शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

कोल्हापुरातील कणेरी मठ येथील गायींचा मृत्यू विषबाधेमुळे नाही, अन्नबाधेमुळे!, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 18:19 IST

मृत्यूंचे कारण शोधण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागास कळविण्यात आले आहे. त्याचबरोबर जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयामार्फत चौकशी समिती नेमण्यात आली आहे,

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरीमठात ५२ नव्हे तर १२ गायींचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू विषबाधेमुळे नव्हे तर अन्नबाधेमुळे झाला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.कणेरीमठावर पंचमहाभूत लोकोत्सवाचे आयोजन करण्यात आले असता या ५२ गायींना बाधा झाली, यापैकी ५२ गायींचा त्यात दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे तेथील नागरिकांत व राज्यातील जनतेत पसरलेला तीव्र असंतोष पसरला होता. शिळे अन्न खाल्ल्यामुळे ५२ गाईंना विषबाधा झाली व त्यामुळे १२ गाईंचा त्यात मृत्यू झाला असे भासविण्यात आले असले, तरी शिळे अन्न गाईंना खायला कोणी दिले? हा प्रश्न अनुत्तरीत असल्याबाबत अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, विक्रम काळे आदी सदस्यांनी विधानपरिषद नियम ९ अन्वये सूचना दिली होती. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी निवेदन केले.मठात २३ व २४ फेब्रुवारी या कालावधीत पोटफुगीमुळे गायी अत्यवस्थ झाल्या. या गायींवर तेथील पशुवैद्यक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू केले. मात्र, उपचारादरम्यान १२ गायींचा मृत्यू झाला. या मृत्यूंचे कारण शोधण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागास कळविण्यात आले आहे. त्याचबरोबर जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयामार्फत चौकशी समिती नेमण्यात आली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर