शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

कोल्हापुरातील पूरग्रस्त गावांच्या पुनर्वसनाचा तिढा सुटता सुटेना, ग्रामस्थांची मानसिकता आड 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: July 29, 2023 12:43 IST

प्रत्येक वर्षी महापूर आला की त्याची चर्चा होते आणि पूर ओसरला की ती हवेत विरून जाते.

इंदुमती गणेशकोल्हापूर : पूरग्रस्तांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सरकारने जागा दिली पाहिजे, जागा मिळाली तरी आम्ही जुन्या घराचा ताबा शासनाला परत देणार नाही. पूर येईल तेवढ्यापुरते शासनाच्या जागेत आणि इतर वेळी गावच्या घरात राहतो, या मानसिकतेमुळे प्रयाग चिखली, आंबेवाडीसह पूरग्रस्त गावांचे कायमचे पुनर्वसन रखडले आहे.गावातील मजबूत पिढ्यानपिढ्या राहत असलेली घरे सोडून माळावर जायला कोणीही ग्रामस्थ तयार होत नाहीत. सरकार म्हणते गावातील घरे सरकारच्या नावांवर करा, मगच तुमचे पुनर्वसन करतो, असा पेच तयार झाला आहे. प्रत्येक वर्षी महापूर आला की त्याची चर्चा होते आणि पूर ओसरला की ती हवेत विरून जाते.पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पूरबाधितांना सोमवारी तुम्ही राहते घर ताब्यात दिले तरच दुसरी जागा देऊन कायमस्वरूपी पुनर्वसन करू अन्यथा तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केली जाईल असे स्पष्ट केले आहे. यावर आता गावांनी निर्णय घेणे अपेक्षित आहे. कोल्हापुरात २०१९ सालापासून एक वर्ष आडाने पूर येत आहे.

करवीरमधील प्रयाग चिखली, आंबेवाडी, वळिवडे ही गावे कायम पुराच्या छायेखाली असतात. त्यातील प्रयाग चिखली व वळिवडे येथील नागरिकांना कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी भूखंडाचे वाटप झाले आहे. पण वाटप झालेल्या भूखंडाची अवैध विक्री करून ग्रामस्थ पूरबाधित होणाऱ्या गावठाण भागातल्या जुन्या घरातच राहत आहेत. अनेक जण पूर आला की शासनाने दिलेल्या जागेत जाऊन राहतात आणि पूर ओसरला की पुन्हा गावात येतात असा अनुभव आहे. म्हणजे सरकारी जमीन तर हवी, पण जुने घरही सोडणार नाही, अशी ग्रामस्थांची मानसिकता आहे.

गाव म्हणून निर्णय घ्या...पालकमंत्री सोमवारी दिलेल्या भेटीदरम्यान ग्रामस्थांना एका पर्यायाची निवड करा असे सांगितले आहे. कायमचे पुनर्वसन हवे तर राहते घर, जागा सरकारच्या ताब्यात द्या, पूर आल्यावर तात्पुरते स्थलांतर करायचे असेल तर निवारा शेड उभारल्या जातील, त्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेतला जाईल, पण गाव म्हणून सगळ्यांनी एकच निर्णय घ्या.

ताबा दिला की सातबारावर नाव लावणारशासनाने प्रयाग चिखली ग्रामस्थांसाठी १९८९ साली जमिनीचे प्लॉट पाडले होते. त्या सगळ्या सरकार नावे ठेवण्यात येणार आहेत. जे कुटुंब आपले राहते घर प्रशासनाच्या ताब्यात देईल. त्याचवेळी प्रशासन नव्या जागेच्या सातबारावर कुटुंबाचे नाव लावणार आहे.

शर्तभंगाचे प्लॉट परत घेणारशासनाने ग्रामस्थांना दुसरी जागा राहण्यासाठी दिली आहे. त्याची विक्री करून जुन्या घरात राहणे हे बेकायदेशीर व शर्तभंग करणारे आहे. अशा शर्तभंग झालेल्या जमिनी पुन्हा सरकार हक्कात घेतल्या जाणार आहेत.

पूरबाधितांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी शासन सकारात्मक आहे. त्यासाठीच्या अटी-शर्तींची पूर्तता करून जे घराचा ताबा देतील त्यांचे नाव लगेचच सरकारी जमिनीच्या सातबारावर लावले जाईल. - स्वप्निल रावडे, तहसीलदार, करवीर 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूर