शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
5
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
6
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
7
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
8
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
9
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
10
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
11
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
12
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
13
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
14
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
15
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
16
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
17
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
18
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य क्षेत्रात आणखी दीर्घकालीन संशोधनाची गरज - ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिनकर साळुंके 

By संदीप आडनाईक | Updated: February 24, 2023 19:22 IST

‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, शाहिदा परवीन यांना डी.लिट. : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा शानदार दीक्षांत सोहळा

कोल्हापूर : आरोग्य क्षेत्रात आणखी दीर्घकालीन संशोधनाची गरज आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी संशोधनावरही भर दिला पाहिजे. त्यांनी त्याचा उपयोग केवळ समाजासाठी झाला पाहिजे, हे एकच लक्ष्य डोक्यात ठेवले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि नवी दिल्ली येथील ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी’चे माजी संचालक डॉ. दिनकर साळुंके यांनी केले. येथील डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या अकराव्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलपती डॉ. संजय डी. पाटील होते.

हॉटेल सयाजीच्या व्हिक्टोरिया सभागृहात ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले आणि जम्मू-काश्मीरच्या पोलिस उपायुक्त शाहिदा परवीन यांना या सोहळ्यात डी.लिट. पदवीने सन्मानित करण्यात आले. यावेळी ५२० विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी देण्यात आली. ९ विद्यार्थी सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. एक्सलन्स इन रिसर्च म्हणून डॉ. नवनाथ पडळकर यांना सन्मानित करण्यात आले.

औषधांची तीव्रता काही कालावधीनंतर कमी होत जाते म्हणून औषधांचे संशोधन ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याचे सांगून डॉ. साळुंके म्हणाले, पदवी मिळाली हे अर्थार्जनाचे साधन झाले, एवढा मर्यादित विचार न करता त्याला संशोधनाची जोड द्या. त्यात खरे समाजहित आहे. नशीब व जादू कधीच उपयोगी पडत नाही. तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असल्यास त्यासाठी मेहनतच उपयोगी ठरते, याची खूणगाठ मनाशी बांधा.

लसनिर्मिती क्षेत्रात भारत एक महत्त्वाचा देश म्हणून उदयास आला आहे. सिरम आणि भारत बायोटेक्सने उत्पादित केलेल्या लसींची जगभरात निर्यात केली जाते. हा एक विक्रम असून, हे सर्व संशोधनामुळेच शक्य झाले. भारत औषध निर्मितीच्या क्षेत्रात तिसऱ्या स्थानावर आहे. वैद्यकीय सेवा आणि लस निर्मितीच्या क्षेत्रातही देशाने मोठी झेप घेतली आहे, हे सर्व सातत्यपूर्ण संशोधनामुळेच शक्य झाले आहे.

‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले म्हणाले, प्रसार माध्यमे आणि पोलिस यांच्याबद्दल लोक चांगले बोलत नाहीत, अशा परिस्थितीत या दोन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानाने डी. लिट दिली ही कृतज्ञता आहे. खळबळजनक बातम्या देण्याच्या प्रयत्नात माध्यमांवरचा विश्वास डळमळतो आहे. राजकीय नेते आणि माध्यमातील व्यक्तीपण याला कारणीभूत आहेत. या पार्श्वभूमीवर माध्यमांनी लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. कोल्हापूरने मला खूप दिले. शाहूंच्या विचाराचा आज मी वाहक झालो, तो कोल्हापूरमुळे. त्याबद्दल माझ्या मनात कमालीची कृतज्ञता आहे.

पोलिस उपायुक्त शाहिदा परवीन गांगुली म्हणाल्या, या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी मला योग्य समजले गेले, हे मी माझे भाग्य समजते. विविध पदवी घेतलेल्या स्नातकांच्या यशात मी सहभागी झाले. हे सर्वजण भविष्यातील त्यांच्या क्षेत्रात यशस्वी होतील, त्याबद्दल मला आत्मविश्वास आहे. कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा मांडला. डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी शाहिदा परवीन आणि वसंत भोसले या दोन्ही सन्मानित व्यक्ती खऱ्या रोल मॉडेल असून, समाज अशाच व्यक्तींना पाहून घडत असतो, असे त्यांनी सांगितले.

भव्य शोभायात्रेने दीक्षांत समारंभाला प्रारंभ झाला. समारंभास व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, मुंबई विद्यापीठ माजी कुलगुरू डॉ. विजय खोले, कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले, यांच्यासह आक्काताई भोसले, मीना शेषू, जयवंत भोसले उपस्थित होते. डॉ. देवव्रत हर्षे आणि डॉ. निवेदिता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. नितीन वाधवानी आणि पद्मजा देसाई यांनी मानपत्राचे वाचन केले.

सुलभा पन्हाळकर यांचा विशेष सन्मान

डॉ. संजय आणि सतेज पाटील यांच्या शिक्षणाचा प्रारंभ ज्या गणेश विद्यालयातून झाला, त्या विद्यालयाच्या पहिल्या शिक्षिका सुलभा पन्हाळकर यांना शांतादेवी डी. पाटील यांच्या हस्ते या साेहळ्यात सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरd y patil universityडी. वाय. पाटील विद्यापीठ