शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

...अन ‘महाज्योती’ने बदलले प्रतिज्ञापत्र, ‘लोकमत’ बातमीचा परिणाम; संशोधक विद्यार्थ्यांना मिळाला न्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 13:18 IST

‘लोकमत’ने १ ऑगस्टच्या अंकात ‘शिष्यवृत्ती दिली, पुढे काही मागायचे नाही’, या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच महाज्योती प्रशासन खडबडून जागे झाले

कोल्हापूर : राज्य सरकारने पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरसकट ५० टक्के शिष्यवृत्ती जाहीर केली. मात्र, मंजूर शिष्यवृत्तीव्यतिरिक्त इतर कोणत्याच रकमेची मागणी शासनाकडे करणार नाही, अशी अटच ‘महाज्योती’ या संस्थेने प्रतिज्ञापत्रात टाकली होती. याबाबत ‘लोकमत’ने १ ऑगस्टच्या अंकात ‘शिष्यवृत्ती दिली, पुढे काही मागायचे नाही’, या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच महाज्योती प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांनी तत्काळ ही अटच या प्रतिज्ञापत्रातून काढून टाकली आहे. ‘लोकमत’ने या अन्यायाविरोधात आवाज उठवल्याने आम्हाला न्याय मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत आहे.राज्यातील अनुसूचित जाती, जमाती, मराठा, ओबीसी, भटके-विमुक्त इ. प्रवर्गातील संशोधक विद्यार्थ्यांसाठी ५ वर्षांकरिता संशोधन करण्यासाठी अधिछात्रवृत्ती (शिष्यवृत्ती) दिली जाते. गत आठवड्यात सामाजिक न्याय विभागाने सर्व पात्र विद्यार्थ्यांना ५० टक्के दराने अधिछात्रवृत्ती देण्याचे जाहीर केले.मात्र, ‘महाज्योती’ने ५० टक्के शिष्यवृत्तीव्यतिरिक्त ‘मी इतर काेणत्याच रकमेची मागणी शासन व महाज्योतीकडे करणार नाही’, अशी अट प्रतिज्ञापत्रात टाकल्याने संशोधक विद्यार्थी संतापले होते. सरकार विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कावरती गदा आणत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. विद्यार्थ्यांवर होणाऱ्या या अन्यायाला ‘लोकमत’ने वाचा फोडल्याने महाज्योतीने गुरुवारी नवे प्रतिज्ञापत्र विद्यार्थ्यांना दिले. यातील वादग्रस्त अट काढून टाकण्यात आली.

‘लोकमत’ने विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडल्याने व कृती समितीच्या पाठपुराव्याने ही अट बदलली आहे. आम्हाला न्याय मिळवून दिल्याबद्दल ‘लोकमत’चे आभार. - सद्दाम मुजावर, अध्यक्ष, महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समिती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरResearchसंशोधनStudentविद्यार्थीScholarshipशिष्यवृत्ती