शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

सत्तारुढच मंत्रालयावरून उड्या मारतात ही सरकारची लायकी, नाना पटोले यांची बोचरी टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 18:16 IST

राज्यात सत्ता परिवर्तन अटळ

कोल्हापूर : सत्ता पक्षाचे आमदार मंत्रालयावरून उड्या मारून बंड पुकारत असतील तर या सरकारची लायकी काय आहे हेही स्पष्ट होते, अशी बोचरी टीका काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली. महायुती सरकारने राज्यात अनेक चुकीचे निर्णय घेऊन महाराष्ट्राचा लिलाव काढला असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली.पटोले म्हणाले, आपण पुन्हा सत्तेत येत नाही, याची जाणीव झाल्यामुळे महायुती सरकारकडून गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्राचा लिलाव करण्यासारखी परिस्थिती निर्माण केली आहे. लोकहितापेक्षा स्वत:च्या हिताचे निर्णय घेण्याचा महायुती सरकारने धडका लावला आहे. परंतु, सत्ता परिवर्तनानंतर आमच्या सरकारला महाराष्ट्राच्या हितासाठी काही ठोस निर्णय घ्यावे लागतील. राज्यातील सत्ता परिवर्तन अटळ आहे. राज्यातील सरकार दिवाळखोर आहे. विविध योजना, कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी तीस हजार कोटींचे ओव्हरड्राफ्ट घेतले आहेत. हेच एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारचे यश असल्याचे सिद्ध होत आहे.

महाराष्ट्र सुरक्षित नाही..आपण शाहू महाराजांच्या भूमीत आहोत. या भूमीने देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला समतेचा विचार दिला. महिलांचा सन्मान, सगळ्या जातीधर्मांना सोबत घेऊन चालण्याचा संदेश याच भूमीने दिला. पण आज महाराष्ट्रात समता राहिली नाही. महिला तर कुठेही सुरक्षित राहिलेल्या नाहीत. असे एक शहर नाही, गाव नाही जिथे आमची लहान मुलगी सुरक्षित आहे. आम्ही सरकारला राज्यातील १०६४ महिला बेपत्ता आहेत त्यांचे काय झाले असे विचारले? त्यावर अद्याप उत्तर दिले नाही, असे पटोले यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNana Patoleनाना पटोलेMahayutiमहायुती