शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

...अन ‘महाज्योती’ने बदलले प्रतिज्ञापत्र, ‘लोकमत’ बातमीचा परिणाम; संशोधक विद्यार्थ्यांना मिळाला न्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 13:18 IST

‘लोकमत’ने १ ऑगस्टच्या अंकात ‘शिष्यवृत्ती दिली, पुढे काही मागायचे नाही’, या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच महाज्योती प्रशासन खडबडून जागे झाले

कोल्हापूर : राज्य सरकारने पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरसकट ५० टक्के शिष्यवृत्ती जाहीर केली. मात्र, मंजूर शिष्यवृत्तीव्यतिरिक्त इतर कोणत्याच रकमेची मागणी शासनाकडे करणार नाही, अशी अटच ‘महाज्योती’ या संस्थेने प्रतिज्ञापत्रात टाकली होती. याबाबत ‘लोकमत’ने १ ऑगस्टच्या अंकात ‘शिष्यवृत्ती दिली, पुढे काही मागायचे नाही’, या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच महाज्योती प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांनी तत्काळ ही अटच या प्रतिज्ञापत्रातून काढून टाकली आहे. ‘लोकमत’ने या अन्यायाविरोधात आवाज उठवल्याने आम्हाला न्याय मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत आहे.राज्यातील अनुसूचित जाती, जमाती, मराठा, ओबीसी, भटके-विमुक्त इ. प्रवर्गातील संशोधक विद्यार्थ्यांसाठी ५ वर्षांकरिता संशोधन करण्यासाठी अधिछात्रवृत्ती (शिष्यवृत्ती) दिली जाते. गत आठवड्यात सामाजिक न्याय विभागाने सर्व पात्र विद्यार्थ्यांना ५० टक्के दराने अधिछात्रवृत्ती देण्याचे जाहीर केले.मात्र, ‘महाज्योती’ने ५० टक्के शिष्यवृत्तीव्यतिरिक्त ‘मी इतर काेणत्याच रकमेची मागणी शासन व महाज्योतीकडे करणार नाही’, अशी अट प्रतिज्ञापत्रात टाकल्याने संशोधक विद्यार्थी संतापले होते. सरकार विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कावरती गदा आणत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. विद्यार्थ्यांवर होणाऱ्या या अन्यायाला ‘लोकमत’ने वाचा फोडल्याने महाज्योतीने गुरुवारी नवे प्रतिज्ञापत्र विद्यार्थ्यांना दिले. यातील वादग्रस्त अट काढून टाकण्यात आली.

‘लोकमत’ने विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडल्याने व कृती समितीच्या पाठपुराव्याने ही अट बदलली आहे. आम्हाला न्याय मिळवून दिल्याबद्दल ‘लोकमत’चे आभार. - सद्दाम मुजावर, अध्यक्ष, महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समिती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरResearchसंशोधनStudentविद्यार्थीScholarshipशिष्यवृत्ती