शहरं
Join us  
Trending Stories
1
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
2
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
3
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
4
"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
5
'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख
6
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
7
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
8
'तक्रार केल्याने दिला जास्त त्रास'; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पीएसआय बदने, बनकर अटकेत
9
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
10
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
11
धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा डाव, सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम : वर्षा गायकवाड
12
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
13
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
14
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
15
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
16
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
17
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
18
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
19
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
20
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!

कोल्हापूर जिल्ह्यात ४० लाख लोकसंख्येतून २३ हजार असाक्षर शोधण्याचे शिक्षण विभागासमोर 'टार्गेट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 13:51 IST

असाक्षरांची वर्षातून दोनवेळा परीक्षा

कोल्हापूर : देशातील एकही व्यक्ती असाक्षर राहता कामा नये, यासाठी केंद्र शासनाच्या नवभारत साक्षरता अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. २०३० पर्यंत सर्व तरुण, प्रौढ स्त्री-पुरुषांना साक्षर बनविण्यासाठी केंद्राने प्रयत्न सुरू केली असून, कोल्हापूर जिल्ह्यात नवभारत साक्षरता अभियान जोरदारपणे राबवले जात आहे. त्याअंतर्गत येत्या वर्षात २३ हजार १२६ असाक्षर शोधून काढण्याचे टार्गेट शिक्षण योजना विभागाला दिले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्याची ४० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असून यातील २३ हजार असाक्षर शोधण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे. या नवसाक्षरांसाठी वर्षातून दोनदा परीक्षा घेतली जाते. येत्या सप्टेंबरमध्ये ही परीक्षा होणार असून, यासाठी नोंदणी सुरू आहे.

निरंतर शिक्षणाकडून उच्च शिक्षणाकडे वाटचालया अभियानाचा उद्देश देश ९५ टक्के साक्षर करणे हा आहे. नव साक्षर लोकांना वाचणे, लिहिणे याच बरोबर गणित, बँकेचे व्यवहार येणे आवश्यक आहे. देशातील १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) व संख्याज्ञान विकसित करणे, हा या अभियानाचा उद्देश आहे.

असाक्षरांची वर्षातून दोनवेळा परीक्षासर्व्हेतून शोधलेल्या असाक्षरांची वर्षातून दोनवेळा परीक्षा घेतली जाते. या परीक्षेद्वारे त्यांच्यातील मूल्यमापन होते. लाभार्थी आणि स्वयंसेवी शिक्षक यांचे सर्वेक्षण शाळांकडून केले जाते. ज्या शालेय विद्यार्थ्यांच्या कुटुंबामध्ये निरक्षर व्यक्ती नाहीत, अशा विद्यार्थ्यांना त्यांचे शेजारचे निरक्षरांना मदत करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येते. शासकीय/अनुदानित/खासगी शाळांमधील शिक्षकांव्यतिरिक्त शिक्षक पदाचे शिक्षण घेणारे, उच्च शिक्षण संस्थामधील विद्यार्थी, पंचायतराज संस्था, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या यांचाही स्वयंसेवक म्हणून सहभाग आहे.

केंद्र शासनाच्या नवभारत साक्षरता अभियानाच्या माध्यमातून असाक्षरांचा सर्व्हे केला जात आहे. जिल्हा शंभर टक्के साक्षर करण्याचा प्रयत्न आहे. - एकनाथ आंबोकर, शिक्षणाधिकारी योजना, कोल्हापूर