शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

पालकमंत्र्यांनी रस्ते न्हवे हाडांचे दवाखाने सुरू करावेत : संजय पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 16:25 IST

नवीन वाशीनाका येथे खड्ड्यात बसून शिवसेना उबाठा गटातर्फे रास्तारोको 

अमर पाटीलकळंबा : खराब रस्त्याच्या दर्जामुळे कोल्हापूरचे नाव सर्वत्र बदनाम झाले असून शहरासह उपनगरातील रस्त्याची खड्डे पडून चाळण झाली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी रस्ते निर्माण करण्यापेक्षा प्रत्येक ठिकाणी हाडांवरचे उपचार करणारे दवाखाने सुरू करावेत अशा आशयाच्या घोषणा देत शिवसेना उबाठा गटातर्फे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली नवीनवाशीनाका चौकात रास्तारोको करण्यात आला. यावेळी संपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाउपाध्यक्ष अवधूत साळोखे, शहराध्यक्ष रविकिरण इंगवले, सुनील मोदी यांच्यासह आंदोलकांनी मुख्य चौकातील खड्ड्यात बसून घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केल्याने राधानगरी रस्त्यावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय पवार म्हणाले, मिरजकर तिकटी येथे नुसताच दर्जेदार रस्ते करण्याच्या कामांचा शुभारंभ केला गेला पण त्याचे पुढे काय झाले पालकमंत्री यांनी स्पष्ट करावे. निव्वळ कागदोपत्री विकासकामे दाखवण्यात धन्यता मानली जाते प्रत्यक्ष विकास शून्य. निधी मंजूर झाल्यापासून ते काम सुरू होइपर्यंत टक्केवारीत विभाजन होत असल्याने कोल्हापूरचे नाव बदनाम झाले असून विकास कामे होत नाहीत ही वस्तुस्थिती असल्याचे मत व्यक्त केले. उपनगरातील सर्वच मुख्य रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून प्रशासनाला पाहणी करण्यासाठी वेळ मिळत नाही त्यामुळे तात्काळ कोल्हापुरातील रस्त्यांची कामे सुरू न झाल्यास महानगरपालिकेच्या दारात आंदोलन करण्याचा इशारा दिला. शहर अभियंता हर्षदीप घाटगे यांनी घटनास्थळी येवून याप्रश्नी तात्काळ कारवाईचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरroad transportरस्ते वाहतूकShiv Senaशिवसेनाguardian ministerपालक मंत्रीagitationआंदोलन