शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
3
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
4
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
5
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
6
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
7
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
8
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
9
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
10
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
11
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
13
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
14
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
15
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
16
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
17
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
18
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
19
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
20
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले

सत्तारुढच मंत्रालयावरून उड्या मारतात ही सरकारची लायकी, नाना पटोले यांची बोचरी टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 18:16 IST

राज्यात सत्ता परिवर्तन अटळ

कोल्हापूर : सत्ता पक्षाचे आमदार मंत्रालयावरून उड्या मारून बंड पुकारत असतील तर या सरकारची लायकी काय आहे हेही स्पष्ट होते, अशी बोचरी टीका काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली. महायुती सरकारने राज्यात अनेक चुकीचे निर्णय घेऊन महाराष्ट्राचा लिलाव काढला असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली.पटोले म्हणाले, आपण पुन्हा सत्तेत येत नाही, याची जाणीव झाल्यामुळे महायुती सरकारकडून गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्राचा लिलाव करण्यासारखी परिस्थिती निर्माण केली आहे. लोकहितापेक्षा स्वत:च्या हिताचे निर्णय घेण्याचा महायुती सरकारने धडका लावला आहे. परंतु, सत्ता परिवर्तनानंतर आमच्या सरकारला महाराष्ट्राच्या हितासाठी काही ठोस निर्णय घ्यावे लागतील. राज्यातील सत्ता परिवर्तन अटळ आहे. राज्यातील सरकार दिवाळखोर आहे. विविध योजना, कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी तीस हजार कोटींचे ओव्हरड्राफ्ट घेतले आहेत. हेच एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारचे यश असल्याचे सिद्ध होत आहे.

महाराष्ट्र सुरक्षित नाही..आपण शाहू महाराजांच्या भूमीत आहोत. या भूमीने देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला समतेचा विचार दिला. महिलांचा सन्मान, सगळ्या जातीधर्मांना सोबत घेऊन चालण्याचा संदेश याच भूमीने दिला. पण आज महाराष्ट्रात समता राहिली नाही. महिला तर कुठेही सुरक्षित राहिलेल्या नाहीत. असे एक शहर नाही, गाव नाही जिथे आमची लहान मुलगी सुरक्षित आहे. आम्ही सरकारला राज्यातील १०६४ महिला बेपत्ता आहेत त्यांचे काय झाले असे विचारले? त्यावर अद्याप उत्तर दिले नाही, असे पटोले यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNana Patoleनाना पटोलेMahayutiमहायुती