शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याला राज्य सरकारने विरोध करावा, आमदार चंद्रदीप नरके यांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 13:32 IST

कोपार्डे : अलमट्टी धरणाची उंची वाढविल्यास कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील गावे पाण्याखाली जाणार आहेत. महापुरास कारणीभूत असणाऱ्या कर्नाटकातील अलमट्टी ...

कोपार्डे : अलमट्टी धरणाची उंची वाढविल्यास कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील गावे पाण्याखाली जाणार आहेत. महापुरास कारणीभूत असणाऱ्या कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कर्नाटक शासनाबरोबर बोलणे करावे, अशी मागणी करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी नागपूर अधिवेशनात केली.नरके म्हणाले, कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यासंदर्भात कारवाई चालू केलेली आहे. सध्या ५१९.६० मीटर प्रकल्पाची पूर्ण संचित पातळी आहे. अलमट्टीची उंची वाढवून त्याची संचित पातळी ५२४ मीटर करण्याचे नियोजन कर्नाटक शासनाने सुरू केले आहे. जर अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा पावसाळ्यात महापुरामुळे जलमय होऊन शेती, नागरी वस्ती, पिके व गावे उद्ध्वस्त होतील. ५१९ मीटर पाणी पातळीवर कोल्हापूरचा पश्चिम भाग आणि सांगली जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती भयानक होते. उंची ५२४ मीटरवर गेली तर कोल्हापूर जिल्हा जलमय होणार आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी जमिनींचे हस्तांतरण करण्याचे काम कर्नाटक सरकारने चालू केले आहे.महापुरात कोल्हापूर आणि सांगली जिल्हा पूर्ण वाहून जाईल. त्यामुळे निश्चितपणे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी तातडीने कार्यवाही करावी. केंद्र सरकारने यामध्ये वाटाघाटी करून अलमट्टीची उंची वाढवण्याचे काम व जमिनीचे हस्तांतरण चालू आहे त्याला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनKarnatakकर्नाटकDamधरणMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार