शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कोल्हापुरातील कणेरी मठ येथील गायींचा मृत्यू विषबाधेमुळे नाही, अन्नबाधेमुळे!, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 18:19 IST

मृत्यूंचे कारण शोधण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागास कळविण्यात आले आहे. त्याचबरोबर जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयामार्फत चौकशी समिती नेमण्यात आली आहे,

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरीमठात ५२ नव्हे तर १२ गायींचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू विषबाधेमुळे नव्हे तर अन्नबाधेमुळे झाला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.कणेरीमठावर पंचमहाभूत लोकोत्सवाचे आयोजन करण्यात आले असता या ५२ गायींना बाधा झाली, यापैकी ५२ गायींचा त्यात दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे तेथील नागरिकांत व राज्यातील जनतेत पसरलेला तीव्र असंतोष पसरला होता. शिळे अन्न खाल्ल्यामुळे ५२ गाईंना विषबाधा झाली व त्यामुळे १२ गाईंचा त्यात मृत्यू झाला असे भासविण्यात आले असले, तरी शिळे अन्न गाईंना खायला कोणी दिले? हा प्रश्न अनुत्तरीत असल्याबाबत अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, विक्रम काळे आदी सदस्यांनी विधानपरिषद नियम ९ अन्वये सूचना दिली होती. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी निवेदन केले.मठात २३ व २४ फेब्रुवारी या कालावधीत पोटफुगीमुळे गायी अत्यवस्थ झाल्या. या गायींवर तेथील पशुवैद्यक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू केले. मात्र, उपचारादरम्यान १२ गायींचा मृत्यू झाला. या मृत्यूंचे कारण शोधण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागास कळविण्यात आले आहे. त्याचबरोबर जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयामार्फत चौकशी समिती नेमण्यात आली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर