शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

लम्पी औषधोपचारांचा खर्च सरकार करणार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 12:02 IST

लम्पी त्वचारोगाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांचे पशुधन जगले पाहिजे यासाठी जिल्ह्याला एक कोटीचे अर्थसाहाय्य

हातकणंगले : लम्पी त्वचारोगाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांचे पशुधन जगले पाहिजे यासाठी जिल्ह्याला एक कोटीचे अर्थसाहाय्य शासनाकडून दिले आहे. अजून अर्थसाहाय्य देण्यास शासन तयार आहे. जिल्ह्यामध्ये ९३ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. लम्पी रोगावर नियंत्रण आणण्यासाठी पशूंची आंतरराज्य बंदी, बाजारबंदी, पशुधन वाहतूक बंदी केल्याने लम्पी रोग आटोक्यात आलेला आहे, असे मत राज्याचे महसूल आणि पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी हातकणंगले येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.

हातकणंगले तालुक्यातील लम्पी रोगाची लागण झालेल्या मौजे वडगाव, हेरले आणि अतिग्रे गावांतील जनावरांच्या गोठ्यांना सोमवारी राज्याचे पशुसंवर्धन व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेटी देऊन शेतकऱ्यांचे पशुधन वाचले पाहिजे यासाठी प्रत्यक्ष जाऊन आढावा घेतला. या भेटीनंतर हातकणंगले तहसील कार्यालयामध्ये आढावा बैठक घेतली.

बैठकीत खासदार धैर्यशील माने यांनी तालुक्यामध्ये पशुवैद्यकीय डॉक्टरांची कमतरता आहे. त्यामुळे जनावरांची हेळसांड होत असल्याचे मत व्यक्त केले.

आमदार राजू बाबा आवळे यांनी तालुका मोठा असल्याने शासकीय पशुसंवर्धन विभागाची सेवा वेळेत मिळत नाही तरी खासगी डॉक्टरांना काम करण्याची परवानगी मिळावी, असे मत मांडले. आमदार प्रकाश आवाडे यांनी पुढील महिन्यामध्ये साखर कारखाने चालू होणार आहेत. जिल्हा जिल्ह्यातून जनावरे येणार आहेत. त्यांचे लसीकरण होणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. माजी आ. राजीव आवळे यांनी लम्पी रोग झालेल्या जनावरांसाठी स्वतंत्र निवारण केंद्रे सुरू करावीत. जिल्ह्यात वैद्यकीय सेवा कमी पडत आहे त्यावर लक्ष द्यावे, असे मत मांडले.

जि. प. सदस्य अरुणराव इंगवले यांनी दुष्काळी स्थितीमध्ये जशा छावण्या सुरू केल्या होत्या त्याचप्रमाणे या रोगावरही शासनाने छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी यावेळी केली.

या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, मिरज प्रांत समीर शिंगटे, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार, कल्पना ढवळे, शिरोळचे जि. प. सदस्य अशोक माने, प्रसाद खोबरे यांच्यासह अधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकशी करून कारवाईचे आदेश

अतिग्रे येथे पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांना लसीकरण करण्यात आले. यावेळी लसीकरण करताना एकच सुई वापरण्यात आली. त्यामुळे गावातील घरोघरी लम्पी रोगाचा प्रसार झाला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले.

तानाजी सावंत यांचे बोलणे तोडमोड करून दाखविले

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाच्या आरक्षणावर कोणतेही वादग्रस्त वक्तव्य केलेले नाही. त्यांचे बोलणे मोडतोड करून दाखविले आहे. मी आरक्षण समितीचा राज्य कार्याध्यक्ष आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमचे शासन नेहमीच प्रयत्नशील आहे. राज्य शासन मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार, असे मत यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरLumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोगRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील