शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

लम्पी औषधोपचारांचा खर्च सरकार करणार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 12:02 IST

लम्पी त्वचारोगाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांचे पशुधन जगले पाहिजे यासाठी जिल्ह्याला एक कोटीचे अर्थसाहाय्य

हातकणंगले : लम्पी त्वचारोगाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांचे पशुधन जगले पाहिजे यासाठी जिल्ह्याला एक कोटीचे अर्थसाहाय्य शासनाकडून दिले आहे. अजून अर्थसाहाय्य देण्यास शासन तयार आहे. जिल्ह्यामध्ये ९३ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. लम्पी रोगावर नियंत्रण आणण्यासाठी पशूंची आंतरराज्य बंदी, बाजारबंदी, पशुधन वाहतूक बंदी केल्याने लम्पी रोग आटोक्यात आलेला आहे, असे मत राज्याचे महसूल आणि पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी हातकणंगले येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.

हातकणंगले तालुक्यातील लम्पी रोगाची लागण झालेल्या मौजे वडगाव, हेरले आणि अतिग्रे गावांतील जनावरांच्या गोठ्यांना सोमवारी राज्याचे पशुसंवर्धन व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेटी देऊन शेतकऱ्यांचे पशुधन वाचले पाहिजे यासाठी प्रत्यक्ष जाऊन आढावा घेतला. या भेटीनंतर हातकणंगले तहसील कार्यालयामध्ये आढावा बैठक घेतली.

बैठकीत खासदार धैर्यशील माने यांनी तालुक्यामध्ये पशुवैद्यकीय डॉक्टरांची कमतरता आहे. त्यामुळे जनावरांची हेळसांड होत असल्याचे मत व्यक्त केले.

आमदार राजू बाबा आवळे यांनी तालुका मोठा असल्याने शासकीय पशुसंवर्धन विभागाची सेवा वेळेत मिळत नाही तरी खासगी डॉक्टरांना काम करण्याची परवानगी मिळावी, असे मत मांडले. आमदार प्रकाश आवाडे यांनी पुढील महिन्यामध्ये साखर कारखाने चालू होणार आहेत. जिल्हा जिल्ह्यातून जनावरे येणार आहेत. त्यांचे लसीकरण होणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. माजी आ. राजीव आवळे यांनी लम्पी रोग झालेल्या जनावरांसाठी स्वतंत्र निवारण केंद्रे सुरू करावीत. जिल्ह्यात वैद्यकीय सेवा कमी पडत आहे त्यावर लक्ष द्यावे, असे मत मांडले.

जि. प. सदस्य अरुणराव इंगवले यांनी दुष्काळी स्थितीमध्ये जशा छावण्या सुरू केल्या होत्या त्याचप्रमाणे या रोगावरही शासनाने छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी यावेळी केली.

या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, मिरज प्रांत समीर शिंगटे, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार, कल्पना ढवळे, शिरोळचे जि. प. सदस्य अशोक माने, प्रसाद खोबरे यांच्यासह अधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकशी करून कारवाईचे आदेश

अतिग्रे येथे पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांना लसीकरण करण्यात आले. यावेळी लसीकरण करताना एकच सुई वापरण्यात आली. त्यामुळे गावातील घरोघरी लम्पी रोगाचा प्रसार झाला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले.

तानाजी सावंत यांचे बोलणे तोडमोड करून दाखविले

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाच्या आरक्षणावर कोणतेही वादग्रस्त वक्तव्य केलेले नाही. त्यांचे बोलणे मोडतोड करून दाखविले आहे. मी आरक्षण समितीचा राज्य कार्याध्यक्ष आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमचे शासन नेहमीच प्रयत्नशील आहे. राज्य शासन मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार, असे मत यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरLumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोगRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील