनताच त्यांचा सर्जिकल स्ट्राईक करेल. धैर्यशील माने म्हणजे मीच खासदार ही टॅगलाईन बदलून आता मीच गद्दार अशी ठेवावी लागेल. आता तुम्हीच त्यांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन खासदार संजय राऊत यांनी केले.येथील घोरपडे नाट्यगृहात झालेल्या शिवगर्जना मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उपनेते तथा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर व प्रवक्ते लक्ष्मण हाके यांची प्रमुख उपस्थिती होती.राऊत म्हणाले, शिवसेना संपविण्यासाठी यापूर्वी अनेक प्रयत्न झाले ; पण कोणालाही ते जमले नाही. तर या रंगा-बिल्लाला काय जमेल ? यांनी शंभर वेळा पुनर्जन्म घेतला तरी ते शक्य नाही. शिवसेना ही एक ठिणगी आहे. बाळासाहेबांनी आयोगाला विचारून ही शिवसेना काढली नव्हती. त्यामुळे बाळासाहेबांना अपेक्षित शिवसेना टिकवून ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी खंबीरपणे लढा द्यावा. सन २०२४ ला निवडणुकीनंतर यांना जनभावना कळेल. मुख्यमंत्री व पंतप्रधान कोण असेल, तेही कळेल. त्यावेळी मग ईडी आणि सीबीआय कसे असते, ते बघू.खासदार माने यांच्यावर टीका करत यांचे नाव धैर्यशील कोण ठेवले ? यांना कोठेच धैर्य नसते ? कदाचित बीजेपी ही त्यांना उमेदवारी देणार नाही. खोकेपटू मधील हाही मोठा खेळाडू आहे, असे खात्रीलायकरीत्या समजले आहे. इचलकरंजीतील जनभावना पाहता यांना बाहेर पडता येणार नाही, अशी परिस्थिती आहे. अशा गद्दारांना तुम्हीच धडा शिकवा.प्रवक्ते हाके म्हणाले, खऱ्या शिवसेनेच्या पाठीमागे महाराष्ट्रातील जनता आहे. या सहानुभूतीचे मतात रुपांतर करण्यासाठी ही शिवगर्जना यात्रा आहे. आम्ही जनतेला हाक देण्यासाठी आलो आहे. आता जिंकेपर्यंत लढायचं. दुधवडकर यांनी, निष्ठा, प्रेम आणि आदेश मानणाऱ्या शिवसैनिकांचे उदाहरण देत असेच शिवसैनिक बाळासाहेबांना अपेक्षित आहेत. ते आपण बनून दाखवूया, असे आवाहन केले.जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, माजी आमदार सुजित मिणचेकर, आदींची भाषणे झाली. शहर अध्यक्ष सयाजी चव्हाण यांनी स्वागत केले. यावेळी साताप्पा भवान, मधुकर पाटील, आनंद शेट्टी, बाजीराव पाटील, मंगल चव्हाण, मेहबूब मणेर, विजय देवकर, अस्लम खलिफा, इस्माईल शेख, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अण्णासाहेब बिलुरे यांनी सूत्रसंचालन व महादेव गौड यांनी आभार मानले.

हिम्मत असेल, तर आता निवडणुका घ्याखरचं तुम्हाला जनतेचा कौल बघायचा असेल, तर आताच निवडणुका घ्या. किमान कोल्हापूर आणि मुंबई महापालिकेच्या तरी निवडणुका घेऊन बघा. तुम्हाला खरी शिवसेना कळेल, असे आव्हान खासदार राऊत यांनी दिले.जल्लोषी स्वागतशहरात शिवतीर्थ जवळ शिवसेना ठाकरे गटासह महाविकास आघाडी घटक पक्षांच्या वतीने खासदार राऊत यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यामुळे आपण भारावून गेल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSanjay Rautसंजय राऊतPoliticsराजकारण