शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

मराठा भवन; जागेसाठी चार वर्षे वणवण, प्रस्ताव मंत्रालयात धूळ खात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 15:40 IST

आरक्षणाच्या मागणीसाठी एक मराठा.. लाख मराठा अशा घोषणा देत मुठी आवळणारा समाजही या प्रश्नावर मूग गिळून गप्प बसला आहे.

विश्वास पाटीलकोल्हापूर : मराठा समाजाचे शैक्षणिक, सामाजिक विकासाचे केंद्र ठरावे अशा मराठा भवनचा जागेचा प्रस्ताव गेले चार वर्षे मंत्रालयात धूळ खात पडला आहे. या भवनच्या उभारणीसाठी समाजाने दिलेले ३२ लाख रुपये बँकेत पडून आहेत. सरकारकडून जागा देण्याचा निर्णय होत नसल्याने सगळेच काम ठप्प आहे.कोल्हापूरचे राजकारण, समाजकारण, सहकार, शेती, साखर कारखानदारीपासून एकूणच जिल्ह्याच्या कारभारावर या समाजाचे वर्चस्व आहे. परंतु, तरीही या समाजाच्या प्रातिनिधिक संस्थेला सरकारकडून जागा मिळवून देता आलेले नाही. यासारखे मोठे दुर्दैव नाही अशी भावना या समाजातून व्यक्त होत आहे.अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष वसंत मुळीक यांच्या पुढाकारातून मराठा भवन उभारणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. हे भवन व्हावे यासाठी मुळीक धडपडत आहेत; परंतु समाजाची ताकद त्यांच्या मागे उभी राहिल्याशिवाय हे भवन उभारणे शक्य नाही. आरक्षणाच्या मागणीसाठी एक मराठा.. लाख मराठा अशा घोषणा देत मुठी आवळणारा समाजही या प्रश्र्नावर मूग गिळून गप्प बसला आहे.यासाठी मराठा स्वराज्य भवन ट्रस्ट संस्थेकडून जागा मागणीचा मूळ अर्ज २०१४ मध्ये तत्कालीन भाजप सरकारकडे करण्यात आला. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे महसूल मंत्रीही होते. त्यामुळे त्यांनी मनावर घेतले असते तर चुटकीसरशी हा निर्णय होऊ शकला असता, परंतु त्यांनी कोणत्याही संस्थेला जागा न देण्याचा भाजप सरकारचा निर्णय असल्याचे सांगून मी तुम्हाला जागेसाठी तीन कोटी रुपये देतो, त्यातून जागा विकत घ्या असा सल्ला दिला.परंतु हे तीन कोटीही मिळाले नाहीत व जागाही मिळालेली नाही. चार वर्षांपूर्वी आयटी पार्क शेजारी शासनाची रि.स.नं ६९७-अ मध्ये जागा उपलब्ध आहे. ती ९९ वर्षांच्या कराराने द्यावी, असा परिपूर्ण प्रस्ताव पाठविला. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे १२ जानेवारी २०२० ला नव्याने पत्रव्यवहार केला; परंतु गेल्या दोन वर्षांत त्यावर कोणताच निर्णय झालेला नाही.

एका खोलीतून काम..सांगली, बेळगाव, हैद्रराबाद अशा विविध ठिकाणी मराठा भवनच्या वास्तू यापूर्वीच उभ्या राहिल्या आहेत. परंतु, कोल्हापुरात मात्र त्यासाठी मराठा समाजाला झगडावे लागत असल्याचा अनुभव आहे. सध्या मराठा समाज संघटनेचे काम मुळीक यांच्या मंगळवार पेठेतील घरातील एका छोट्या खोलीतून चालते. एकूण मराठा समाजालाही मान खाली घालायला लावणारी गोष्ट आहे. परंतु, कोल्हापूरच्या जनतेला व नेतृत्वासह लोकप्रतिनिधी, समाजधुरीणांही त्याचे काहीच वाटत नाही.

पालकमंत्र्यांची जबाबदारीमराठा भवनसाठी जागा मिळवून देण्याची जबाबदारी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावरच आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री पाटील यांनी मोट बांधली तर ते मराठा भवनच काय, नवीन जिल्हा स्थापन करू शकतील एवढी त्यांची राजकीय ताकद आहे. त्यामुळे त्यांनीच या जागेसाठी ही ताकद पणाला लावण्याची गरज आहे. एखादी बैठक घेतल्याने हा प्रश्न मार्गी लागणार नाही.कसे असेल मराठा भवन..मराठा समाजाच्या विकासाचे आणि शिवशाहूंच्या विचाराचे केंद्र व्हावे असा भवनचा आराखडा आहे. त्यामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, वसतिगृह, ग्रंथालय, सांस्कृतिक सभागृह, शेतीविषयक मार्गदर्शन केंद्र असे त्याचे स्वरूप असेल. जागा मिळाल्यावर मराठा समाजाचे हजारो लोक असे आहेत की ते प्रत्येकी लाख रुपयांची मदत करायला तयार आहेत. पापा बागवान यांच्यासारख्या व्यक्तीने मराठा समाजाच्या पाठबळामुळे आम्ही कोल्हापुरात उभा राहिलो म्हणून लाख रुपयांची देणगी स्वत:हून आणून दिली आहे. असे अनेक समाज मराठा भवनसाठी मदत करू शकतात. परंतु, जागाच नसल्याने सगळेच काम थांबले आहे.

मराठा भवन व्हावे यासाठी आम्ही गेल्या सहा वर्षांपासून प्रयत्न करत आहोत. परंतु, जागेअभावी सर्व काही ठप्प झाले आहे. पालकमंत्री सतेज पाटील जागा मिळवून देण्याबाबत प्रयत्नशील आहेत. शिव-शाहूंच्या विचारांचे हे भवन होण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा. - वसंतराव मुळीक, राष्ट्रीय उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmarathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षण