शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
2
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
3
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
4
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
5
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
6
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
7
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
8
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
9
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
10
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
11
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
12
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
13
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
14
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
15
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
16
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
17
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
18
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
19
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!

कोल्हापूर जिल्ह्यात ४० लाख लोकसंख्येतून २३ हजार असाक्षर शोधण्याचे शिक्षण विभागासमोर 'टार्गेट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 13:51 IST

असाक्षरांची वर्षातून दोनवेळा परीक्षा

कोल्हापूर : देशातील एकही व्यक्ती असाक्षर राहता कामा नये, यासाठी केंद्र शासनाच्या नवभारत साक्षरता अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. २०३० पर्यंत सर्व तरुण, प्रौढ स्त्री-पुरुषांना साक्षर बनविण्यासाठी केंद्राने प्रयत्न सुरू केली असून, कोल्हापूर जिल्ह्यात नवभारत साक्षरता अभियान जोरदारपणे राबवले जात आहे. त्याअंतर्गत येत्या वर्षात २३ हजार १२६ असाक्षर शोधून काढण्याचे टार्गेट शिक्षण योजना विभागाला दिले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्याची ४० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असून यातील २३ हजार असाक्षर शोधण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे. या नवसाक्षरांसाठी वर्षातून दोनदा परीक्षा घेतली जाते. येत्या सप्टेंबरमध्ये ही परीक्षा होणार असून, यासाठी नोंदणी सुरू आहे.

निरंतर शिक्षणाकडून उच्च शिक्षणाकडे वाटचालया अभियानाचा उद्देश देश ९५ टक्के साक्षर करणे हा आहे. नव साक्षर लोकांना वाचणे, लिहिणे याच बरोबर गणित, बँकेचे व्यवहार येणे आवश्यक आहे. देशातील १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) व संख्याज्ञान विकसित करणे, हा या अभियानाचा उद्देश आहे.

असाक्षरांची वर्षातून दोनवेळा परीक्षासर्व्हेतून शोधलेल्या असाक्षरांची वर्षातून दोनवेळा परीक्षा घेतली जाते. या परीक्षेद्वारे त्यांच्यातील मूल्यमापन होते. लाभार्थी आणि स्वयंसेवी शिक्षक यांचे सर्वेक्षण शाळांकडून केले जाते. ज्या शालेय विद्यार्थ्यांच्या कुटुंबामध्ये निरक्षर व्यक्ती नाहीत, अशा विद्यार्थ्यांना त्यांचे शेजारचे निरक्षरांना मदत करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येते. शासकीय/अनुदानित/खासगी शाळांमधील शिक्षकांव्यतिरिक्त शिक्षक पदाचे शिक्षण घेणारे, उच्च शिक्षण संस्थामधील विद्यार्थी, पंचायतराज संस्था, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या यांचाही स्वयंसेवक म्हणून सहभाग आहे.

केंद्र शासनाच्या नवभारत साक्षरता अभियानाच्या माध्यमातून असाक्षरांचा सर्व्हे केला जात आहे. जिल्हा शंभर टक्के साक्षर करण्याचा प्रयत्न आहे. - एकनाथ आंबोकर, शिक्षणाधिकारी योजना, कोल्हापूर