शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
4
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
5
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
6
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
7
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
8
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
9
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
10
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
11
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
12
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
13
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
14
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
15
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
16
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
17
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
18
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
19
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
20
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा

Kolhapur: स्वार्थी, बुद्धिजीवी वर्गामुळे देशात क्रांती अशक्य - राधेश्याम जाधव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 15:24 IST

'बाबासाहेबांनी आपला नेता कितीही महान असला तरी त्याच्या चरणी आपले स्वातंत्र्य विकू नका, अन्यथा तो हुकूमशहा बनतो, हा लोकशाहीविषयी दिलेला इशारा आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा'

कोल्हापूर : सामाजिक न्यायासाठी संघर्ष आणि बुद्धिजीवी नेतृत्वाची गरज असते. ज्या देशातील बुद्धिजीवी वर्ग स्वार्थी, अप्पलपोटी होतो, शोषितांशी नाळ तोडतो तो देश कधीच प्रगती करत नाही, क्रांती करत नाही. क्रांती करायची असेल तर शोषितांमधील बुद्धिजीवी वर्गाने नेतृत्व करण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार डॉ. राधेश्याम जाधव यांनी व्यक्त केले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट’तर्फे आयोजित व्याख्यानात त्यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सामाजिक न्याय’ या विषयावर विवेचन केले. ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार अध्यक्षस्थानी होते. यावेळी ट्रस्टचे प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर उपस्थित होते.डॉ. जाधव म्हणाले, बाबासाहेबांनी सांगितलेल्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या वाक्यामध्ये संघर्ष हा सकारात्मक होता. आपण शोषितांच्या लढ्याचे नेतृत्व कोणत्या नेत्याकडे देत आहोत, याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. जेव्हा सर्वत्र अंधार असतो, आम्ही कुणाकडे बघून लढू असा प्रश्न तयार होतो तेव्हा लढण्याची प्रेरणा तुम्हाला स्वत:मधूनच घ्यावी लागते. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवता येणार नाही. आपण २०२५ मधील भारताचा विचार करतो त्यावेळी बुद्धिप्रामाण्यवादी समताधिष्ठित समाजरचना हा सामाजिक न्याय स्थापनेचा उपाय आहे. डॉ. शिवाजी जाधव यांनी स्वागत प्रास्ताविक केले.

जातीच्या चौकटीतून मुक्त कराडॉ. जयसिंगराव पवार म्हणाले. फुले, शाहू, आंबेडकर यांच्यासह सर्व महामानवांनी आयुष्यभर समाजाचे वैचारिक प्रबोधन केले. सामाजिक समता स्थापन करण्याचा प्रयत्न केला; पण आपण त्यांना जातीच्या चौकटीत बंदिस्त करून टाकले आहे. अनुयायांनी ही चौकट दूर करून त्यांना मुक्त करावे. बाबासाहेबांनी आपला नेता कितीही महान असला तरी त्याच्या चरणी आपले स्वातंत्र्य विकू नका, अन्यथा तो हुकूमशहा बनतो, हा लोकशाहीविषयी दिलेला इशारा आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा आहे.

तरीही गर्दी..आंबेडकर जयंतीनिमित्त या व्याख्यानाची ट्रस्टकडून फारशी पूर्वप्रसिद्धी केली नव्हती. कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिकाही माध्यमांकडे पाठवण्याचे कष्ट कुणी घेतले नव्हते. तरीही आंबेडकरप्रेमींनी व्याख्यानास गर्दी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती