शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याला राज्य सरकारने विरोध करावा, आमदार चंद्रदीप नरके यांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 13:32 IST

कोपार्डे : अलमट्टी धरणाची उंची वाढविल्यास कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील गावे पाण्याखाली जाणार आहेत. महापुरास कारणीभूत असणाऱ्या कर्नाटकातील अलमट्टी ...

कोपार्डे : अलमट्टी धरणाची उंची वाढविल्यास कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील गावे पाण्याखाली जाणार आहेत. महापुरास कारणीभूत असणाऱ्या कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कर्नाटक शासनाबरोबर बोलणे करावे, अशी मागणी करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी नागपूर अधिवेशनात केली.नरके म्हणाले, कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यासंदर्भात कारवाई चालू केलेली आहे. सध्या ५१९.६० मीटर प्रकल्पाची पूर्ण संचित पातळी आहे. अलमट्टीची उंची वाढवून त्याची संचित पातळी ५२४ मीटर करण्याचे नियोजन कर्नाटक शासनाने सुरू केले आहे. जर अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा पावसाळ्यात महापुरामुळे जलमय होऊन शेती, नागरी वस्ती, पिके व गावे उद्ध्वस्त होतील. ५१९ मीटर पाणी पातळीवर कोल्हापूरचा पश्चिम भाग आणि सांगली जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती भयानक होते. उंची ५२४ मीटरवर गेली तर कोल्हापूर जिल्हा जलमय होणार आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी जमिनींचे हस्तांतरण करण्याचे काम कर्नाटक सरकारने चालू केले आहे.महापुरात कोल्हापूर आणि सांगली जिल्हा पूर्ण वाहून जाईल. त्यामुळे निश्चितपणे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी तातडीने कार्यवाही करावी. केंद्र सरकारने यामध्ये वाटाघाटी करून अलमट्टीची उंची वाढवण्याचे काम व जमिनीचे हस्तांतरण चालू आहे त्याला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनKarnatakकर्नाटकDamधरणMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार