शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
2
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
3
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
4
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
5
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
6
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
7
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
8
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
9
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
10
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
11
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
12
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
13
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
14
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
15
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
16
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
17
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
18
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
19
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
20
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका

जिल्हा परिषदेच्या पाच विभागाच्या योजना ग्रामीण विकास यंत्रणेला जोडल्या, ग्रामविकास विभागाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 12:49 IST

राज्यातील ग्रामीण भागातील केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजनांची जिल्हा स्तरावर एकाच यंत्रणेकडून प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

समीर देशपांडे

कोल्हापूर : जिल्हा परिषदेकडील पाच योजना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला जोडण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. राज्यातील ग्रामीण भागातील केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजनांची जिल्हा स्तरावर एकाच यंत्रणेकडून प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या विविध योजना राबवण्यासाठी देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये २ फेब्रुवारी १९८२ पासून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा हा स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला. या यंत्रणेकडील कर्मचाऱ्यांचे वेतन व प्रशासकीय खर्चासाठी केंद्र शासनाकडून ६० टक्के व ४० टक्के राज्याकडून हिस्सा दिला जात होता. परंतु केंद्र शासनाने मार्च २०२२ नंतर हा निधी थांबवण्याचा निर्णय घेतला होता.

परंतु महाराष्ट्र शासनाने ६० टक्क्यांच्या हिश्श्याची जबाबादारी उचलत हा विभाग आणखी बळकट करण्याचे ठरवले होते. त्यानुसार या विभागाकडील कार्यभार आणखी वाढवण्यात आला आहे. त्यांच्याकडील नियमित कामकाजाबरोबरच जिल्हा परिषदेच्या पाच विभागांकडील योजना या विभागाकडे जोडण्यात आल्या आहेत. या योजनांची कार्यवाही करताना थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांऐवजी आता ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांमार्फत जावे लागणार आहे. अधिक प्रभावीपणे योजना राबवण्यासाठी हा बदल उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.

नव्याने जोडण्यात आलेल्या योजना

खाते प्रमुख / अधिकारी विषय / योजना
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायतराष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान, वित्त आयोग, सांसद आदर्श ग्राम योजना
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, नरेगा, ग्रा. पं.महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, मनरेगा
उपमुख्य कार्य. अधिकारी पाणी व स्वच्छता तथा प्रकल्प संचालकस्वच्छ भारत मिशन
कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठाजलजीवन मिशन
कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनाप्रधानमंत्री ग्रामसडक योजना

केंद्र शासनाच्या निधीचा हिस्सा थांबल्यानंतरही महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने राज्याच्या निधीतून हा विभाग बळकट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पाच विभागांच्या योजना ग्रामीण विकास यंत्रणेला जोडण्यात आल्या असून, याचा चांगला परिणाम नजीकच्या काळात दिसून येईल. - हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषदRural Developmentग्रामीण विकास