शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

सत्तारुढच मंत्रालयावरून उड्या मारतात ही सरकारची लायकी, नाना पटोले यांची बोचरी टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 18:16 IST

राज्यात सत्ता परिवर्तन अटळ

कोल्हापूर : सत्ता पक्षाचे आमदार मंत्रालयावरून उड्या मारून बंड पुकारत असतील तर या सरकारची लायकी काय आहे हेही स्पष्ट होते, अशी बोचरी टीका काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली. महायुती सरकारने राज्यात अनेक चुकीचे निर्णय घेऊन महाराष्ट्राचा लिलाव काढला असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली.पटोले म्हणाले, आपण पुन्हा सत्तेत येत नाही, याची जाणीव झाल्यामुळे महायुती सरकारकडून गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्राचा लिलाव करण्यासारखी परिस्थिती निर्माण केली आहे. लोकहितापेक्षा स्वत:च्या हिताचे निर्णय घेण्याचा महायुती सरकारने धडका लावला आहे. परंतु, सत्ता परिवर्तनानंतर आमच्या सरकारला महाराष्ट्राच्या हितासाठी काही ठोस निर्णय घ्यावे लागतील. राज्यातील सत्ता परिवर्तन अटळ आहे. राज्यातील सरकार दिवाळखोर आहे. विविध योजना, कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी तीस हजार कोटींचे ओव्हरड्राफ्ट घेतले आहेत. हेच एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारचे यश असल्याचे सिद्ध होत आहे.

महाराष्ट्र सुरक्षित नाही..आपण शाहू महाराजांच्या भूमीत आहोत. या भूमीने देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला समतेचा विचार दिला. महिलांचा सन्मान, सगळ्या जातीधर्मांना सोबत घेऊन चालण्याचा संदेश याच भूमीने दिला. पण आज महाराष्ट्रात समता राहिली नाही. महिला तर कुठेही सुरक्षित राहिलेल्या नाहीत. असे एक शहर नाही, गाव नाही जिथे आमची लहान मुलगी सुरक्षित आहे. आम्ही सरकारला राज्यातील १०६४ महिला बेपत्ता आहेत त्यांचे काय झाले असे विचारले? त्यावर अद्याप उत्तर दिले नाही, असे पटोले यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNana Patoleनाना पटोलेMahayutiमहायुती