शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

जिल्हा परिषद प्रभाग रचनेचा अधिकार राज्य शासनाला नाही, कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये आज होणार पुन्हा सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 11:38 IST

तब्बल तीन तास युक्तिवाद

कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या प्रभाग रचनेचा अधिकार हा राज्य निवडणूक आयोगाला आहे. हा अधिकार राज्य शासनाला नाही, असा तब्बल तीन तास युक्तिवाद सोमवारी करण्यात आला. पुन्हा आज, मंगळवारी दुपारी याबाबत सुनावणी होणार आहे. प्रभाग रचनेच्या अधिकाराचाच मुद्दा उपस्थित झाल्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकांच्या पुढच्या प्रक्रियेविषयी नेमके काय होणार हे येत्या आठवड्यात स्पष्ट होण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनेबाबत गेले दीड महिना न्यायालयीन कामकाज सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या करवीर, कागल आणि आजरा तालुक्यातील याचिकांचे कामकाज कोल्हापूर सर्किट बेंचच्या स्थापनेनंतर वर्ग करण्यात आले आहे. त्यानुसार ही सुनावणी सुरू असून, सोमवारी दुपारी अडीचपासून संध्याकाळी साडे पाचपर्यंत ही सुनावणी चालली. ॲड. श्रीकृष्ण गनबावले आणि ॲड. ऋतुराज पवार यांनी मुळातच रचनेच्या अधिकाराबाबतचा मुद्दा उपस्थित केला.संविधानानुसार मतदानाचा अधिकार आणि निवडणुका पारदर्शीपणे व्हायच्या असतील तर राज्य शासनाला प्रभाग रचनेचा अधिकार असून कसा चालेल असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. त्या त्या भागातील राजकीय स्थिती पाहून कुठल्या मतदारसंघाची रचना कशी करायची, कोणता भाग कुठल्या मतदारसंघातून काढायचा आणि कुठल्या मतदारसंघातून वगळायचा याचा निर्णय स्थानिक पातळीवर होत असेल तर ते योग्य होणार नाही. त्याचा परिणाम निवडणुका पारदर्शीपणे होण्यावर निश्चित होणार आहे. त्यामुळेच हा अधिकार राज्य शासनाला न देता तो राज्य निवडणूक आयोगाकडे असला पाहिजे, असा जोरकस युक्तिवाद यावेळी करण्यात आला.सरकारच्यावतीने ॲड. अनिल साखरे, ॲड. नेहा भिडे, निवडणूक आयोगाकडून ॲड. अतुल दामले, ॲड. सचिंद्र शेटे उपस्थित होते. परंतु, सोमवारी केवळ ॲड. गनबावले यांनीच युक्तिवाद केला. आता पुन्हा मंगळवारी दुपारी अडीच वाजता हा युक्तिवाद होणार आहे.

संपूर्ण राज्याचे लक्षकोल्हापूरच्या सर्किट बेंचमध्ये सुरू असलेल्या या जिल्हा परिषद प्रभाग रचनेच्या या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. रचनेच्या अधिकाराबाबत नेमका निर्णय काय लागणार यावरच सुरू असलेली प्रक्रिया पुढे सुरू ठेवायची की नाही हे ठरणार असल्याने ही सुनावणी लक्षवेधी ठरली आहे.