शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: स्वार्थी, बुद्धिजीवी वर्गामुळे देशात क्रांती अशक्य - राधेश्याम जाधव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 15:24 IST

'बाबासाहेबांनी आपला नेता कितीही महान असला तरी त्याच्या चरणी आपले स्वातंत्र्य विकू नका, अन्यथा तो हुकूमशहा बनतो, हा लोकशाहीविषयी दिलेला इशारा आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा'

कोल्हापूर : सामाजिक न्यायासाठी संघर्ष आणि बुद्धिजीवी नेतृत्वाची गरज असते. ज्या देशातील बुद्धिजीवी वर्ग स्वार्थी, अप्पलपोटी होतो, शोषितांशी नाळ तोडतो तो देश कधीच प्रगती करत नाही, क्रांती करत नाही. क्रांती करायची असेल तर शोषितांमधील बुद्धिजीवी वर्गाने नेतृत्व करण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार डॉ. राधेश्याम जाधव यांनी व्यक्त केले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट’तर्फे आयोजित व्याख्यानात त्यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सामाजिक न्याय’ या विषयावर विवेचन केले. ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार अध्यक्षस्थानी होते. यावेळी ट्रस्टचे प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर उपस्थित होते.डॉ. जाधव म्हणाले, बाबासाहेबांनी सांगितलेल्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या वाक्यामध्ये संघर्ष हा सकारात्मक होता. आपण शोषितांच्या लढ्याचे नेतृत्व कोणत्या नेत्याकडे देत आहोत, याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. जेव्हा सर्वत्र अंधार असतो, आम्ही कुणाकडे बघून लढू असा प्रश्न तयार होतो तेव्हा लढण्याची प्रेरणा तुम्हाला स्वत:मधूनच घ्यावी लागते. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवता येणार नाही. आपण २०२५ मधील भारताचा विचार करतो त्यावेळी बुद्धिप्रामाण्यवादी समताधिष्ठित समाजरचना हा सामाजिक न्याय स्थापनेचा उपाय आहे. डॉ. शिवाजी जाधव यांनी स्वागत प्रास्ताविक केले.

जातीच्या चौकटीतून मुक्त कराडॉ. जयसिंगराव पवार म्हणाले. फुले, शाहू, आंबेडकर यांच्यासह सर्व महामानवांनी आयुष्यभर समाजाचे वैचारिक प्रबोधन केले. सामाजिक समता स्थापन करण्याचा प्रयत्न केला; पण आपण त्यांना जातीच्या चौकटीत बंदिस्त करून टाकले आहे. अनुयायांनी ही चौकट दूर करून त्यांना मुक्त करावे. बाबासाहेबांनी आपला नेता कितीही महान असला तरी त्याच्या चरणी आपले स्वातंत्र्य विकू नका, अन्यथा तो हुकूमशहा बनतो, हा लोकशाहीविषयी दिलेला इशारा आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा आहे.

तरीही गर्दी..आंबेडकर जयंतीनिमित्त या व्याख्यानाची ट्रस्टकडून फारशी पूर्वप्रसिद्धी केली नव्हती. कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिकाही माध्यमांकडे पाठवण्याचे कष्ट कुणी घेतले नव्हते. तरीही आंबेडकरप्रेमींनी व्याख्यानास गर्दी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती