शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Kolhapur: मांडरे, चिमगाव विषबाधेचे गूढ उलगडणार; फॉरेन्सिकची तपासणी पूर्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 12:54 IST

कोल्हापूर : मांडरे (ता. करवीर) आणि चिमगाव (ता. कागल) येथे झालेल्या विषबाधेची फॉरेन्सिक विभागाने तपासणी पूर्ण केली. याचा अहवाल ...

कोल्हापूर : मांडरे (ता. करवीर) आणि चिमगाव (ता. कागल) येथे झालेल्या विषबाधेची फॉरेन्सिक विभागाने तपासणी पूर्ण केली. याचा अहवाल दोन दिवसांत करवीर पोलिसांना पाठवला जाणार आहे. त्यामुळे लवकरच या दोन्ही घटनांचे गूढ उलगडेल. मृतांच्या पोटातील विषाचा प्रकार स्पष्ट होणार असल्याने पुढील तपासाला गती येणार आहे.मांडरे येथे मुंगूस चावलेल्या कोंबडीचे मांस खाल्ल्याचे निमित्त झाले आणि एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. चिमगाव येथे दोन चिमुकल्यांना विषबाधेने आपला जीव गमवावा लागला. या दोन्ही घटनांमधील पाच जणांचा मृत्यू नेमका कशाने झाला? त्यांच्या जेवणात कोणी बाहेरून विष कालवले की दोषयुक्त अन्नपदार्थांमुळे विषबाधा झाली? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबची मदत घेतली.फॉरेन्सिकच्या अधिकाऱ्यांनी मांडरे आणि चिमगाव येथील दोन्ही घरातून खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन तपासणी केली. तसेच मृतांच्या पोटातील अन्नपदार्थांचे काही अंशदेखील त्यांनी तपसाले आहेत. यातून विषबाधेचा प्रकार स्पष्ट होणार आहे. रासायनिक विषाचे अंश आढळल्यास विषप्रयोगावर शिक्कामोर्तब होईल. तसे असल्यास पोलिसांना विषप्रयोग करणाऱ्या संशयितांचा शोध घ्यावा लागणार आहे. अहवालातून काय स्पष्ट होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मांडरे आणि चिमगाव येथील दोन्ही घटनांमधील जप्त खाद्य पदार्थांची फॉरेन्सिक तपासणी पूर्ण झाली. तांत्रिक विश्लेषण करून अंतिम अहवाल तयार केला आहे. दोन दिवसांत अहवाल करवीर पोलिसांकडे पाठवला जाईल. -अश्विन गेडाम, अधीक्षक, फॉरेन्सिक लॅब 

विषबाधेचा अहवाल येताच पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित आणि करवीरचे उपअधीक्षक सुजित क्षीरसागर यांच्याशी चर्चा करून पुढील तपास केला जाईल. दोन-तीन दिवसांत सर्व बाबी स्पष्ट होतील. -किशोर शिंदे, पोलिस निरीक्षक, करवीर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfood poisoningअन्नातून विषबाधाCrime Newsगुन्हेगारी