शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: हत्तींच्या वावरामुळे चंदगडच्या शेतकऱ्यांच्या जिवाला घोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 19:36 IST

शेतीच नको, अशी म्हणण्याची वेळ 

निंगाप्पा बोकडेचंदगड : सिंधुदुर्ग जिल्हा, कर्नाटक हद्दीत व पुढे अनेक गावांचा प्रवास करत २५ वर्षांपूर्वी चंदगड तालुक्यातील पश्चिम भागात पोहोचलेल्या हत्तीने अलीकडील काही वर्षांत आपला मोर्चा पूर्व भागाकडेही वळविला आहे. शेतीसह वाहनांवर थेट हल्ले यात पाचजणांना जीव गमवावा लागल्याने शेतकरी पुरता घाबरला असून त्याच्यापासून आपल्या शेतीचे संरक्षण करताना तो मेटाकुटीला आल्यामुळे ती शेतीच नको, अशी म्हणण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.सुगीच्या हंगामात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरंगे जंगलात असलेले हत्ती कर्नाटक हद्दीतील जंगलातून दरवर्षी कणकुंबी-ओलमणी या गावाचा प्रवास करत खानापूर तालुक्यातील जांभेगाळी-देवराई गावाजवळील जंगलातून चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागात येत आहेत. त्यांनी हाजगोळी, कळसगादे, पाटणे, जेलुगडे, कलिवडे, हेरे, खामदळे, कानूर, पिळणी भागात नुकसान चालविले आहे.आता तर या हत्तीने आपला मोर्चा पूर्व भागाकडे वळवत चिंचणे, कामेवाडी, होसूर, कर्नाटक हद्दीतील बेकिनकरे, अतिवाड या गावात धुडगूस घातला आहे. तालुक्यातील पश्चिम भागात ऊस, केळी, रताळी या पिकांवर ताव मारायला मिळत असल्याने त्याने आपला मोर्चा या भागात कायम ठेवला आहे. त्यानंतर पूर्वभागातील ऊस, केळी व इतर खाद्यही त्याला गोड लागल्याने त्याने आपला मुक्काम तिकडेही वाढविला आहे, पण अलीकडे त्याने शिवारातील धुडगूससोबत वाहनांवर हल्ले, बैलगाडी, ट्रॅक्टरचे नुकसान चालविले आहे. त्याचा आक्रमकपणा वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.पाटणे व चंदगड वनविभागाकडून वन्यप्राण्यांपासून शेतीच्या संरक्षणासाठी प्रयत्न केले जातात, पण हत्ती, गवे, रानडुक्कर व इतर प्राण्यांचा उपद्रव इतका वाढला आहे की, पंचनामा करण्यापलीकडे त्यांच्याकडे प्रभावी उपाययोजना नाही.

खाद्याची सोय जंगलात करण्याची मोहीमतालुक्यात जंगलात सर्व प्रकारचे वन्यप्राणी जंगलात आहेत. त्यांच्या खाद्याची सोय जंगलात होत नसल्याने त्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे तो कमी करण्यासाठी वनविभागाकडून त्यांच्या खाद्याची सोय जंगलात करण्याची मोहीम सुरू केली आहे. येत्या काही वर्षांत त्यामध्ये यशस्वीही होऊ, पण त्याला थोडा वेळ लागणार असल्याचे वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे यांनी सांगितले.

हत्तींवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न

हत्तींवर नियंत्रण करण्यासाठी ट्रंक काॅल द वाईल्ड लाईफ फाऊंडेशनच्या माध्यमातून आनंद शिंदे यांचे तालुक्यात काम सुरू होते. त्याचे चांगले परिणाम दिसून येत होते. अजून काही वर्षे त्यांना संधी दिली असती तर अजून खूप चांगले परिणाम पाहावयास मिळाले असते, पण शासनाने त्यांचा करार पुढे चालू न ठेवल्याने त्यांनी काम थांबविले आहे. त्यामुळे हत्तींवर नियंत्रण मिळवायचे झाल्यास या संस्थेला आणखी काही वर्षे संधी देणे गरजेचे आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandgad-acचंदगडforestजंगलAnimalप्राणीFarmerशेतकरी