शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

राजर्षींचा ‘बेनजर व्हिला’ लढतोय अस्तित्वासाठी, पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष; नावाचा झाला अपभ्रंश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 11:57 IST

एकीकडे सरकार पर्यटनाच्या नावाखाली इव्हेंट करून कोट्यवधी रुपयांची उधळण करत असताना दुसरीकडे अशा अप्रतिम वास्तूंकडे मात्र साेयीस्कर दुर्लक्ष

आदित्य वेल्हाळ कोल्हापूर : कोल्हापूरची जीवनदायिनी ठरलेल्या राधानगरीधरणातील शाहू महाराजांची आवडती वास्तू असणाऱ्या बेनजर व्हिलाची सध्या प्रचंड दुरवस्था झाली असून पुरातत्त्व विभागाच्या बेदखलपणामुळे ही वास्तू अस्तित्वासाठी लढत आहे. सहजासहजी न दिसणारे, दृष्टी एका जागी राहू न शकणारे अप्रतिम सौंदर्य म्हणजे ‘बेनजर,’ या अर्थाने शाहू महाराजांनी या वास्तूला ‘बेनजर व्हिला’ हे नाव दिले. १९१२ साली शाहू महाराजांनी केलेल्या एका ठरावात या नावाचा उल्लेख आहे. कोल्हापुरातील पुराभिलेख कार्यालयात हा ठराव उपलब्ध आहे. मात्र, अपभ्रंश होऊन ‘बेनझीर’ हे नाव प्रचलित झाले. या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याची मागणी शाहूप्रेमींनी गेल्या पाच वर्षांपासून लावून धरली आहे. मात्र, पुरातत्त्व विभागाला शाहू महाराजांच्या या ऐतिहासिक वास्तूबद्दल ममत्वच नसल्याने ही वास्तू काळाच्या उदरात लोप पावत आहे.दसऱ्याच्या मुहूर्तावर १९०८ साली शाहू महाराजांनी राधानगरीधरणाच्या बांधकामाला सुरुवात केली. हे काम महाराजांच्या हयातीत पूर्ण झाले नाही; मात्र छत्रपती राजाराम महाराजांनी धरणाचे काम पूर्ण केले. धरणाच्या परिसराची नैसर्गिक संपन्नता व धरणाच्या बांधकामावर लक्ष ठेवण्यासाठी धरणाच्या हद्दीत टेकडीवर हा बंगला बांधला. पाणीसाठा वाढल्यामुळे बेनजर व्हिला बॅकवॉटरच्या मधोमध आला आहे.एकीकडे सरकार पर्यटनाच्या नावाखाली इव्हेंट करून कोट्यवधी रुपयांची उधळण करत असताना दुसरीकडे अशा अप्रतिम वास्तूंकडे मात्र साेयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. आता ही वास्तू जतन करण्यासाठी शाहूप्रेमींनी पुढे येण्याची गरज आहे.

भिंतीचे दगड निखळलेबेनजर व्हिला १९७५, २०१६, २०१९ व आत्ता २०२३ ला चौथ्यांदा पाणीसाठा कमी झाल्यामुळे खुला झाला. हा बंगला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. चहूबाजूंनी कायम पाणी असल्याने दुर्लक्षित राहिलेली ही वास्तू आत्ता फारच दयनीय अवस्थेत आहे. पाऊस, वाऱ्याचा मारा, दगडी भिंतींवर झाडांची मुळे व पारंब्या पसरल्यामुळे भिंतीचे दगड निखळू लागले आहेत. आणखी काही वर्षांत ही वास्तू ढासळण्याचा धोका आहे.

लक्ष्मी तलावाच्या हद्दीतील बेनजर व्हिलासाठी लागणारी सागवानाची लाकडे पुंगाव (ता. राधानगरी) हद्दीतील जंगलातून घ्यावीत, असा ठराव शाहू महाराजांनी १९१२ साली केला होता. या ठरावातील कागदपत्रांवर ‘बेनजर व्हिला’ असा उल्लेख आहे. - गणेश खोडके, अभिलेखाधिकारी, पुराभिलेख कार्यालय, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरीDamधरणShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती