शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

राजर्षींचा ‘बेनजर व्हिला’ लढतोय अस्तित्वासाठी, पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष; नावाचा झाला अपभ्रंश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 11:57 IST

एकीकडे सरकार पर्यटनाच्या नावाखाली इव्हेंट करून कोट्यवधी रुपयांची उधळण करत असताना दुसरीकडे अशा अप्रतिम वास्तूंकडे मात्र साेयीस्कर दुर्लक्ष

आदित्य वेल्हाळ कोल्हापूर : कोल्हापूरची जीवनदायिनी ठरलेल्या राधानगरीधरणातील शाहू महाराजांची आवडती वास्तू असणाऱ्या बेनजर व्हिलाची सध्या प्रचंड दुरवस्था झाली असून पुरातत्त्व विभागाच्या बेदखलपणामुळे ही वास्तू अस्तित्वासाठी लढत आहे. सहजासहजी न दिसणारे, दृष्टी एका जागी राहू न शकणारे अप्रतिम सौंदर्य म्हणजे ‘बेनजर,’ या अर्थाने शाहू महाराजांनी या वास्तूला ‘बेनजर व्हिला’ हे नाव दिले. १९१२ साली शाहू महाराजांनी केलेल्या एका ठरावात या नावाचा उल्लेख आहे. कोल्हापुरातील पुराभिलेख कार्यालयात हा ठराव उपलब्ध आहे. मात्र, अपभ्रंश होऊन ‘बेनझीर’ हे नाव प्रचलित झाले. या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याची मागणी शाहूप्रेमींनी गेल्या पाच वर्षांपासून लावून धरली आहे. मात्र, पुरातत्त्व विभागाला शाहू महाराजांच्या या ऐतिहासिक वास्तूबद्दल ममत्वच नसल्याने ही वास्तू काळाच्या उदरात लोप पावत आहे.दसऱ्याच्या मुहूर्तावर १९०८ साली शाहू महाराजांनी राधानगरीधरणाच्या बांधकामाला सुरुवात केली. हे काम महाराजांच्या हयातीत पूर्ण झाले नाही; मात्र छत्रपती राजाराम महाराजांनी धरणाचे काम पूर्ण केले. धरणाच्या परिसराची नैसर्गिक संपन्नता व धरणाच्या बांधकामावर लक्ष ठेवण्यासाठी धरणाच्या हद्दीत टेकडीवर हा बंगला बांधला. पाणीसाठा वाढल्यामुळे बेनजर व्हिला बॅकवॉटरच्या मधोमध आला आहे.एकीकडे सरकार पर्यटनाच्या नावाखाली इव्हेंट करून कोट्यवधी रुपयांची उधळण करत असताना दुसरीकडे अशा अप्रतिम वास्तूंकडे मात्र साेयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. आता ही वास्तू जतन करण्यासाठी शाहूप्रेमींनी पुढे येण्याची गरज आहे.

भिंतीचे दगड निखळलेबेनजर व्हिला १९७५, २०१६, २०१९ व आत्ता २०२३ ला चौथ्यांदा पाणीसाठा कमी झाल्यामुळे खुला झाला. हा बंगला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. चहूबाजूंनी कायम पाणी असल्याने दुर्लक्षित राहिलेली ही वास्तू आत्ता फारच दयनीय अवस्थेत आहे. पाऊस, वाऱ्याचा मारा, दगडी भिंतींवर झाडांची मुळे व पारंब्या पसरल्यामुळे भिंतीचे दगड निखळू लागले आहेत. आणखी काही वर्षांत ही वास्तू ढासळण्याचा धोका आहे.

लक्ष्मी तलावाच्या हद्दीतील बेनजर व्हिलासाठी लागणारी सागवानाची लाकडे पुंगाव (ता. राधानगरी) हद्दीतील जंगलातून घ्यावीत, असा ठराव शाहू महाराजांनी १९१२ साली केला होता. या ठरावातील कागदपत्रांवर ‘बेनजर व्हिला’ असा उल्लेख आहे. - गणेश खोडके, अभिलेखाधिकारी, पुराभिलेख कार्यालय, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरीDamधरणShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती