शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

"इथं थांबून उपयोग नाही, मराठा आरक्षणाचा विषय पंतप्रधानांपर्यंत पोहोचला पाहिजे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 21:01 IST

मराठा आरक्षणासंदर्भात राज्यातील घडामोडींकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे

मुंबई/कोल्हापूर - राज्यातील मराठाआरक्षणाचा विषय गंभीर बनला असून आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम आहेत. सरकारला १ महिन्यांचा कालावधी देण्यास आपण तयार आहोत. मात्र, त्यासाठी काही अटी असल्याचं सांगत जरांगे पाटील यांनी मराठाआरक्षणाच्या उपोषणावर भाष्य केलं. राज्य सरकारने १ महिन्यांचा कालावधी मागितला असून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर नक्कीच तोडगा काढू, सरकार याबाबत गंभीर व सकारात्मक असल्याचं शासनाच्यावतीने सांगण्यात येते. मात्र, यासंदर्भात केंद्रीय पातळीवर चर्चा आणि कृती व्हायला हवी, असेच सूतोवाच शाहूराजे छत्रपतींनी केले आहेत. 

मराठा आरक्षणासंदर्भात राज्यातील घडामोडींकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्यानुसार, याबाबत अनेक नेत्यांकडून, वरिष्ठांकडून आणि मराठा समाजातील अभ्यासकांकडून भाष्य केले जाते. आता, छत्रपती शाहू महाराजांचे वंशंज शाहूराजे छत्रपती यांनीही याबाबत भूमिका मांडली आहे. राज्यात आणि केंद्रात महायुतीचं सरकार आहे, एकमताचं सरकार आहे. त्यामुळे, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कायद्यात आवश्यकत ती घटनादुरुस्ती करुन आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. त्यासाठी, हा विषय आता पंतप्रधानांपर्यंत गेला पाहिजे, असे स्पष्ट मत शाहू महाराजांचे वंशज छत्रपती शाहूराजे यांनी व्यक्त केले, एबीपी माझाशी बोलताना त्यांनी भूमिका स्पष्ट केली.  

पंतप्रधानांपर्यंत हा विषय न्यावाच लागेल, घटनात्मक दुरुस्ती आवश्यकतेनुसार करुन घ्यावीच लागेल. आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपर्यंत देण्यात आलेली आहे, ती ८५ टक्क्यांपर्यंत कशाप्रकारे नेता येईल. तसेच, त्यामध्ये कोण-कोण बसवायचं हे कायदेतज्ज्ञ सांगतीलच. परंतु, त्यासाठीची जी घटनादुरुस्ती ती करुन घ्यावीच लागेल, ती ताकदही त्यांच्याकडे आहे, असे म्हणत छत्रपती शाहू राजेंनी हा विषय केंद्र सरकारकडून सुटू शकतो, असे सुतोवाच केले. 

राज्यात जे आदेश काढले जातात, किंवा इथं ज्या घडामोडी घडत आहेत, त्यासंदर्भात प्रश्न विचारला असता. मला वाटतं बेसला गेलं पाहिजे, आवश्यक त्या घटनादुरूस्ती केल्या पाहिजेल, इथल्या इथं थांबून उपयोग नाही, त्यांनी पंतप्रधानांपर्यंत पोहोचलं पाहिजे, असेही शाहूराजेंनी म्हटलं.  

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणreservationआरक्षणmarathaमराठाShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती