शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या पाच विभागाच्या योजना ग्रामीण विकास यंत्रणेला जोडल्या, ग्रामविकास विभागाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 12:49 IST

राज्यातील ग्रामीण भागातील केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजनांची जिल्हा स्तरावर एकाच यंत्रणेकडून प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

समीर देशपांडे

कोल्हापूर : जिल्हा परिषदेकडील पाच योजना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला जोडण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. राज्यातील ग्रामीण भागातील केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजनांची जिल्हा स्तरावर एकाच यंत्रणेकडून प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या विविध योजना राबवण्यासाठी देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये २ फेब्रुवारी १९८२ पासून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा हा स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला. या यंत्रणेकडील कर्मचाऱ्यांचे वेतन व प्रशासकीय खर्चासाठी केंद्र शासनाकडून ६० टक्के व ४० टक्के राज्याकडून हिस्सा दिला जात होता. परंतु केंद्र शासनाने मार्च २०२२ नंतर हा निधी थांबवण्याचा निर्णय घेतला होता.

परंतु महाराष्ट्र शासनाने ६० टक्क्यांच्या हिश्श्याची जबाबादारी उचलत हा विभाग आणखी बळकट करण्याचे ठरवले होते. त्यानुसार या विभागाकडील कार्यभार आणखी वाढवण्यात आला आहे. त्यांच्याकडील नियमित कामकाजाबरोबरच जिल्हा परिषदेच्या पाच विभागांकडील योजना या विभागाकडे जोडण्यात आल्या आहेत. या योजनांची कार्यवाही करताना थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांऐवजी आता ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांमार्फत जावे लागणार आहे. अधिक प्रभावीपणे योजना राबवण्यासाठी हा बदल उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.

नव्याने जोडण्यात आलेल्या योजना

खाते प्रमुख / अधिकारी विषय / योजना
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायतराष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान, वित्त आयोग, सांसद आदर्श ग्राम योजना
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, नरेगा, ग्रा. पं.महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, मनरेगा
उपमुख्य कार्य. अधिकारी पाणी व स्वच्छता तथा प्रकल्प संचालकस्वच्छ भारत मिशन
कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठाजलजीवन मिशन
कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनाप्रधानमंत्री ग्रामसडक योजना

केंद्र शासनाच्या निधीचा हिस्सा थांबल्यानंतरही महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने राज्याच्या निधीतून हा विभाग बळकट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पाच विभागांच्या योजना ग्रामीण विकास यंत्रणेला जोडण्यात आल्या असून, याचा चांगला परिणाम नजीकच्या काळात दिसून येईल. - हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषदRural Developmentग्रामीण विकास