शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

कोल्हापुरातील कणेरी मठ येथील गायींचा मृत्यू विषबाधेमुळे नाही, अन्नबाधेमुळे!, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 18:19 IST

मृत्यूंचे कारण शोधण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागास कळविण्यात आले आहे. त्याचबरोबर जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयामार्फत चौकशी समिती नेमण्यात आली आहे,

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरीमठात ५२ नव्हे तर १२ गायींचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू विषबाधेमुळे नव्हे तर अन्नबाधेमुळे झाला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.कणेरीमठावर पंचमहाभूत लोकोत्सवाचे आयोजन करण्यात आले असता या ५२ गायींना बाधा झाली, यापैकी ५२ गायींचा त्यात दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे तेथील नागरिकांत व राज्यातील जनतेत पसरलेला तीव्र असंतोष पसरला होता. शिळे अन्न खाल्ल्यामुळे ५२ गाईंना विषबाधा झाली व त्यामुळे १२ गाईंचा त्यात मृत्यू झाला असे भासविण्यात आले असले, तरी शिळे अन्न गाईंना खायला कोणी दिले? हा प्रश्न अनुत्तरीत असल्याबाबत अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, विक्रम काळे आदी सदस्यांनी विधानपरिषद नियम ९ अन्वये सूचना दिली होती. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी निवेदन केले.मठात २३ व २४ फेब्रुवारी या कालावधीत पोटफुगीमुळे गायी अत्यवस्थ झाल्या. या गायींवर तेथील पशुवैद्यक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू केले. मात्र, उपचारादरम्यान १२ गायींचा मृत्यू झाला. या मृत्यूंचे कारण शोधण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागास कळविण्यात आले आहे. त्याचबरोबर जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयामार्फत चौकशी समिती नेमण्यात आली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर