शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

Raju Shetty: हमीभाव कायद्यासाठी लढा उभारणार - राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 13:44 IST

बळीराजा हुंकार यात्रेच्या माध्यमातून हमीभावासाठी जागर सुरू आहे. ग्रामसभांच्या ठरावासह ३०० हून अधिक संघटना राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत.

चंदगड : शेतीमालाला हमीभाव मिळवून देणारा कायदा करण्यासाठी एमएसपी गॅरंटी किसान मोर्चाच्या माध्यमातून लढा उभारणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.तुडीये येथील बळीराजा हुंकार यात्रेच्या जागर सभेसाठी ते चंदगडला आले होते. दरम्यान, ढोलगरवाडी येथे माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. ऊसदर नियंत्रण समितीत दुबळी माणसे असल्यानेच सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे पाडले, असा आरोप त्यांनी केला.शेट्टी म्हणाले, बळीराजा हुंकार यात्रेच्या माध्यमातून हमीभावासाठी जागर सुरू आहे. ग्रामसभांच्या ठरावासह ३०० हून अधिक संघटना राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. कायदा झाल्यास शेतीमालाचे भाव वर्षभर स्थिर राहतील. यावेळी पीएचडी मिळविल्याबद्दल शाहू गावडे यांचा शेट्टी यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार झाला. यावेळी राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, राजू पाटील, पंकज पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते. दीपक पाटील यांनी आभार मानले.

धोरणानुसार निवडणुका लढवाव्यात

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक मुद्द्यांवर होत असतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपापल्या पातळीवर संघटनेच्या धोरणास अनुसरून निवडणुका लढवाव्यात, त्यास आपला पाठिंबा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी