शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सत्तारूढ महायुतीला कोल्हापूर जिल्ह्यात धक्क्यांवर धक्के, ‘बी’ प्लॅन काय याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 16:12 IST

भाजपची अवस्था ‘धोबी का..’

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार असताना आदल्या दिवशीच महायुतीला धक्क्यांवर धक्के बसले आहेत. यातून महायुती कशी सावरणार आणि त्यासाठीचा ‘बी’ प्लॅन काय करणार याकडेच आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.महायुतीचा घटक पक्ष असलेल्या जनसुराज्यचे संस्थापक आमदार विनय कोरे यांनी पहिला बॉम्ब टाकून करवीर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्याविरोधात संताजी घोरपडे यांची उमेदवारी जाहीर केली. आणखी एक घटक पक्ष असलेल्या ताराराणी आघाडीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी चिरंजीव राहुल आवाडे यांची अपक्ष उमेदवारी जाहीर करून दुसरा दणका दिला. याचदरम्यान भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन ‘तुतारी’ घेण्याची तयारी केली असून, ते आता थांबण्याच्या मनस्थितीत नाहीत.याचदरम्यान भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, दुसरीकडे अजित पवार गटाचे खंदे पदाधिकारी ए. वाय. पाटील यांनी प्रदेश उपाध्यक्ष पदासह, सदस्यपदाचाही राजीनामा बुधवारी दिला. इचलकरंजी, करवीर, राधानगरी आणि कागल अशा चार विधानसभा मतदारसंघांत महायुतीला हे धक्के बसले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या नसतानाही राजकीय हालचाली वेगावल्या आहेत.लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने इंडिया आघाडीने कोल्हापूर जिल्ह्यात नेत्रदीपक कामगिरी केली आहे त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या विरोधकांनी जोडण्या घालायला सुरुवात केली आहे. या राजीनामासत्रामुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके या महायुतीच्या उमेदवारांसमोरील अडचणी वाढू शकतात.आवाडे यांनी सुरुवातीला निवडून आल्यानंतर भाजपला पाठिंबा दिला होता; परंतु आता ते अपक्ष लढणार असल्याचे सांगत असून त्यांच्याबाबतीत भाजप काय निर्णय घेणार किंवा विनय कोरे यांना कशा पद्धतीने थांबवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आवाडे यांना भाजप अजून आतच घ्यायला तयार नाही. इचलकरंजीचा भाजप हा आवाडे यांच्यामुळे नव्हे, तर मूळच्या भाजपच्या कार्यकर्त्यांमुळेच असल्याची स्थानिकांची भावना आहे.

फडणवीस यांचा महाडिक यांना फोनसमरजित घाटगे यांच्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार धनंजय महाडिक यांना बुधवारी फोन केला. त्यानुसार त्यांनी दिलेला निरोप आपण घाटगे यांना देण्यासाठी भेटणार आहोत, अशी माहिती महाडिक यांनीच पत्रकारांना दिली. नाथाजी पाटील यांच्या नियुक्तीनंतर राहुल देसाई यांनी राजीनामा दिला आहे; परंतु त्यांना नवी जबाबदारी देण्यात येणार असून ते आज महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित राहतील असा दावाही महाडिक यांनी केला आहे.

भाजपची अवस्था ‘धोबी का..’कोल्हापूर जिल्हा भाजपची अवस्था ‘धोबी का कुत्ता घर का न घाट का’ अशी आज झाली असल्याची टीका ‘उबाठा’चे शहरप्रमुख सुनील मोदी यांनी पत्रकात केली आहे. त्यात ते म्हणतात, सत्तेचे आमिष दाखवून जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीसह अन्य पक्षांतील नेत्यांना पक्षात घेतले. व मूळ भाजपच्या लोकांना घरी बसवले. आज हेच बाहेरून आलेले नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. कारण ज्या उद्देशाने पक्षात आले होते तो उद्देश सफल होत नाही, हे लक्षात आल्यावर ते अन्य पक्षांत जात आहेत.

ज्या मंत्री चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरचे म्हणून ओळखले जाते, त्यांना कोल्हापूर जिल्हा खऱ्या अर्थाने कधी कळलाच नाही, हे भाजपचे दुर्दैव आहे. आता मात्र निष्ठावंतांची आठवण भाजप नेतृत्वाला होत आहे, म्हणूनच नाथा पाटीलसारख्या कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्ष केले जाते. स्वत:चा स्वार्थ साधणारे अनेकजण काही दिवसांत भाजप सोडून गेले तर आश्चर्य वाटायला नको.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस