शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

सत्तारूढ महायुतीला कोल्हापूर जिल्ह्यात धक्क्यांवर धक्के, ‘बी’ प्लॅन काय याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 16:12 IST

भाजपची अवस्था ‘धोबी का..’

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार असताना आदल्या दिवशीच महायुतीला धक्क्यांवर धक्के बसले आहेत. यातून महायुती कशी सावरणार आणि त्यासाठीचा ‘बी’ प्लॅन काय करणार याकडेच आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.महायुतीचा घटक पक्ष असलेल्या जनसुराज्यचे संस्थापक आमदार विनय कोरे यांनी पहिला बॉम्ब टाकून करवीर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्याविरोधात संताजी घोरपडे यांची उमेदवारी जाहीर केली. आणखी एक घटक पक्ष असलेल्या ताराराणी आघाडीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी चिरंजीव राहुल आवाडे यांची अपक्ष उमेदवारी जाहीर करून दुसरा दणका दिला. याचदरम्यान भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन ‘तुतारी’ घेण्याची तयारी केली असून, ते आता थांबण्याच्या मनस्थितीत नाहीत.याचदरम्यान भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, दुसरीकडे अजित पवार गटाचे खंदे पदाधिकारी ए. वाय. पाटील यांनी प्रदेश उपाध्यक्ष पदासह, सदस्यपदाचाही राजीनामा बुधवारी दिला. इचलकरंजी, करवीर, राधानगरी आणि कागल अशा चार विधानसभा मतदारसंघांत महायुतीला हे धक्के बसले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या नसतानाही राजकीय हालचाली वेगावल्या आहेत.लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने इंडिया आघाडीने कोल्हापूर जिल्ह्यात नेत्रदीपक कामगिरी केली आहे त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या विरोधकांनी जोडण्या घालायला सुरुवात केली आहे. या राजीनामासत्रामुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके या महायुतीच्या उमेदवारांसमोरील अडचणी वाढू शकतात.आवाडे यांनी सुरुवातीला निवडून आल्यानंतर भाजपला पाठिंबा दिला होता; परंतु आता ते अपक्ष लढणार असल्याचे सांगत असून त्यांच्याबाबतीत भाजप काय निर्णय घेणार किंवा विनय कोरे यांना कशा पद्धतीने थांबवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आवाडे यांना भाजप अजून आतच घ्यायला तयार नाही. इचलकरंजीचा भाजप हा आवाडे यांच्यामुळे नव्हे, तर मूळच्या भाजपच्या कार्यकर्त्यांमुळेच असल्याची स्थानिकांची भावना आहे.

फडणवीस यांचा महाडिक यांना फोनसमरजित घाटगे यांच्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार धनंजय महाडिक यांना बुधवारी फोन केला. त्यानुसार त्यांनी दिलेला निरोप आपण घाटगे यांना देण्यासाठी भेटणार आहोत, अशी माहिती महाडिक यांनीच पत्रकारांना दिली. नाथाजी पाटील यांच्या नियुक्तीनंतर राहुल देसाई यांनी राजीनामा दिला आहे; परंतु त्यांना नवी जबाबदारी देण्यात येणार असून ते आज महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित राहतील असा दावाही महाडिक यांनी केला आहे.

भाजपची अवस्था ‘धोबी का..’कोल्हापूर जिल्हा भाजपची अवस्था ‘धोबी का कुत्ता घर का न घाट का’ अशी आज झाली असल्याची टीका ‘उबाठा’चे शहरप्रमुख सुनील मोदी यांनी पत्रकात केली आहे. त्यात ते म्हणतात, सत्तेचे आमिष दाखवून जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीसह अन्य पक्षांतील नेत्यांना पक्षात घेतले. व मूळ भाजपच्या लोकांना घरी बसवले. आज हेच बाहेरून आलेले नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. कारण ज्या उद्देशाने पक्षात आले होते तो उद्देश सफल होत नाही, हे लक्षात आल्यावर ते अन्य पक्षांत जात आहेत.

ज्या मंत्री चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरचे म्हणून ओळखले जाते, त्यांना कोल्हापूर जिल्हा खऱ्या अर्थाने कधी कळलाच नाही, हे भाजपचे दुर्दैव आहे. आता मात्र निष्ठावंतांची आठवण भाजप नेतृत्वाला होत आहे, म्हणूनच नाथा पाटीलसारख्या कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्ष केले जाते. स्वत:चा स्वार्थ साधणारे अनेकजण काही दिवसांत भाजप सोडून गेले तर आश्चर्य वाटायला नको.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस