शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनाचा वाजवताहेत ढोल, वनखात्याचा नवा झोल; केवळ महसूल गोळा करण्यावर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 11:38 IST

वास्तविक, वन्यजीवांचे संवर्धन करणे ही वनविभागाची मुख्य जबाबदारी आहे. निसर्ग आणि वनपर्यटनाच्या माध्यमातून जनतेचे, पर्यटकांचे मनोरंजन करणे, त्यांची करमणूक करणे हे काम वन्यजीव संरक्षण संवर्धनाचे सर्व कायदे धाब्यावर बसवून वनविभाग करू लागले आहे.

संदीप आडनाईककोल्हापूर : काजवा महोत्सवाबरोबरच वनविभागाने राधानगरी आणि दाजीपूर परिसरात जंगल सफारी सुरू केली आहे. यातूनही वन विभाग महसूल जमा करीत आहे. अभयारण्य आणि राखीव क्षेत्रात तसेच व्याघ्र कॉरिडॉरमध्ये पर्यटकांना फिरण्यासाठी मुभा दिल्यामुळे वन्यप्राण्यांच्या संवर्धनाऐवजी वनपर्यटनालावनविभाग चालना देत आहे.

वनविभागाने सातारा जिल्ह्यातील कास पठारावर, सागरेश्वर आणि राधानगरी, दाजीपूर अभयारण्य क्षेत्रात जंगल सफारी, मेळघाट, ताडोबा या ठिकाणीही वनविभागाने रात्रसफारी सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक, वन्यजीवांचे संवर्धन करणे ही वनविभागाची मुख्य जबाबदारी आहे. निसर्ग आणि वनपर्यटनाच्या माध्यमातून जनतेचे, पर्यटकांचे मनोरंजन करणे, त्यांची करमणूक करणे हे काम वन्यजीव संरक्षण संवर्धनाचे सर्व कायदे धाब्यावर बसवून वनविभाग करू लागले आहे. इतकेच नव्हेतर, गाड्या खरेदी करून पर्यटकांकडून प्रतिव्यक्ती ठरावीक रक्कम घेतली जात आहे. वनखात्याचे विश्रामगृह उपलब्ध करून दिले जात आहे.

इतर राज्यांत रात्री प्रवेशाला बंदी

  • वनक्षेत्र परिसरात रात्री निशाचर व वन्यप्राण्यांचा वावर असतो. हे वन्यप्राणी रात्री पाण्यासाठी, शिकारीसाठी आणि अन्नाच्या शोधात बाहेर पडतात. रात्री वन्य प्राण्यांच्या अधिवासात माणसांनी प्रवेश केल्यास त्यांच्या नैसर्गिक दिनक्रमात व्यत्यय निर्माण होतो. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या अधिवासात रात्रसफारी व जंगल सफारी केवळ पर्यटनासाठी सुरू करणे धोकादायक आहे. हे वन्यप्राणी माणसांवर हल्लाही करू शकतात.
  • कर्नाटक, तामिळनाडू, केरळ राज्यातील वनक्षेत्रात रात्री माणसांच्या प्रवेशाला पूर्ण बंदी आहे. महाराष्ट्रात मात्र अशी बंदी नसल्याने रात्रीही वनक्षेत्रात माणसांचा हस्तक्षेप सुरू असतो. यावर वनविभागाचे प्रभावी नियंत्रण नाही.

व्यापारी पद्धतीने, कर्तव्ये बाजूला ठेवून, जबाबदारी टाळून वनविभाग वनपर्यटनाला चालना देत आहे. वास्तविक, निसर्गपूरक पद्धतीने वनपर्यटनाला चालना दिली पाहिजे. इतर राज्यांतील वनपर्यटनाची तुलना करता आपल्याकडे सुरू असलेले वनपर्यटन पूर्णत: निसर्गपूरक नाही. या पर्यटनात अनेक चुका व त्रुटी आहेत. यात सुधारणा करणे आवश्यक आहे. यामध्ये कोणत्याही सुधारणा व बदल न करता रात्र सफारी, जंगल सफारीसारखे निसर्गविरोधी व वन्यजीव संरक्षण व संवर्धनविरोधी उपक्रम सुरू केले आहेत. - डॉ. मधुकर बाचुळकर, वनस्पती शास्त्रज्ञ.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtourismपर्यटनforest departmentवनविभाग